शहरं
Join us  
Trending Stories
1
नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
2
अखेर ठरलं! दोन्ही राष्ट्रवादी महापालिकेत एकत्र लढणार; अजित पवार यांची घोषणा
3
काळजाचा थरकाप! पती-पत्नीने जंगलात प्रवास थांबविला; ५ वर्षांचा चिमुरडा रात्रभर मृतदेहांपाशी बसून राखण करत होता
4
नव्या वर्षात लोकलप्रवास होणार अधिक वेगवान; ७४९ नव्या लोकल फेऱ्या; १३३ मेल-एक्सप्रेस धावणार
5
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex मध्ये १०० अंकांची तेजी; Hindustan Copper सुस्साट
6
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
7
थंडीत बाईक चालवताय, मग अँटी-फॉग वाइझर हेल्मेट वापरुन पाहा ना; काय आहे खास, जाणून घ्या
8
तुम्ही तुमचा स्मार्टफोन कसा ठेवता? उलटा की सुलटा... ९९ टक्के भारतीय अनभिज्ञ...
9
मंगेश काळोखे हत्या; चोवीस तासांत नऊ जेरबंद; सर्व आरोपींना ४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
10
हात-पाय बांधले, हत्या केली अन् चेहरा जाळला; नोएडातील डंपिंग ग्राऊंडवर तरुणीचा छिन्नविच्छिन्न देह सापडला!
11
Gold Silver Price: खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
12
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
13
काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, पण वर्षा गायकवाड कुठे दिसल्या नाहीत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
14
‘वंचित’ला ठाकरेंची साथ, भाजपा वगळून शिंदे-अजितदादा एकत्र; राज्यात युती, आघाडीचे काय चित्र?
15
‘ते मरावेत’, असं झेलेन्स्की यांना का वाटतं?
16
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
17
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
18
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
19
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
20
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
Daily Top 2Weekly Top 5

पक्षकारांच्या दारात न्याय देण्याचे तत्त्व का विसरता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 23:18 IST

पक्षकारांना जलदगतीने व कमी खर्चात न्याय उपलब्ध करून देण्यासाठी देशात ‘न्याय आपल्या दारी’ हे तत्त्व राबविले जात आहे. राज्य सरकारने एका प्रकरणात या तत्त्वाला धक्का पोहोचेल असे वर्तन केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी नाराजी व्यक्त केली. तसेच, ‘न्याय आपल्या दारी’ हे तत्त्व का विसरता असा सवाल उपस्थित करून जबाबदाऱ्या सक्षमपणे पूर्ण करण्याची सूचना केली.

ठळक मुद्देहायकोर्टाने सरकारला फटकारले : जबाबदाऱ्या पूर्ण करण्याची सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पक्षकारांना जलदगतीने व कमी खर्चात न्याय उपलब्ध करून देण्यासाठी देशात ‘न्याय आपल्या दारी’ हे तत्त्व राबविले जात आहे. राज्य सरकारने एका प्रकरणात या तत्त्वाला धक्का पोहोचेल असे वर्तन केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी नाराजी व्यक्त केली. तसेच, ‘न्याय आपल्या दारी’ हे तत्त्व का विसरता असा सवाल उपस्थित करून जबाबदाऱ्या सक्षमपणे पूर्ण करण्याची सूचना केली.चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथे न्यायालयासाठी इमारत व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दोन वर्षापूर्वी सर्व प्रकारचे बांधकाम पूर्ण झाले. परंतु, येथे अद्याप न्यायालय सुरू करण्यात आले नाही. काही समाजकंटक येथील बांधकामाची तोडफोड करीत आहेत. तसेच, किमती वस्तू चोरीला जात आहेत. त्यामुळे पवनकुमार मोहितकर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष याचिकेवर सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने हे प्रकरण गंभीरतेने घेऊन सरकारला फटकारले. तसेच, विधी व न्याय विभागाचे सचिव, प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश आणि चंद्रपूर जिल्हाधिकारी यांना नोटीस बजावून यावर २१ मार्चपर्यंत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. अनिल किलोर यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर