शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

२३ हजार लोकांना श्वानदंश : तीन वर्षातील आकडेवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 21:47 IST

श्वान दंशाचे प्रकरण वाढले आहे. एप्रिल २०१७ ते जून २०१९ या तीन वर्षात तब्बल २३ हजार ६८८ लोकांना श्वानदंश झाला. गेल्या वर्षी म्हणजे २०१८ मध्ये ११ हजार ६३३ तर या वर्षी एप्रिल ते जून महिन्यात २ हजार १९५ लोकांना कुत्र्याने चावा घेतला आहे.

ठळक मुद्देमोकाट कुत्र्यांवर नियंत्रण कुणाचे?

लोकमत न्यूज नेटवर्कनागूपर : भारतात ‘रॅबिज’मुळे दरवर्षी २५ ते ३० हजार लोक मृत्युमुखी पडतात. जगभरातील ‘रॅबिज’च्या तुलनेत देशाचे प्रमाण ४० ते ५० टक्के आहे. मोकाट कुत्र्यांच्या संदर्भात महानगरपालिका गंभीर नाही. यामुळे श्वान दंशाचे प्रकरण वाढले आहे. एप्रिल २०१७ ते जून २०१९ या तीन वर्षात तब्बल २३ हजार ६८८ लोकांना श्वानदंश झाला. गेल्या वर्षी म्हणजे २०१८ मध्ये ११ हजार ६३३ तर या वर्षी एप्रिल ते जून महिन्यात २ हजार १९५ लोकांना कुत्र्याने चावा घेतला आहे. विशेष म्हणजे यात, १५ वर्षांखालील बालकांची संख्या मोठी आहे. या आकडेवारीवरून मोकाट कुत्र्यांवर नियंत्रण कुणाचे असा प्रश्न, उपस्थित केला जात आहे.गल्लीबोळापासून ते रस्त्यावर मोठ्या संख्येत कुत्री दिसून येतात. मोकाट कुत्र्यांची ही संख्या साडेतीन लाखांच्या आसपास आहे. रात्रपाळी करून घरी परतणाऱ्या नागरिकांच्या अंगावर हीच मोकाट कुत्री धावून जातात. यातून अपघातासोबतच श्वानदंशाचे प्रमाण वाढले आहे. मनपाच्या कोंडवाडा विभागाने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत ९ हजार ८६० लोकांना श्वानदंश झाला. एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीत ११ हजार ६३३ तर एप्रिल २०१९ ते जून २०१९ या तीन महिन्यात २ हजार १९५ श्वानदंश झाला. सरासरी दर आठवड्यात चार ते पाच जणाला कुत्रा चावत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, रुग्ण मनपाच्या दवाखान्यासह मेडिकल, मेयोत येतात. मनपाचे आरोग्य अधिकारी (मेडिसीन) डॉ. सरिता कामदार यांच्याकडे मनपाच्या इस्पितळांची जबाबदारी येताच नुकतेच १४ इस्पितळांमध्ये नि:शुल्क रेबीज इंजेक्शन देण्याची सोय केली. याचा मोठा फायदा होताना दिसून येत आहे. परंतु मेयो, मेडिकलमध्ये याच्या उलट चित्र आहे. येथे केवळ दारिद्र्यरेषेखालील कार्डधारकांनाच नि:शुल्क इंजेक्शन दिल्या जाते, इतरांना बाहेरून विकत घेण्यास सांगितले जाते.७ महिन्यात ३५०० कुत्र्यांची नसबंदीमोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी महानगरपालिकेने नसबंदीची मोहीम २००६ पासून हाती घेतली. २०१० पर्यंत मोठ्या संख्येत कुत्र्यांवर नसबंदी करण्यात आली. परंतु नंतर ही जबाबदारी शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय, नागपूरकडे सोपविण्यात आली. त्यांच्याकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे २०१७ मध्ये ‘एसपीसीए’ या संस्थेकडे जबाबदारी देण्यात आली. या संस्थेने २८० श्वानांची नसबंदी केली. याच दरम्यान चार श्वानांचा मृत्यू झाला. एका पशुवैद्यकीय डॉक्टरवर गुन्हाही दाखल झाला. परिणामी, नसबंदीची प्रक्रिया बंद पडली. आता १४ फेब्रुवारी २०१९ पासून मनपाने पुन्हा नसबंदीची मोहीम सुरू केली आहे. या सात महिन्यात ३ हजार ५०० कुत्र्यांची नसबंदी व त्यांना रॅबीजची लस देण्यात आली आहे.श्वानदंशाचे सर्वाधिक रुग्ण महाल दवाखान्यातगेल्या तीन वर्षात श्वानदंशाचे सर्वाधिक रुग्ण मनपाच्या महाल दवाखान्यात आले आहे. १० हजार ५०३ रुग्णांनी या दवाखान्यातून रॅबीजची लस घेतली. या शिवाय, पाचपावली सुतिकागृह दवाखान्यातून ४ हजार ६५०, सदर दवाखान्यातून ४ हजार १९४, इंदिरा गांधी हॉस्पिटल, गांधीनगर येथे २ हजार ९६९, चकोल दवाखान्यात १ हजार ६८, आयसोलेशन दवाखान्यात ३०१ तर सतरंजीपुरा दवाखान्यात ३ जणांना लस देण्यात आली.श्वान नसबंदी व रॅबीज लसीकरणमहानगरपालिकेच्यावतीने १४ फेब्रुवारीपासून श्वानांच्या नसबंदीची मोहीम सुरू झाली आहे. आतापर्यंत ३५०० कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली. सोबतच श्वानांना रॅबीजची लस दिली जात आहे. यामुळे याचा फायदा येत्या काळात दिसून येईल.डॉ. गजेंद्र महल्लेपशुचिकित्सा अधिकारी, कोंडवाडा विभाग मनपा

टॅग्स :dogकुत्राnagpurनागपूर