शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जिल्हाप्रमुख, दोन उपजिल्हाप्रमुख शिंदे गटात, निष्ठावंतांना कुठलीही नियुक्ती पडेना पदरात

By कमलेश वानखेडे | Updated: August 8, 2022 13:25 IST

शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता वाढतेय, आता तरी मुंबईने लक्ष द्यावे

नागपूर : शिवसेनेचे एक जिल्हाप्रमुख, दोन उपजिल्हाप्रमुख व तीन तालुकाप्रमुख यांनी शिंदे गटाचा रस्ता धरला. मात्र, शिवसेनेकडून अद्याप या पदांवर नव्याने नियुक्त्या झालेल्या नाहीत. यामुळे खासदार-आमदारांसोबत न गेलेल्या व आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत, असे ठासून सांगणाऱ्या शिवसैनिकांचा आता संयम सुटू लागला आहे. पुन्हा गळती लागण्यासाठी आता तरी मुंबईच्या नेत्यांनी वेळीच लक्ष द्यावे, अशी भावना शिवसैनिक व्यक्त करू लागले आहेत.

सर्वप्रथम रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल हे शिंदे गटात गेले; पण आपण शिवसेनेतच असल्याचा त्यांचा दावा आहे. जयस्वाल यांच्यासोबत रामटेक विधानसभेचे उपजिल्हाप्रमुख वर्धराज पिल्ले, पारशिवनीचे तालुका प्रमुख राजू भोसकर व रामटेकचे तालुका प्रमुख विवेक तुरक हेदेखील गेले. त्यांनतर, त्यानंतर खासदार कृपाल तुमाने हेदेखील शिंदे गटात सहभागी झाले. त्यांच्या स्वागतासाठी जिल्हाप्रमुख संदीप इटकेलवार हे विमानतळावर पोहोचले होते व त्यांनी आपण तुमाने यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट केले.

इटकेलवार यांच्याकडे उमरेड, कामठी, रामटेक या तीन विधानसभा मतदारसंघांचा प्रभार होतो. यानंतर तुमाने यांच्यासोबत काटोल विधानसभेची जबाबदारी असलेले उपजिल्हाप्रमुख धोटे व कुही येथील तालुकाप्रमुख यॅडके हेदेखील गेले. मात्र, या पदांवर शिवसेनेकडून अद्याप कुणाचीही नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत असे सांगणाऱ्या शिवसैनिकांमध्येही असंतोष पसरू लागला आहे. संपर्कप्रमुख सुधीर सूर्यवंशी यांनी वेळीच ही वास्तविकता मुंबईच्या नेत्यांच्या निदर्शनास आणून देण्याची गरज कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.

प्रकाश जाधव नेत्यांना भेटले

माजी खासदार प्रकाश जाधव हे गेल्या आठवड्यात मुंबईतील शिवसेना नेत्यांची भेट घेऊन आले. त्यांनी जिल्हाध्यक्ष पदासाठी एक-दोन नावे सुचविली असल्याची माहिती आहे. मात्र, नेत्यांनी सुचविलेल्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यापूर्वी मुंबईतील नेत्यांनी त्रयस्त यंत्रणे मार्फत संबंधितांच्या क्षमतेची माहिती घ्यावी, अशी काही पदा धिकाऱ्यांची सूचना आहे.

नागपूरची जबाबदारी घेणारे संजय राऊत ईडीच्या फेऱ्यात

खासदार संजय राऊत यांनी नागपूरची जबाबदारी घेतली होती. त्यांनी सुमारे चार ते पाच वेळा नागपूरचा दौरा करीत पदाधिकाऱ्यांच्या बैठका व सामान्य कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. मात्र, आता राऊत यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. त्यामुळे आता त्याच तोडीच्या नेत्याने नागपूरची जबाबदारी घ्यावी व नियुक्त्यांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणShiv Senaशिवसेनाnagpurनागपूर