शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

पाच वर्षे कारावासाविरुद्धचे अपील खारीज

By admin | Updated: November 16, 2015 02:56 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पाच वर्षे सश्रम कारावास व इतर शिक्षेविरुद्धचे अपील फेटाळून लावले आहे. सदोष मनुष्यवध प्रकरणातील आरोपीने हे अपील केले होते.

हायकोर्ट : सदोष मनुष्यवध प्रकरणनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पाच वर्षे सश्रम कारावास व इतर शिक्षेविरुद्धचे अपील फेटाळून लावले आहे. सदोष मनुष्यवध प्रकरणातील आरोपीने हे अपील केले होते. ही घटना वाशीम जिल्ह्यातील आहे.किसन रतन मोरे (५९) असे आरोपीचे नाव असून तो पानगीर नवघरे, ता. मालेगाव येथील रहिवासी आहे. मृताचे नाव गजानन नवघरे होते. सरकारी पक्षाच्या माहितीनुसार, घटनेच्या आठ दिवसांपूर्वी आरोपी किसन बैलबंडी घेऊन फिर्यादीच्या शेतातून जात होता. शेतात शेंगदाण्याचे पीक असल्यामुळे गजाननने आरोपीला थांबविण्याचा प्रयत्न केला, परंतु आरोपीने ऐकले नाही. यानंतर गजाननचा मुलगा राजूने आरोपीच्या शेतातून बैलबंडी आणली. आरोपीच्या शेतात उभे पीक नव्हते, तरीही आरोपीने राजूला शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. १३ मार्च २०११ रोजी गजाननने आरोपीला याबाबत जाब विचारला. यावरून दोघांचे जोरदार भांडण झाले. दरम्यान, आरोपीने गजाननला कुऱ्हाडीने वार करून ठार मारले. त्यावेळी आरोपीची पत्नी पार्वती व अल्पवयीन मुलीने राजूला पकडून ठेवले होते. गजानन ठार झाल्यानंतर आरोपीने राजूलाही जखमी केले. राजूच्या तक्रारीवरून मालेगाव पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३०२(हत्या), ३०७(हत्येचा प्रयत्न), ३४ अन्वये एफआयआर नोंदविला होता.२३ जानेवारी २०१३ रोजी वाशीम सत्र न्यायालयाने आरोपी किसनला भादंविच्या कलम ३०२ व ३०७ मध्ये निर्दोष ठरवून कलम ३०४-२ (सदोष मनुष्यवध)अंतर्गत पाच वर्षे सश्रम कारावास व ५००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त साधा कारावास तर, कलम ३२३(जखमी करणे)अंतर्गत सहा महिने सश्रम कारावास व ५०० रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त साधा कारावास अशी शिक्षा सुनावली होती. आरोपीच्या पत्नीला सर्व आरोपांतून निर्दोष सोडण्यात आले होते. सत्र न्यायालयात सरकारी पक्षाने सात साक्षीदार तपासले होते. आरोपीने त्याच्या शिक्षेविरुद्ध उच्च न्यायालयात अपील केले होते. उच्च न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता आरोपीचे अपील फेटाळून सत्र न्यायालयाचा आदेश कायम ठेवला आहे. आरोपीच्या मुलीला अल्पवयीन आरोपींच्या न्यायालयात पाठविण्यात आले होते. (प्रतिनिधी)