शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

पूर पीडित मदतीमध्ये विदर्भासोबत भेदभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:25 IST

नागपूर : पूर पीडितांना मदत वितरण व पुनर्वसनामध्ये विदर्भासोबत भेदभाव करण्यात आला असा गंभीर आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर ...

नागपूर : पूर पीडितांना मदत वितरण व पुनर्वसनामध्ये विदर्भासोबत भेदभाव करण्यात आला असा गंभीर आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिकेत करण्यात आला आहे. माणिक चौधरी व मनोहर नाकतोडे या दोन शेतकऱ्यांनी ही याचिका दाखल केली आहे.

पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यामध्ये चार मोठ्या नद्या व १२ धरणे आहेत. ऑगस्टमध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे सर्व नद्या व धरणांनी धोक्याची पातळी ओलांडली. परिणामी, २८ ते ३० ऑगस्ट २०२० या कालावधीत अतिरिक्त पाणी सोडण्यासाठी गोसेखुर्द धरणाचे ३३ दरवाजे उघडण्यात आले. परिणामी, या चार जिल्ह्यांतील २६१ गावांमध्ये पूर येऊन ९६ हजार ९९६ नागरिक प्रभावी झालेत. शेतात, घरांत, दुकानांत व अन्य विविध ठिकाणी पाणी शिरून नागरिकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. धरणाचे पाणी सोडण्यापूर्वी नागरिकांना सावधान करण्यात आले नाही. ही बाब नुकसानीत भर टाकणारी ठरली. याशिवाय प्रशासनाने परिस्थिती प्रभावीपणे हाताळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा, राष्ट्रीय पाणी आयोगाचे निर्देश व राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार कृती केली नाही. तसेच, मदत पुरवठा व पुनर्वसनामध्ये पश्चिम महाराष्ट्र व कोकण विभागाच्या तुलनेत विदर्भासोबत भेदभाव करण्यात आला असे याचिकाकर्त्यांनी याचिकेत नमूद केले आहे.

-----------------

याचिकाकर्त्यांच्या मागण्या

मदत पुरवठा व पुनर्वसनामध्ये विदर्भासोबत करण्यात आलेल्या भेदभावाची आणि पुरामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यात आलेल्या अपयशाची जबाबदारी निश्चित होण्यासाठी न्यायिक चौकशी करण्याचे निर्देश देण्यात यावेत. तसेच, पूर प्रभावित नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार भरपाई अदा करण्यात यावी, अशा मागण्या याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला केल्या आहेत

---------------------

सरकारला मागितले उत्तर

याचिकेवर शुक्रवारी न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर त्यांनी केंद्रीय जल संसाधन व नदी विकास विभागाचे सचिव, राज्य महसूल व वन विभागाचे सचिव, सिंचन विभागाचे सचिव, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया व नागपूर जिल्हाधिकारी यांच्यासह इतर प्रतिवादींना नोटीस बजावून याचिकेवर सहा आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. आनंद देशपांडे व ॲड. कल्याणकुमार यांनी कामकाज पाहिले.