शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
2
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
3
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
4
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
5
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
6
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
7
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
8
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
9
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
10
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
11
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
12
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
14
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
15
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
16
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
17
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
18
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
19
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
20
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी

नागपुरात ‘रेड झोन’च्या अट्टहासामुळे नागरिकांमध्ये असंतोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 21:01 IST

शहरातील केवळ काही वस्त्या वगळता इतर भागात कोरोना प्रादुर्भाव नाही. त्यामुळे या भागात उद्योगधंदे सुरू करून नागरिकांना दिलासा देणे अपेक्षित होते. परंतु केवळ मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या अट्टहासामुळे नागपूर शहर रेड झोनमध्ये सामील करण्यात आले. या निर्णयामुळे शहरातील सर्वपक्षीय नेत्यांसोबतच नागरिकांमध्येही असंतोष पसरला असून याचा भडका केव्हाही उडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देभडका उडण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील केवळ काही वस्त्या वगळता इतर भागात कोरोना प्रादुर्भाव नाही. त्यामुळे या भागात उद्योगधंदे सुरू करून नागरिकांना दिलासा देणे अपेक्षित होते. परंतु केवळ मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या अट्टहासामुळे नागपूर शहर रेड झोनमध्ये सामील करण्यात आले. या निर्णयामुळे शहरातील सर्वपक्षीय नेत्यांसोबतच नागरिकांमध्येही असंतोष पसरला असून याचा भडका केव्हाही उडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.मोमिनपुरा, संतरंजीपुरा, शांतिनगर या वस्त्यांमध्ये काही रुग्ण आहेत. इतर ठिकाणी फारसे रुग्ण नाहीत. नागपूरची सध्याची स्थिती पाहता आजवर ४०९ रुग्ण आढळले. त्यातील सात जणांचा मृत्यू झाला आहे, तर २९८ जण आजारातून पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. म्हणजेच सध्या नागपुरात १०४ रुग्ण आहेत. यात तीन जण जिल्ह्याबाहेरचे आहेत. बाधित वस्त्यांना सील करून तेथील नागरिकांची आरोग्य तपासणी, चाचण्या मोठ्या प्रमाणावर करण्याची सूचना करण्यात आली आहे. परंतु त्यासाठी उर्वरित शहरातील जनजीवन विस्कळीत करण्यात काहीच अर्थ नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे. परंतु आयुक्त मुंढे यांच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांना विनाकारण बंदिस्त राहावे लागत आहे. काही कंटेन्मेंट परिसरात नागरिकांना बळजबरीने क्वारंटाईन केले जात आहे. गड्डीगोदाम भागात या विषयावरून नागरिकांनी विरोधही केला होता. नागरिक स्वत: क्वारंटाईन होण्यास तयार होते; परंतु त्यांना प्रशासनाकडून त्याबाबतचे पत्र हवे होते, मात्र तशी कुठलीही रीतसर माहिती न देता नागरिकांना घेऊन जात असल्याने नागरिकांनी विरोध दर्शविला होता. अशीच मनमानी क्वारंटाईन सेंटर सुरू करण्याबाबतही दिसून आली. वस्त्यांमध्ये उघडणाऱ्या क्वारंटाईन सेंटरला स्थानिक नागरिकांचा विरोध पत्करावा लागला होता.लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यापार, धंदे बंद आहेत. नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. तब्बल दोन महिन्यानंतर सर्व काही सुरळीत सुरू होईल, अशी अपेक्षा होती. कंटेन्मेंट परिसर सोडून उर्वरित शहरातील नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु केवळ मनपा आयुक्त मुंढे यांनी ते होऊ दिले नाही. आणखी काही दिवस रेड झोन कायम करण्यात आला. त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांसोबत नागरिकही संतप्त झाले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर