शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

इथेनॉलचे प्रमाण वाढल्याने वाहनांचे इंजिन बिघडते का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 11:52 IST

५ टक्क्यांचे प्रमाण पोहोचले २० टक्क्यांवर : वाहने पडताहेत बंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर / यवतमाळ : पेट्रोलियम मंत्रालयाने परकीय चलन वाचविण्यासाठी पेट्रोलमध्ये इथेनॉल वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पेट्रोल कंपन्या दरवर्षी इथेनॉलचे प्रमाण वाढवीत आहेत. पूर्वी ५ टक्के असलेले इथेनॉल आता २० टक्क्यांवर पोहोचले आहे. परिणामी, जुन्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे इंजीन बिघडण्यास सुरुवात झाली आहे.

पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळले, तर वाहन चालते. मात्र, इथेनॉलवर वाहन चालेल, अशी इंजीनची डिझाइन असणे आवश्यक आहे. सध्या बीएस ४ तंत्रज्ञानाचा वापर झालेली जुनी वाहने इथेनॉलचे अधिक प्रमाण सहन करू शकत नाहीत. यामुळे पेट्रोलमधील इथेनॉलचे प्रमाण वाढताच ही वाहने बिघडण्याचे प्रमाण वाढले आहे. इथेनॉलच्या वापराने चारचाकी वाहनांमध्ये असलेले इंजेक्टर गंजण्याचे प्रमाण वाढले आहे. यातून पेट्रोल किंचित घट्ट येते. यामुळे पेट्रोल पुढे सरकविण्याची जबाबदारी असलेले इंजेक्टर जाम होत असून, पेट्रोलचा सप्लाय कमी होतो. यामुळे चालू स्थितीत अनेक वेळा गाडी बंद पडते, तर गाडी सुरू होण्यासाठीही मोठा विलंब लागतो. 

अपघाताचा धोकाइंजेक्टर जाम होत असल्याने वाहनाचे एक्सिलेटर वाढविल्यावरही वाहन गती पकडत नाही. उलट मध्येच पेट्रोलचा फ्लो कमी होतो. यामुळे गाडी ओव्हरटेक करताना असा प्रकार घडला, तर अपघाताचा धोका निर्माण होतो.

मेकॅनिक काय म्हणतात...इथेनॉलमुळे गाडीचा वेग कमी केला तरी गाडी वेगाने चालते. ब्लॉक पिस्टल आणि कार्बोरेटर पिस्टल खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे, असे दुचाकी मेकॅनिक आशिक निर्बान यांनी सांगितले. बीएस ४ मॉडेलमध्ये हा प्रकार उदभवत आहे. बीएस ६ या मॉडेलमध्येही अशा तक्रारी येत आहेत. गाडी घरघर करण्याचे प्रमाण वाढल्याचे मेकॅनिक पवन सराफ म्हणाले.

असे वाढले इथेनॉलचे प्रमाणप्रारंभी पेट्रोलमध्ये ५ टक्के इथेनॉल होते. ते प्रमाण नंतर ८ टक्के झाले, त्यानंतर १० टक्के, १२ टक्के आणि आता ते थेट २० टक्के झाले आहे.

ग्राहकांकडून तक्रार नाही"पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण वाढल्यामुळे दुचाकी किंवा चारचाकीच्या इंजीनमध्ये बिघाड होत असल्याची कुठलीही तक्रार आपल्याकडे आलेली नाही. दररोज शेकडो गाड्यांची सर्व्हिसिंग होते. ग्राहकांकडून नियमित फीडबॅक घेतले जातात, पण अशा आशयाच्या तक्रारी अद्यापतरी कुणी केलेली नाही."- अचल गांधी, व्यवस्थापकीय संचालक, ए. के. गांधी टीव्हीएस

"वाहनातील पेट्रोल काढल्यानंतर यात पेट्रोलवर पाण्यासारखा थर तरंगताना दिसतो. वाहन दुरुस्ती करताना हा प्रकार प्रामुख्याने दिसतो. हा प्रकार म्हणजेच इथेनॉल असावे, असा अंदाज आहे."- संजय गंपावार, बॉडी सॅफ मॅनेजर, नेक्सा कंपनी

"पूर्वी वाहन सुरू होत नाही अथवा गीअर पडत नाही, अशी एखादीच तक्रार येत होती. आता दर दिवसाला ८ ते १० वाहने अशा तक्रारींची येत आहेत. यात बॅटरी जात नाही तर इंजेक्टर खराब होत आहे. चार ते आठ इंजेक्टर बदलावे लागतात. एक इंजेक्टर १४०० रुपयांचे आहे."- दिनेश उजवने, मारुती शोरूम, कंपनी

टॅग्स :nagpurनागपूरYavatmalयवतमाळVidarbhaविदर्भ