शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
2
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
5
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
6
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
7
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
8
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
9
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
10
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
11
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
12
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
13
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
14
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
15
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
16
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
17
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
18
Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट
19
Navratri 2025: नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे; घरी कुंकुमार्चन करून मिळवा देवी कृपा!
20
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 

आकाशाला गवसणी घालणारे संशोधन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 19:35 IST

संशोधन पॅशन आहे. ते २४ बाय ७ असते. संशोधन एक दिवसाचे, एका आठवड्याचे किंवा एका वर्षाचे कधीच होऊ शकत नाही. त्यामुळे नव्या पिढीने पदवी शिक्षणापासून संशोधनाची कास धरावी. संशोधनाला बंदिस्त न ठेवता ते आकाशाला गवसणी घालणारे आणि अधिक समाजोपयोगी कसे होईल, याकडे लक्ष देण्याचे आवाहन मुंबई विद्यापीठाचे प्रा. पद्मविभूषण डॉ.एम.एम.शर्मा यांनी केले.

ठळक मुद्देएम.एम.शर्मा यांचे आवाहन : स्व. दादासाहेब काळमेघ महाविद्यालयात संशोधन दिवस

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : संशोधन पॅशन आहे. ते २४ बाय ७ असते. संशोधन एक दिवसाचे, एका आठवड्याचे किंवा एका वर्षाचे कधीच होऊ शकत नाही. त्यामुळे नव्या पिढीने पदवी शिक्षणापासून संशोधनाची कास धरावी. संशोधनाला बंदिस्त न ठेवता ते आकाशाला गवसणी घालणारे आणि अधिक समाजोपयोगी कसे होईल, याकडे लक्ष देण्याचे आवाहन मुंबई विद्यापीठाचे प्रा. पद्मविभूषण डॉ.एम.एम.शर्मा यांनी केले.स्व.दादासाहेब काळमेघ दंत महाविद्यालय आणि रुग्णालयाच्यावतीने दादासाहेब काळमेघ यांच्या ८५ जयंती वर्षानमित्त संशोधन दिनाचे आयोजन शुक्रवारी वानाडोंगरी येथे करण्यात आले होते. यावेळी डॉ. शर्मा यांनी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या  विद्यार्थ्यांशी संवाद साधला.नव्या पिढीतील संशोधनात्मक कृतीचे कौतुक करीत प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा सध्या त्यांच्या क्षेत्रात जे नवीन घडते आहे त्याची माहिती विद्यार्थ्यांनी द्यावी. पुस्तकी शिक्षणाने संशोधनात्मक पिढी कधीही घडणार नाही. याउलट प्राध्यापक अपडेट नाही असा ग्रह विद्यार्थी करतील, अशी कोपरखळी त्यांनी उपस्थित प्राध्यापकांना मारली.संशोधनाच्या क्षेत्रात काळमेघ दंत महाविद्यालयाने टाकलेल्या पावलाचे कौतुक करीत या महाविद्यालयाने दंतचिकित्सा आणि संशोधन क्षेत्रात उत्कृ ष्ट कामगिरी बजवावी, असे आवाहनही यावेळी केले. दंतचिकित्सा क्षेत्रात सध्या आमूलाग्र बदल होत आहे. दातांची काळजी आता केवळ अप्पर क्लास घेत नाही तर सामान्य माणूसही आता याबाबत सजग झाला असल्याने या क्षेत्रात चांगल्या संशोधनाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना चांगल्या आणि माफक दरात दंत आरोग्य सेवा कशी मिळेल, याकडे महाविद्यालय आणि संशोधकांनी लक्ष देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.आयसीटी मुंबईचे कुलगुरु पद्मश्री डॉ. जी.डी.यादव, स्व. दादासाहेब काळमेघ स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. शरद काळमेघ, सचिव हेमंत काळमेघ, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय पाटील, उद्योजक अरुण लखानी, संजय चौगुले,डॉ. सतीश लाडे, शशांक म्हस्के, संजय देशमुख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.संशोधनाच्या क्षेत्रात महाविद्यालयाने घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती डॉ. शरद काळमेघ यांनी याप्रसंगी दिली. यासोबतच संशोधनाच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाºया विद्यार्थी आणि शिक्षकाला वर्षाला प्रत्येकी १ लाख १ रुपयांचा पुरस्कार देण्याचे त्यांनी याप्रसंगी जाहीर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिष्ठाता डॉ. संजय पाटील यांनी केले.मुली शिकतील तरच लोकसंख्येवर नियंत्रणकेंद्र सरकारने मुलींना पहिली ते पीएच.डी पर्यंतचे शिक्षण मोफत देण्याची मागणी डॉ.जी.डी.यादव यांनी यावेळी केली. तत्कालीन मनुष्यबळ विकास मंत्री अर्जुनसिंग यांच्याकडे तसा प्रस्ताव ठेवला होता, असे सांगताना ते म्हणाले की, भारतात १० वी १२ बारावीपर्यंत मुलगी शिकली की तिचे वडील लग्न लावतात. मुलींना न शिकविण्यामागे आर्थिक परिस्थिती हेही कारण आपल्याकडे आहे. त्यामुळे सरकारने मुलींचे पीएच.डी.पर्यंतचे शिक्षण मोफत केले तर मुली अधिक उच्चशिक्षित होतील. उच्च शिक्षण घेताना त्यांचे वयही वाढले. पर्यायाने लग्न उशिरा होईल आणि शिक्षित माता लोकसंख्या नियंत्रणाचे प्रभावी माध्यम ठरेल, असे मत यादव यावेळी मांडले. दादासाहेब काळमेघ यांच्या सामाजिक विचाराप्रमाणेच त्यांच्या नावाने चालणाऱ्या महाविद्यालयातील संशोधन समाजोपयोगी कसे होईल, याकडे लक्ष देण्याचे आवाहन महाविद्यालयातील संशोधक आणि प्राध्यापकांना यावेळी केले.

टॅग्स :Healthआरोग्यStudentविद्यार्थी