शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

राज्यात पहिल्यांदाच होणार आॅटिझम प्रमाणपत्राचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 10:16 IST

स्वमग्नता प्रमाणपत्र देण्याच्या दिशेने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) व जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राने पुढाकार घेतला. परिणामी, राज्यात पहिल्यांदाच नागपुरात ४० रुग्णांना या आजाराचे प्रमाणपत्र वितरित केले जाणार आहे.

ठळक मुद्दे६० मुलांची निवडमेडिकल व जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘आॅटिझम’ म्हणजेच स्वमग्नता हा आजार नसून ती मेंदूच्या विकासाशी संबंधित अवस्था आहे. भारतात सामान्यपणे ११० मुलांमागे एका मुलात स्वमग्नता आढळून येते. या मुलांना आतापर्यंत या आजाराचे स्वतंत्र प्रमाणपत्र मिळत नव्हते. यामुळे शासकीय लाभांपासून ते वंचित राहायचे. विशेषत: दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांना सुविधा मिळत नव्हत्या. अखेर स्वमग्नता प्रमाणपत्र देण्याच्या दिशेने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) व जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राने पुढाकार घेतला. परिणामी, राज्यात पहिल्यांदाच नागपुरात बुधवारी ४० रुग्णांना या आजाराचे प्रमाणपत्र वितरित केले जाणार आहे.लहान मुलांमध्ये आॅटिझम हा आजार बळावत आहे. अशा मुलांचा विकास सामान्य मुलांप्रमाणे होत नाही, काही मुले आक्रमक तर काही मुले भित्रीही असतात. आॅटिझमची लक्षणे शक्यतो पालकांच्या लक्षात येत नाहीत.वयाच्या तिसऱ्या वर्षी ही लक्षणे मुलांमध्ये दिसू लागतात. तीन वर्षांनंतर मूल अचानक बोलायचे थांबते. कानाची तपासणी केली तरी त्यात दोष आढळत नाही. या काळात मूल बोलत नाही आपल्या गरजा सांगत नाही. आंघोळ, जेवण यालाही मूल प्रतिकार करायला लागते. दैनंदिन कार्यक्रम थोडा जरी बदलला तरी त्यांना राग येतो. काही मुले त्यातून बरीच हिंसकही होतात. प्रत्येक मुलातील लक्षणे वेगवेगळी असतात. यामुळे त्यांच्याकडे वैयक्तिक लक्ष देणे गरजेचे असते.‘आॅटिझम’वर औषधे नाही, परंतु विविध थेरपीमुळे त्यांना बरीच मदत होते. या मुलांना दिव्यांग मुलांसारखेच शासकीय लाभ मिळण्यासाठी यांच्या स्वतंत्र आजाराचे प्रमाणपत्र दिले जात नव्हते. त्यांना मानसिक रुग्ण प्रमाणपत्र मिळायचे. दहावी व बारावीच्या शिक्षणातही विविध सोई मिळत नव्हत्या. या संदर्भाचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. अखेर याची दखल मेडिकल व जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राने घेतली. मेडिकलच्या मनोविकृतीशास्त्र विभागाला केंद्राने एका मानसोपचार तज्ज्ञाची मदत केल्याने या प्रमाणपत्रासाठी रुग्णांची आवश्यक चाचणी करणे शक्य झाले.मनोविकृतीशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. मनीष ठाकरे ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, स्वमग्नता प्रमाणपत्र राज्यात पहिल्यांदाच दिले जात आहे. यासाठी आलेल्यांची तपासणी करून ६० जणांची निवड केली. यातील ४० जणांना प्रमाणपत्र वितरित केले जाईल. यावेळी जिल्हाधिकारी आशिष मुदगल व मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे उपस्थित राहतील.

टॅग्स :Healthआरोग्य