शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

राज्यात पहिल्यांदाच होणार आॅटिझम प्रमाणपत्राचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 10:16 IST

स्वमग्नता प्रमाणपत्र देण्याच्या दिशेने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) व जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राने पुढाकार घेतला. परिणामी, राज्यात पहिल्यांदाच नागपुरात ४० रुग्णांना या आजाराचे प्रमाणपत्र वितरित केले जाणार आहे.

ठळक मुद्दे६० मुलांची निवडमेडिकल व जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘आॅटिझम’ म्हणजेच स्वमग्नता हा आजार नसून ती मेंदूच्या विकासाशी संबंधित अवस्था आहे. भारतात सामान्यपणे ११० मुलांमागे एका मुलात स्वमग्नता आढळून येते. या मुलांना आतापर्यंत या आजाराचे स्वतंत्र प्रमाणपत्र मिळत नव्हते. यामुळे शासकीय लाभांपासून ते वंचित राहायचे. विशेषत: दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांना सुविधा मिळत नव्हत्या. अखेर स्वमग्नता प्रमाणपत्र देण्याच्या दिशेने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) व जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राने पुढाकार घेतला. परिणामी, राज्यात पहिल्यांदाच नागपुरात बुधवारी ४० रुग्णांना या आजाराचे प्रमाणपत्र वितरित केले जाणार आहे.लहान मुलांमध्ये आॅटिझम हा आजार बळावत आहे. अशा मुलांचा विकास सामान्य मुलांप्रमाणे होत नाही, काही मुले आक्रमक तर काही मुले भित्रीही असतात. आॅटिझमची लक्षणे शक्यतो पालकांच्या लक्षात येत नाहीत.वयाच्या तिसऱ्या वर्षी ही लक्षणे मुलांमध्ये दिसू लागतात. तीन वर्षांनंतर मूल अचानक बोलायचे थांबते. कानाची तपासणी केली तरी त्यात दोष आढळत नाही. या काळात मूल बोलत नाही आपल्या गरजा सांगत नाही. आंघोळ, जेवण यालाही मूल प्रतिकार करायला लागते. दैनंदिन कार्यक्रम थोडा जरी बदलला तरी त्यांना राग येतो. काही मुले त्यातून बरीच हिंसकही होतात. प्रत्येक मुलातील लक्षणे वेगवेगळी असतात. यामुळे त्यांच्याकडे वैयक्तिक लक्ष देणे गरजेचे असते.‘आॅटिझम’वर औषधे नाही, परंतु विविध थेरपीमुळे त्यांना बरीच मदत होते. या मुलांना दिव्यांग मुलांसारखेच शासकीय लाभ मिळण्यासाठी यांच्या स्वतंत्र आजाराचे प्रमाणपत्र दिले जात नव्हते. त्यांना मानसिक रुग्ण प्रमाणपत्र मिळायचे. दहावी व बारावीच्या शिक्षणातही विविध सोई मिळत नव्हत्या. या संदर्भाचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. अखेर याची दखल मेडिकल व जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राने घेतली. मेडिकलच्या मनोविकृतीशास्त्र विभागाला केंद्राने एका मानसोपचार तज्ज्ञाची मदत केल्याने या प्रमाणपत्रासाठी रुग्णांची आवश्यक चाचणी करणे शक्य झाले.मनोविकृतीशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. मनीष ठाकरे ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, स्वमग्नता प्रमाणपत्र राज्यात पहिल्यांदाच दिले जात आहे. यासाठी आलेल्यांची तपासणी करून ६० जणांची निवड केली. यातील ४० जणांना प्रमाणपत्र वितरित केले जाईल. यावेळी जिल्हाधिकारी आशिष मुदगल व मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे उपस्थित राहतील.

टॅग्स :Healthआरोग्य