शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

स्वत:चा आणि दुसऱ्याचा जीव धोक्यात घालू नका.. तुकाराम मुंढे यांनी दिला धोक्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 14:57 IST

नागरिकांनी अत्यंत जागरुकपणे वागण्याची गरज असल्याचे कळकळीचे निवेदन व कोरोनाबाबत निष्काळजीपणे न वागण्याचे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रविवारी फेसबुकवर केलेल्या लाईव्ह प्रक्षेपणात केले आहे.

ठळक मुद्देऑगस्टमध्ये कोरोना ब्लास्ट चिंताजनक१७ हजारांहून अधिक केसेस व ५०० हून अधिक मृत्यूया परिस्थितीला जबाबदार कोण हा प्रश्न स्वत:ला विचारा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: गेल्या काही दिवसांपासून शहरात झालेला कोरोनाचा ब्लास्ट ही चिंता करण्याची स्थिती असून, नागरिकांनी अत्यंत जागरुकपणे वागण्याची गरज असल्याचे कळकळीचे निवेदन व कोरोनाबाबत निष्काळजीपणे न वागण्याचे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रविवारी फेसबुकवर केलेल्या लाईव्ह प्रक्षेपणात केले आहे.जुलै अखेर व ऑगस्ट महिन्यात नागपुरात कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण एकाएकी वाढले व मृत्यूदरही वाढता असण्यामागे काय कारणे आहेत व त्याचा प्रतिरोध कसा करावा याबाबत त्यांनी आकडेवारीसह माहिती दिली.सध्या नागपुरात १७ हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत व ५०० हून अधिक मृत्यू झाले आहेत.यामागे अनेक कारणे आहेत. यात नागरिक पुरेशी काळजी घेत नसल्याचे आढळून आले आहे. मास्क न वापरणे, सुरक्षित अंतर न राखणे, गर्दी करणे, दवाखान्यात उशीरा जाणे, आजारपण लपवणे, खोकताना वा शिंकताना काळजी न घेणे अशी अनेक कारणे त्यांनी सांगितली.प्रशासन वा सरकार काही करत नाही, असं नागरिक म्हणतात. मात्र नागरिक काय करत आहेत हे ते पाहत नाहीत. सणावारांचे दिवस आहेत. नागरिक खरेदीसाठी बाहेर पडतात. त्यांनी बाहेर पडताना काळजी घेतली पाहिजे. घरातून निघताना व घरी परतल्यावर सर्व काळजीचे नियम पाळले पाहिजेत.नागरिक बाहेर पडताना मास्क घालत नाहीत. समोर पोलीस दिसला की थोडा वेळ मास्क लावतात. नंतर काढून टाकतात. तसे करून ते स्वत:चा जीव तर धोक्यात घालताच पण इतरांचाही घालत असतात.नागपुरात कोरोना वाढतोय यामागे काय कारणे आहेत, हा प्रश्न स्वत:लाच विचारण्याची गरज आहे.मार्च एप्रिलमध्ये नागपुरात तंबाखू, खर्रा खाण्याचे प्रमाण झपाटयाने कमी झाले होते. मात्र जुलै ऑगस्टमध्ये हे प्रमाण पुन्हा पूर्ववत झाल्याचे आढळून आले आहे. हीदेखील एक मोठी चिंतेची गोष्ट आहे. या सोशल निवेदनात त्यांनी अनेक लहानसहान गोष्टींपासून ते मोठ्या बाबींपर्यंतच्या घटकांचा सविस्तर आढावा घेतला.जुन्या व्हिडिओला हेतूपुरस्सरपणे दाखवले जात आहेमार्चमहिन्यात शासनाच्या निर्देशानुसार फक्त डॉक्टर व रुग्णांनी मास्क घालणे अनिवार्य होते. त्यावेळी मी काढलेला व्हिडिओ आता दाखवला जातो आहे. मात्र नंतर सरकारने बदलेल्या निर्देशानुसार आम्ही मास्क घालणे अनिवार्य केला आहे. त्याबाबत सतत माहिती देत आहोत व आवाहन करत आहोत. अशा काळात जुना व्हिडिओ दाखवून नागरिकांची दिशाभूल करणाऱ्यांनी तसे करू नये. हा खोडसाळपणा बंद करावा.

 

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस