शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

सरेंडर इनहाऊस कोट्यातील प्रवेशात भेदभाव करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 21:14 IST

इयत्ता अकरावीमध्ये सरेंडर इनहाऊस कोट्यातील जागांवर प्रवेश देताना अल्पसंख्याक महाविद्यालये व इतर सामान्य महाविद्यालये यांच्यात भेदभाव करू नका. दोन्ही प्रकारच्या महाविद्यालयांबाबत समान धोरण ठेवा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला दिला.

ठळक मुद्देहायकोर्टाचा सरकारला आदेश : इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इयत्ता अकरावीमध्ये सरेंडर इनहाऊस कोट्यातील जागांवर प्रवेश देताना अल्पसंख्याक महाविद्यालये व इतर सामान्य महाविद्यालये यांच्यात भेदभाव करू नका. दोन्ही प्रकारच्या महाविद्यालयांबाबत समान धोरण ठेवा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला दिला.प्रत्येक महाविद्यालयामध्ये २० टक्के इनहाऊस कोटा असतो. त्या जागांवर महाविद्यालये स्वत:च्याच विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकतात. परंतु, महाविद्यालये गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी मिळविण्यासाठी व अन्य विविध करणांनी हा कोटा सरेंडर करतात. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, राज्य सरकारने अल्पसंख्याक महाविद्यालयांना त्यांनी सरेंडर केलेला इनहाऊस कोटा परत केला होता व त्या जागांवर सामान्य महाविद्यालयांतील नियमित जागा भरल्यानंतर प्रवेश दिले जातील असे स्पष्ट केले होते. परंतु, दुसरीकडे सामान्य महाविद्यालयांनी सरेंडर केलेल्या इनहाऊस कोट्यातील जागांवर प्रवेश सुरू ठेवण्यात आले होते. उच्च न्यायालयाचा आदेश सामान्य महाविद्यालयांना लागू नव्हता. मुंबईतील विलेपार्ले अल्पसंख्याक महाविद्यालयाने बुधवारी हा भेदभाव न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. त्यामुळे न्यायालयाने हा भेदभाव दूर करून सरेंडर इनहाऊस कोट्यातील प्रवेशाकरिता दोन्ही प्रकारच्या महाविद्यालयांसाठी समान धोरण ठेवा असा आदेश राज्य सरकारला दिला. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. पुढील सुनावणी ८ आॅगस्ट रोजी निश्चित करण्यात आली.सरेंडर अल्पसंख्याक कोट्यावरील बंधन कायमसरेंडर अल्पसंख्याक कोट्यातील प्रवेशावरील बंधन मात्र, न्यायालयाने कायम ठेवले. त्यामुळे या कोट्यातील जागांवर, सामान्य महाविद्यालयांतील नियमित प्रवेश पूर्ण झाल्यानंतर वाचलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. अल्पसंख्याक महाविद्यालयांतील इयत्ता अकरावीमध्ये ५० टक्के अल्पसंख्याक कोटा असतो. हा कोटा विविध कारणांनी सरेंडर केला जातो. याद्वारे अल्पसंख्याक महाविद्यालये दुहेरी फायदे मिळवितात. ते एकीकडे सरकारकडून अल्पसंख्याकाचे लाभ घेतात व दुसरीकडे अल्पसंख्याक कोट्यातून गुणवत्ताप्राप्त विद्यार्थीही मिळवितात. या बेकायदेशीर कृतीमुळे सामान्य शिक्षण संस्थांच्या महाविद्यालयांना पुरेसे विद्यार्थी मिळत नाहीत. याविरुद्ध स्त्री शिक्षण प्रसारक मंडळासह एकूण पाच शिक्षण संस्थांनी रिट याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने ती याचिका जनहित याचिकेमध्ये परिवर्तित केली. अ‍ॅड. भानुदास कुलकर्णी यांनी याचिकेचे कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयSchoolशाळा