शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

कर्जवाटपात जिल्हा सहकारी बँकांची आघाडी

By admin | Updated: November 7, 2016 02:49 IST

२०१५-१६ वर्षाच्या खरीप व रब्बी हंगामात मिळून नागपूर विभागातील शेतकऱ्यांना अडीच हजार कोटींचे कर्जवाटप करण्यात आले.

वर्षभरात शेतकऱ्यांना अडीच हजार कोटींचे कर्ज : ८० टक्के लक्ष्यांक गाठण्यात यश नागपूर : २०१५-१६ वर्षाच्या खरीप व रब्बी हंगामात मिळून नागपूर विभागातील शेतकऱ्यांना अडीच हजार कोटींचे कर्जवाटप करण्यात आले. विभागात कर्जवाटपाचे ठरविण्यात आलेल्या लक्ष्यांकापैकी ८० टक्के कर्जवाटप करण्यात यश आले आहे. विशेष म्हणजे कर्जवाटपात जिल्हा सहकारी बँकांनी आघाडी घेतल्याचे चित्र आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी सहकारी संस्थांच्या विभागीय सहनिबंधकांकडे शेतकऱ्यांना झालेल्या पीककर्ज वाटपासंदर्भात विचारणा केली होती. २०१५-१६ मध्ये किती शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यात आले, कुठल्या बँकांमार्फत किती कर्ज देण्यात आले, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त किती पीक कर्ज देता येते इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार २०१५-१६ मध्ये नागपूर विभागातील ६ जिल्ह्यांत ३ हजार ३३५ कोटी ४५ लाख इतक्या कर्ज वाटपाचे लक्ष्यांक ठेवण्यात आले होते. यापैकी २ हजार ६८७ कोटी २९ लाख ४८ हजार रुपयांची रक्कम कर्ज म्हणून शेतकऱ्यांना देण्यात आली. एकूण लक्ष्यांकांपैकी ८०.५७ टक्के उद्दिष्ट गाठण्यात यश आले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी, राष्ट्रीयीकृत व ग्रामीण बँकांच्या माध्यमातून हे कर्जवाटप झाले. नागपूर विभागात या तिन्ही प्रकारच्या बँका मिळून ४ लाख ७७ हजार ७४१ सदस्य आहेत. एकूण झालेल्या कर्जवाटपापैकी ठरविलेले लक्ष्यांक गाठण्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना सर्वात जास्त यश आले. या बँकांमार्फत ८३५ कोटी ५९ लाख ४८ हजार इतके कर्ज वाटण्यात आले व एकूण लक्षांकापैकी ९५.३८ टक्के रकमेचे वाटप झाले. राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये हाच आकडा १ हजार ६७५ कोटी ६२ लाख (७५.४३ टक्के) व ग्रामीण बँकांत १७६ कोटी ८ लाख (७३.९१ टक्के) इतका होता.(प्रतिनिधी)यंदाच्या खरीपात ९३ टक्के लक्ष्यांक गाठण्यात यशदरम्यान, यंदाच्या खरीप हंगामात एकूण लक्ष्यांकापैकी ९३.२२ टक्के रक्कमेचे वाटप करण्यात आले. २० सप्टेंबरपर्यंत नागपूर विभागात ४ लाख २२ हजार सभासदांना २ हजार ८३५ कोटी ६० लाख ६५ हजारांचे कर्जवाटप करण्यात आले. नागपूर जिल्ह्यात लक्षांकाहून अधिक कर्जवाटपनागपूर जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामातील लक्ष्यांकाहून अधिक कर्जवाटप करण्यात आले. कर्जवाटपाचे लक्ष्य ७६८ कोटी १ लाख होते. प्रत्यक्षात ८८ हजार ६९४ सदस्यांना ८६१ कोटी ६० लाख ७२ हजारांचे कर्जवाटप करण्यात आले. ही टक्केवारी ११२.१९ टक्के आहे.