शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

जि. प.च्या आणखी १३ शाळांचे दुसऱ्या शाळेत समायोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शिक्षण विभागातर्फे मागील काही वर्षात २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचे किंवा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शिक्षण विभागातर्फे मागील काही वर्षात २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचे किंवा त्या शाळेला लगतच्या शाळेमध्ये समायोजित करण्याचे धोरण राबविण्यात येत आहे. त्यानुसार जिल्ह्यातील आणखी १३ जि. प.च्या शाळांवर गंडांतर येऊ शकते. या शाळा बंद करून तेथील विद्यार्थी व शिक्षकांचे लगतच्या शाळेमध्ये समायोजन करण्याचे शिक्षण विभागाने प्रस्तावित केले आहे.

जिल्ह्यात जि. प.च्या १५३५ शाळा आहेत. पूर्वी या शाळांची संख्या १५५१ इतकी होती. परंतु वर्ष २०१८ मध्ये पटसंख्येअभावी १६ शाळा बंद करून त्यांचे परिसरातील लगतच्या शाळेमध्ये समायोजन करण्यात आले होते. आता पुन्हा अशाच कमी पटाच्या व एक किलोमीटरच्या परिसरात दोन शाळा असलेल्यांपैकी एक शाळा बंद करून त्या शाळेचे दुसऱ्या शाळेमध्ये समायोजन करण्यात येणार आहे. अशा १३ शाळांची निवड करण्यात आली आहे.