शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

तृतीयपंथीयांना मिळणार स्वत:ची ‘ओळख’?

By admin | Updated: January 31, 2015 02:16 IST

सामाजिक जीवनातील भाग असतानादेखील तृतीयपंथीयांना अनेक अधिकारांपासून वंचित रहावे लागते. विशेषत: शिक्षण घेत असताना एखादा अर्ज भरत असताना स्वत:ची ओळख ...

योगेश पांडे नागपूर सामाजिक जीवनातील भाग असतानादेखील तृतीयपंथीयांना अनेक अधिकारांपासून वंचित रहावे लागते. विशेषत: शिक्षण घेत असताना एखादा अर्ज भरत असताना स्वत:ची ओळख नेमकी काय सांगावी हा प्रश्न त्यांच्यासमोर नेहमीच पडतो. परंतु विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशांनुसार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात लवकरच तृतीयपंथीयांना स्वत:ची वेगळी ओळख मिळणार आहे. विविध अर्जांमध्ये लिंगओळख सांगणारा ‘तृतीयपंथी’ हा एक वेगळा रकाना ठेवण्याबाबत शनिवारी होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. विद्यापीठाच्या विद्वत परिषदेने याला अगोदरच मान्यता दिली आहे.साधारणत: परीक्षा किंवा शिष्यवृत्ती अर्जावर तृतीयपंथी विद्यार्थ्यांना स्वत:ची ओळख केवळ ह्यस्त्रीह्ण अथवा ह्यपुरुषह्ण या दोन रकान्यांपैकी एकामध्ये ह्ययोग्यह्णची खूण करून करून द्यावी लागते. त्यामुळे ‘तृतीयपंथी’ उमेदवारांसमोर अडचण निर्माण होते. स्वत:ची नेमकी ओळख सांगता येत नसल्यामुळे मनातल्या मनात घुसमटदेखील होते. संविधानानुसार तृतीयपंथीयांना त्यांची ओळख सांगण्याचा अधिकार आहे व यासाठी पावले उचलण्यात यावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. याचा आधार घेत विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे नागपूर विद्यापीठासह देशातील सर्वच विद्यापीठांना पत्र पाठविण्यात आले होते. यूजीसीच्या निर्देशांमुळे या विद्यार्थ्यांना स्वतंत्र रकाना उपलब्ध करून द्यावा लागणार आहे. तृतीयपंथी विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय व विद्यापीठात स्वतंत्र स्वच्छतागृहे, कॉमनरुम इत्यादी सुविधा देण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने दिले आहेत. शिवाय तृतीयपंथीयांबाबत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी अभ्यासक्रमातदेखील त्यांच्याबाबत योग्य माहितीचा समावेश करण्यात यावा. तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्यासाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्याची गरज असल्याच्या सूचनादेखील आयोगाने केल्या आहेत. या पत्रावर २७ नोव्हेंबर रोजी झालेल्या विद्वत परिषदेच्या बैठकीत चर्चा करण्यात आली होती. सखोल चर्चेनंतर या बदलांना मान्यता देण्यात आली होती व पुढील मान्यतेसाठी व्यवस्थापन परिषदेकडे हा मुद्दा वर्ग करण्यात आला होता. त्यानुसार शनिवारी होणाऱ्या विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीच्या कार्यक्रम पत्रिकेत या मुद्द्याचा समावेश करण्यात आला असून यावर चर्चा होणे अपेक्षित आहे. व्यवस्थापन परिषदेने जर हिरवी झेंडी दाखवली तर यापुढे स्वत:ची स्वतंत्र ओळख सांगण्याची संधी तृतीयपंथीयांना विद्यापीठात मिळणार आहे.