शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ‘रेड झोन’च्या अट्टहासामुळे नागरिकांमध्ये असंतोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 21:01 IST

शहरातील केवळ काही वस्त्या वगळता इतर भागात कोरोना प्रादुर्भाव नाही. त्यामुळे या भागात उद्योगधंदे सुरू करून नागरिकांना दिलासा देणे अपेक्षित होते. परंतु केवळ मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या अट्टहासामुळे नागपूर शहर रेड झोनमध्ये सामील करण्यात आले. या निर्णयामुळे शहरातील सर्वपक्षीय नेत्यांसोबतच नागरिकांमध्येही असंतोष पसरला असून याचा भडका केव्हाही उडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देभडका उडण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील केवळ काही वस्त्या वगळता इतर भागात कोरोना प्रादुर्भाव नाही. त्यामुळे या भागात उद्योगधंदे सुरू करून नागरिकांना दिलासा देणे अपेक्षित होते. परंतु केवळ मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या अट्टहासामुळे नागपूर शहर रेड झोनमध्ये सामील करण्यात आले. या निर्णयामुळे शहरातील सर्वपक्षीय नेत्यांसोबतच नागरिकांमध्येही असंतोष पसरला असून याचा भडका केव्हाही उडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.मोमिनपुरा, संतरंजीपुरा, शांतिनगर या वस्त्यांमध्ये काही रुग्ण आहेत. इतर ठिकाणी फारसे रुग्ण नाहीत. नागपूरची सध्याची स्थिती पाहता आजवर ४०९ रुग्ण आढळले. त्यातील सात जणांचा मृत्यू झाला आहे, तर २९८ जण आजारातून पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. म्हणजेच सध्या नागपुरात १०४ रुग्ण आहेत. यात तीन जण जिल्ह्याबाहेरचे आहेत. बाधित वस्त्यांना सील करून तेथील नागरिकांची आरोग्य तपासणी, चाचण्या मोठ्या प्रमाणावर करण्याची सूचना करण्यात आली आहे. परंतु त्यासाठी उर्वरित शहरातील जनजीवन विस्कळीत करण्यात काहीच अर्थ नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे. परंतु आयुक्त मुंढे यांच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांना विनाकारण बंदिस्त राहावे लागत आहे. काही कंटेन्मेंट परिसरात नागरिकांना बळजबरीने क्वारंटाईन केले जात आहे. गड्डीगोदाम भागात या विषयावरून नागरिकांनी विरोधही केला होता. नागरिक स्वत: क्वारंटाईन होण्यास तयार होते; परंतु त्यांना प्रशासनाकडून त्याबाबतचे पत्र हवे होते, मात्र तशी कुठलीही रीतसर माहिती न देता नागरिकांना घेऊन जात असल्याने नागरिकांनी विरोध दर्शविला होता. अशीच मनमानी क्वारंटाईन सेंटर सुरू करण्याबाबतही दिसून आली. वस्त्यांमध्ये उघडणाऱ्या क्वारंटाईन सेंटरला स्थानिक नागरिकांचा विरोध पत्करावा लागला होता.लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यापार, धंदे बंद आहेत. नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. तब्बल दोन महिन्यानंतर सर्व काही सुरळीत सुरू होईल, अशी अपेक्षा होती. कंटेन्मेंट परिसर सोडून उर्वरित शहरातील नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु केवळ मनपा आयुक्त मुंढे यांनी ते होऊ दिले नाही. आणखी काही दिवस रेड झोन कायम करण्यात आला. त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांसोबत नागरिकही संतप्त झाले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर