शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत जिल्हानिहाय प्रभारी मंत्री : चंद्रशेखर बावनकुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 21:54 IST

राज्य शासनाच्या पाच वर्षांतील कामांचा हिशेब जनतेपुढे ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथून १ ऑगस्टपासून प्रारंभ होणार आहे. या महाजनादेश यात्रेत जिल्हानिहाय मंत्र्यांकडेदेखील जबाबदारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांसमवेत प्रत्येक जिल्ह्याचे प्रभारी मंत्री यात्रेत राहतील, अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. सोमवारी आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.

ठळक मुद्देनागपुरात होणार ‘रोड शो’, जिल्ह्यात सभा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य शासनाच्या पाच वर्षांतील कामांचा हिशेब जनतेपुढे ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथून १ ऑगस्टपासून प्रारंभ होणार आहे. या महाजनादेश यात्रेत जिल्हानिहाय मंत्र्यांकडेदेखील जबाबदारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांसमवेत प्रत्येक जिल्ह्याचे प्रभारी मंत्री यात्रेत राहतील, अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. सोमवारी आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.महाजनादेश यात्रेचा पहिला टप्पा हा प्रामुख्याने विदर्भातील जिल्ह्यांमध्ये राहणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात ही यात्रा पोहोचल्यानंतर तेथील मंत्री मुख्यमंत्र्यांसोबत राहतील. याशिवाय प्रत्येक जिल्ह्यातील खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी यांच्यासह पदाधिकारीदेखील उपस्थित राहतील. ४,३८४ किलोमीटरचा प्रवास झाल्यानंतर या यात्रेचा ३१ ऑगस्ट रोजी नाशिक येथे समारोप होईल.शहांबाबत ‘सस्पेन्स’ कायममुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या उद्घाटनाला केंद्रीय नेते येण्याची शक्यता आहे. यावेळी भाजपाध्यक्ष अमित शहा हेदेखील उपस्थित राहू शकतात. यासंदर्भात बावनकुळे यांना विचारले असता याची अंतिम माहिती प्रदेश पातळीवरून येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.नागपुरात २ ऑगस्ट रोजी यात्रानागपूर शहरात २ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता महाजनादेश यात्रा पोहोचेल. वर्धा मार्ग ते काटोल मार्ग यादरम्यान मुख्यमंत्र्यांचा ‘रोड शो’ असेल. चिंचभुवन, विमानतळ, सोमलवाडा, व्हेरायटी चौक, सदर, मेश्राम चौक, गिट्टीखदान, फेटरी असा हा मार्ग असेल. तर ३ ऑगस्ट रोजी रेल्वे स्थानक, मेयो इस्पितळ, गांधी पुतळा, टेलिफोन एक्सचेंज चौक, पारडी चौक या मार्गाने यात्रा मौद्याकडे जाईल. यादरम्यान काही ठिकाणी मुख्यमंत्र्यांचे स्वागतदेखील करण्यात येईल. नागपूर शहरात मुख्यमंत्र्यांची एकही सभा होणार नाही. नागपूर जिल्ह्यात २ ऑगस्ट रोजी काटोल, सावनेर येथे सभा होईल.असा राहणार महाजनादेश यात्रेचा मार्ग    (प्रभारी मंत्री)१ ऑगस्ट : गुरुकुंज मोझरी, तळेगाव, आर्वी, पुलगाव, वर्धा (डॉ.अनिल बोंडे)२ ऑगस्ट : पवनार, सेलू, बुटीबोरी, नागपूर, काटोल, सावनेर (चंद्रशेखर बावनकुळे)३ ऑगस्ट : नागपूर, मौदा, भंडारा, तुमसर, तिरोडा, गोंदिया (डॉ.परिणय फुके)४ ऑगस्ट : गोंदिया, सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव, वडसा, ब्रम्हपुरी, आरमोरी, गडचिरोली (डॉ.परिणय फुके, सुधीर मुनगंटीवार)५ ऑगस्ट : गडचिरोली, मूल, चंद्रपूर, वरोरा, भद्रावती, माढई, वडकी, राळेगाव, कळंब, यवतमाळ (सुधीर मुनगंटीवार, अशोक उईके)६ ऑगस्ट : यवतमाळ, दारव्हा, कारंजा, मूर्तिजापूर, बोरगाव, अकोला (मदन येरावार, डॉ.रणजित पाटील)ऑगस्ट : अकोला, बाळापूर, शेगाव, खामगाव, मलकापूर, जामनेर (डॉ.संजय कुटे)८ ऑगस्ट : जामनेर, भुसावळ, जळगाव (गिरीश महाजन)पाणीटंचाईबाबत ‘सोशल मीडिया’तून जनतेशी संवादसद्यस्थितीत नागपूर शहरात पाणीकपात करण्यात आली असून, एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. यासंदर्भात बावनकुळे यांना विचारले असता, पाण्याचे संकट हे नैसर्गिक आपत्ती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जोपर्यंत तोतलाडोहमध्ये पुरेसे पाणी येत नाही, तोपर्यंत नागपूर शहरात पाणीकपात सुरूच राहणार. जनतेला या संकटाची जाण आहे. लोक सुशिक्षित असून ते संयम बाळगत आहेत. ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत संकटांची कारणे पटवून सांगू, असे त्यांनी सांगितले. काँग्रेसची राज्यात सत्ता असताना त्यांनी चौराईविरोधात अवाक्षर काढले नाही. आता आंदोलन कसे काय करतात, असा प्रश्नदेखील त्यांनी केला.आता जिल्ह्यात ‘नो इनकमिंग’नागपूर जिल्ह्यातील काँग्रेसचे काही नेते भाजपात येणार का, अशी विचारणा केली असता बावनकुळे यांनी त्यास नकार दिला. नागपूर जिल्ह्यात काँग्रेसची बी टीम भाजपासमवेतच आहे. काही मोजके नेते सोडले तर कार्यकर्ते कधीच भाजपात आले आहेत. आता ‘कोटा फुल्ल’ झाला आहे. त्यामुळे उरलेल्या नेत्यांनी काँग्रेसमध्येच थांबावे, असा टोला बावनकुळे यांनी मारला.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेMediaमाध्यमे