शहरं
Join us  
Trending Stories
1
"निकाल आल्यावर कुणाला दोष द्यायचा याची काहींची तयारी सुरु..."; मार्कर मुद्द्यावर CM चा टोला
2
नऊ वर्षे निवडणूक आयुक्त काय करत होते? पगार कशासाठी घेतात? उद्धव ठाकरे संतापले...
3
Maharashtra Municipal Election 2026 Voting LIVE Updates: "आमचा विजय निश्चित, विरोधी पक्ष उद्या काय सांगायचे? याची प्रॅक्टिस करतायेत" - फडणवीस
4
Nota Rules for Re Election : 'नोटा' जिंकला तर पुन्हा निवडणूक, काय आहे संपूर्ण प्रक्रिया?
5
आयटी कंपन्यांवर 'नव्या लेबर कोड'ची संक्रांत! TCS, इन्फोसिसच्या नफ्यात मोठी घट; काय आहे कारण?
6
निवेदिता सराफ मतदार यादीत तासभर नाव शोधत होत्या...; वैतागल्या, एकाच कुटुंबातील तीन ठिकाणी नावे...
7
...तर भगवा ब्रिगेडला पोलीस ठोकून काढतील; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधूंना थेट इशारा
8
"पालिका निवडणुकांसाठी शेअर बाजार बंद ठेवणं खराब नियोजनाचं लक्षण," का म्हणाले नितीन कामथ असं?
9
"निवडून येणारे लोकसेवक असावेत, मालक नव्हे!"; संजय शिरसाठ यांचे विरोधकांना खडे बोल
10
BMC Election 2026: 'हा काय विकास? शाई पुसा आणि पुन्हा मतदान करा!'; राज ठाकरेंचा संताप, 'पाडू' मशीनवरून सरकारला ठणकावले
11
Fitness Tips: जिमच्या मेहनतीवर पाणी फिरवणाऱ्या 'या' ७ चुका आजच थांबवा!
12
भाजप आणि शिंदे सेनेत राडा, काय म्हणाले भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण?
13
स्वतःचा व्यवसाय सुरू करायचाय? मोदी सरकार देतंय ९० हजारांचे कर्ज; अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया
14
'या' देशाकडे आहे जगातील सर्वाधिक १,१०,००० मेट्रिक टन चांदी; पाहा भारताकडे किती आहे चांदीचा साठा
15
भोपाळमध्ये काळाचा घाला! मकर संक्रांतीच्यानिमित्ताने स्नानासाठी निघालेल्या ५ भाविकांचा भीषण अपघातात मृत्यू
16
BMC Election 2026: मोठी बातमी! शाईऐवजी मार्कर निवडणूक आयोगानेच दिला, पुसला जातोय...; मुंबई आयुक्तांची कबुली
17
मतदान केंद्रात शिरला घोणस जातीचा विषारी साप, उडाली खळबळ
18
मुलानेच केला आईचा खून, बंदुकीतून झाडली गोळी, भयानक घटनेनं कोकण हादरलं, धक्कादायक कारण समोर आलं 
19
IIT इंजिनिअर बनला 'डिजिटल धोबी'! ८४ लाखांची नोकरी सोडून उभा केला १६० कोटींचा 'यूक्लीन' ब्रँड
20
६५-७० लढाऊ विमाने घेऊन अमेरिकेची युद्धनौका इराणच्या दिशेने निघाली; समुद्रात मोठी खळबळ...
Daily Top 2Weekly Top 5

सरेंडर इनहाऊस कोट्यातील प्रवेशात भेदभाव करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 21:14 IST

इयत्ता अकरावीमध्ये सरेंडर इनहाऊस कोट्यातील जागांवर प्रवेश देताना अल्पसंख्याक महाविद्यालये व इतर सामान्य महाविद्यालये यांच्यात भेदभाव करू नका. दोन्ही प्रकारच्या महाविद्यालयांबाबत समान धोरण ठेवा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला दिला.

ठळक मुद्देहायकोर्टाचा सरकारला आदेश : इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इयत्ता अकरावीमध्ये सरेंडर इनहाऊस कोट्यातील जागांवर प्रवेश देताना अल्पसंख्याक महाविद्यालये व इतर सामान्य महाविद्यालये यांच्यात भेदभाव करू नका. दोन्ही प्रकारच्या महाविद्यालयांबाबत समान धोरण ठेवा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला दिला.प्रत्येक महाविद्यालयामध्ये २० टक्के इनहाऊस कोटा असतो. त्या जागांवर महाविद्यालये स्वत:च्याच विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकतात. परंतु, महाविद्यालये गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी मिळविण्यासाठी व अन्य विविध करणांनी हा कोटा सरेंडर करतात. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, राज्य सरकारने अल्पसंख्याक महाविद्यालयांना त्यांनी सरेंडर केलेला इनहाऊस कोटा परत केला होता व त्या जागांवर सामान्य महाविद्यालयांतील नियमित जागा भरल्यानंतर प्रवेश दिले जातील असे स्पष्ट केले होते. परंतु, दुसरीकडे सामान्य महाविद्यालयांनी सरेंडर केलेल्या इनहाऊस कोट्यातील जागांवर प्रवेश सुरू ठेवण्यात आले होते. उच्च न्यायालयाचा आदेश सामान्य महाविद्यालयांना लागू नव्हता. मुंबईतील विलेपार्ले अल्पसंख्याक महाविद्यालयाने बुधवारी हा भेदभाव न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. त्यामुळे न्यायालयाने हा भेदभाव दूर करून सरेंडर इनहाऊस कोट्यातील प्रवेशाकरिता दोन्ही प्रकारच्या महाविद्यालयांसाठी समान धोरण ठेवा असा आदेश राज्य सरकारला दिला. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. पुढील सुनावणी ८ आॅगस्ट रोजी निश्चित करण्यात आली.सरेंडर अल्पसंख्याक कोट्यावरील बंधन कायमसरेंडर अल्पसंख्याक कोट्यातील प्रवेशावरील बंधन मात्र, न्यायालयाने कायम ठेवले. त्यामुळे या कोट्यातील जागांवर, सामान्य महाविद्यालयांतील नियमित प्रवेश पूर्ण झाल्यानंतर वाचलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. अल्पसंख्याक महाविद्यालयांतील इयत्ता अकरावीमध्ये ५० टक्के अल्पसंख्याक कोटा असतो. हा कोटा विविध कारणांनी सरेंडर केला जातो. याद्वारे अल्पसंख्याक महाविद्यालये दुहेरी फायदे मिळवितात. ते एकीकडे सरकारकडून अल्पसंख्याकाचे लाभ घेतात व दुसरीकडे अल्पसंख्याक कोट्यातून गुणवत्ताप्राप्त विद्यार्थीही मिळवितात. या बेकायदेशीर कृतीमुळे सामान्य शिक्षण संस्थांच्या महाविद्यालयांना पुरेसे विद्यार्थी मिळत नाहीत. याविरुद्ध स्त्री शिक्षण प्रसारक मंडळासह एकूण पाच शिक्षण संस्थांनी रिट याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने ती याचिका जनहित याचिकेमध्ये परिवर्तित केली. अ‍ॅड. भानुदास कुलकर्णी यांनी याचिकेचे कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयSchoolशाळा