शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

२३ हजार लोकांना श्वानदंश : तीन वर्षातील आकडेवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 21:47 IST

श्वान दंशाचे प्रकरण वाढले आहे. एप्रिल २०१७ ते जून २०१९ या तीन वर्षात तब्बल २३ हजार ६८८ लोकांना श्वानदंश झाला. गेल्या वर्षी म्हणजे २०१८ मध्ये ११ हजार ६३३ तर या वर्षी एप्रिल ते जून महिन्यात २ हजार १९५ लोकांना कुत्र्याने चावा घेतला आहे.

ठळक मुद्देमोकाट कुत्र्यांवर नियंत्रण कुणाचे?

लोकमत न्यूज नेटवर्कनागूपर : भारतात ‘रॅबिज’मुळे दरवर्षी २५ ते ३० हजार लोक मृत्युमुखी पडतात. जगभरातील ‘रॅबिज’च्या तुलनेत देशाचे प्रमाण ४० ते ५० टक्के आहे. मोकाट कुत्र्यांच्या संदर्भात महानगरपालिका गंभीर नाही. यामुळे श्वान दंशाचे प्रकरण वाढले आहे. एप्रिल २०१७ ते जून २०१९ या तीन वर्षात तब्बल २३ हजार ६८८ लोकांना श्वानदंश झाला. गेल्या वर्षी म्हणजे २०१८ मध्ये ११ हजार ६३३ तर या वर्षी एप्रिल ते जून महिन्यात २ हजार १९५ लोकांना कुत्र्याने चावा घेतला आहे. विशेष म्हणजे यात, १५ वर्षांखालील बालकांची संख्या मोठी आहे. या आकडेवारीवरून मोकाट कुत्र्यांवर नियंत्रण कुणाचे असा प्रश्न, उपस्थित केला जात आहे.गल्लीबोळापासून ते रस्त्यावर मोठ्या संख्येत कुत्री दिसून येतात. मोकाट कुत्र्यांची ही संख्या साडेतीन लाखांच्या आसपास आहे. रात्रपाळी करून घरी परतणाऱ्या नागरिकांच्या अंगावर हीच मोकाट कुत्री धावून जातात. यातून अपघातासोबतच श्वानदंशाचे प्रमाण वाढले आहे. मनपाच्या कोंडवाडा विभागाने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत ९ हजार ८६० लोकांना श्वानदंश झाला. एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीत ११ हजार ६३३ तर एप्रिल २०१९ ते जून २०१९ या तीन महिन्यात २ हजार १९५ श्वानदंश झाला. सरासरी दर आठवड्यात चार ते पाच जणाला कुत्रा चावत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, रुग्ण मनपाच्या दवाखान्यासह मेडिकल, मेयोत येतात. मनपाचे आरोग्य अधिकारी (मेडिसीन) डॉ. सरिता कामदार यांच्याकडे मनपाच्या इस्पितळांची जबाबदारी येताच नुकतेच १४ इस्पितळांमध्ये नि:शुल्क रेबीज इंजेक्शन देण्याची सोय केली. याचा मोठा फायदा होताना दिसून येत आहे. परंतु मेयो, मेडिकलमध्ये याच्या उलट चित्र आहे. येथे केवळ दारिद्र्यरेषेखालील कार्डधारकांनाच नि:शुल्क इंजेक्शन दिल्या जाते, इतरांना बाहेरून विकत घेण्यास सांगितले जाते.७ महिन्यात ३५०० कुत्र्यांची नसबंदीमोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी महानगरपालिकेने नसबंदीची मोहीम २००६ पासून हाती घेतली. २०१० पर्यंत मोठ्या संख्येत कुत्र्यांवर नसबंदी करण्यात आली. परंतु नंतर ही जबाबदारी शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय, नागपूरकडे सोपविण्यात आली. त्यांच्याकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे २०१७ मध्ये ‘एसपीसीए’ या संस्थेकडे जबाबदारी देण्यात आली. या संस्थेने २८० श्वानांची नसबंदी केली. याच दरम्यान चार श्वानांचा मृत्यू झाला. एका पशुवैद्यकीय डॉक्टरवर गुन्हाही दाखल झाला. परिणामी, नसबंदीची प्रक्रिया बंद पडली. आता १४ फेब्रुवारी २०१९ पासून मनपाने पुन्हा नसबंदीची मोहीम सुरू केली आहे. या सात महिन्यात ३ हजार ५०० कुत्र्यांची नसबंदी व त्यांना रॅबीजची लस देण्यात आली आहे.श्वानदंशाचे सर्वाधिक रुग्ण महाल दवाखान्यातगेल्या तीन वर्षात श्वानदंशाचे सर्वाधिक रुग्ण मनपाच्या महाल दवाखान्यात आले आहे. १० हजार ५०३ रुग्णांनी या दवाखान्यातून रॅबीजची लस घेतली. या शिवाय, पाचपावली सुतिकागृह दवाखान्यातून ४ हजार ६५०, सदर दवाखान्यातून ४ हजार १९४, इंदिरा गांधी हॉस्पिटल, गांधीनगर येथे २ हजार ९६९, चकोल दवाखान्यात १ हजार ६८, आयसोलेशन दवाखान्यात ३०१ तर सतरंजीपुरा दवाखान्यात ३ जणांना लस देण्यात आली.श्वान नसबंदी व रॅबीज लसीकरणमहानगरपालिकेच्यावतीने १४ फेब्रुवारीपासून श्वानांच्या नसबंदीची मोहीम सुरू झाली आहे. आतापर्यंत ३५०० कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली. सोबतच श्वानांना रॅबीजची लस दिली जात आहे. यामुळे याचा फायदा येत्या काळात दिसून येईल.डॉ. गजेंद्र महल्लेपशुचिकित्सा अधिकारी, कोंडवाडा विभाग मनपा

टॅग्स :dogकुत्राnagpurनागपूर