शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
5
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
6
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
7
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
8
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
9
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
10
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
11
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
12
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
13
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
14
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
15
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
16
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
17
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
18
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
19
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
20
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध

इथेनॉलचे प्रमाण वाढल्याने वाहनांचे इंजिन बिघडते का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 11:52 IST

५ टक्क्यांचे प्रमाण पोहोचले २० टक्क्यांवर : वाहने पडताहेत बंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर / यवतमाळ : पेट्रोलियम मंत्रालयाने परकीय चलन वाचविण्यासाठी पेट्रोलमध्ये इथेनॉल वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पेट्रोल कंपन्या दरवर्षी इथेनॉलचे प्रमाण वाढवीत आहेत. पूर्वी ५ टक्के असलेले इथेनॉल आता २० टक्क्यांवर पोहोचले आहे. परिणामी, जुन्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे इंजीन बिघडण्यास सुरुवात झाली आहे.

पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळले, तर वाहन चालते. मात्र, इथेनॉलवर वाहन चालेल, अशी इंजीनची डिझाइन असणे आवश्यक आहे. सध्या बीएस ४ तंत्रज्ञानाचा वापर झालेली जुनी वाहने इथेनॉलचे अधिक प्रमाण सहन करू शकत नाहीत. यामुळे पेट्रोलमधील इथेनॉलचे प्रमाण वाढताच ही वाहने बिघडण्याचे प्रमाण वाढले आहे. इथेनॉलच्या वापराने चारचाकी वाहनांमध्ये असलेले इंजेक्टर गंजण्याचे प्रमाण वाढले आहे. यातून पेट्रोल किंचित घट्ट येते. यामुळे पेट्रोल पुढे सरकविण्याची जबाबदारी असलेले इंजेक्टर जाम होत असून, पेट्रोलचा सप्लाय कमी होतो. यामुळे चालू स्थितीत अनेक वेळा गाडी बंद पडते, तर गाडी सुरू होण्यासाठीही मोठा विलंब लागतो. 

अपघाताचा धोकाइंजेक्टर जाम होत असल्याने वाहनाचे एक्सिलेटर वाढविल्यावरही वाहन गती पकडत नाही. उलट मध्येच पेट्रोलचा फ्लो कमी होतो. यामुळे गाडी ओव्हरटेक करताना असा प्रकार घडला, तर अपघाताचा धोका निर्माण होतो.

मेकॅनिक काय म्हणतात...इथेनॉलमुळे गाडीचा वेग कमी केला तरी गाडी वेगाने चालते. ब्लॉक पिस्टल आणि कार्बोरेटर पिस्टल खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे, असे दुचाकी मेकॅनिक आशिक निर्बान यांनी सांगितले. बीएस ४ मॉडेलमध्ये हा प्रकार उदभवत आहे. बीएस ६ या मॉडेलमध्येही अशा तक्रारी येत आहेत. गाडी घरघर करण्याचे प्रमाण वाढल्याचे मेकॅनिक पवन सराफ म्हणाले.

असे वाढले इथेनॉलचे प्रमाणप्रारंभी पेट्रोलमध्ये ५ टक्के इथेनॉल होते. ते प्रमाण नंतर ८ टक्के झाले, त्यानंतर १० टक्के, १२ टक्के आणि आता ते थेट २० टक्के झाले आहे.

ग्राहकांकडून तक्रार नाही"पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण वाढल्यामुळे दुचाकी किंवा चारचाकीच्या इंजीनमध्ये बिघाड होत असल्याची कुठलीही तक्रार आपल्याकडे आलेली नाही. दररोज शेकडो गाड्यांची सर्व्हिसिंग होते. ग्राहकांकडून नियमित फीडबॅक घेतले जातात, पण अशा आशयाच्या तक्रारी अद्यापतरी कुणी केलेली नाही."- अचल गांधी, व्यवस्थापकीय संचालक, ए. के. गांधी टीव्हीएस

"वाहनातील पेट्रोल काढल्यानंतर यात पेट्रोलवर पाण्यासारखा थर तरंगताना दिसतो. वाहन दुरुस्ती करताना हा प्रकार प्रामुख्याने दिसतो. हा प्रकार म्हणजेच इथेनॉल असावे, असा अंदाज आहे."- संजय गंपावार, बॉडी सॅफ मॅनेजर, नेक्सा कंपनी

"पूर्वी वाहन सुरू होत नाही अथवा गीअर पडत नाही, अशी एखादीच तक्रार येत होती. आता दर दिवसाला ८ ते १० वाहने अशा तक्रारींची येत आहेत. यात बॅटरी जात नाही तर इंजेक्टर खराब होत आहे. चार ते आठ इंजेक्टर बदलावे लागतात. एक इंजेक्टर १४०० रुपयांचे आहे."- दिनेश उजवने, मारुती शोरूम, कंपनी

टॅग्स :nagpurनागपूरYavatmalयवतमाळVidarbhaविदर्भ