शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पूर पीडित मदतीमध्ये विदर्भासोबत भेदभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:25 IST

नागपूर : पूर पीडितांना मदत वितरण व पुनर्वसनामध्ये विदर्भासोबत भेदभाव करण्यात आला असा गंभीर आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर ...

नागपूर : पूर पीडितांना मदत वितरण व पुनर्वसनामध्ये विदर्भासोबत भेदभाव करण्यात आला असा गंभीर आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिकेत करण्यात आला आहे. माणिक चौधरी व मनोहर नाकतोडे या दोन शेतकऱ्यांनी ही याचिका दाखल केली आहे.

पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यामध्ये चार मोठ्या नद्या व १२ धरणे आहेत. ऑगस्टमध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे सर्व नद्या व धरणांनी धोक्याची पातळी ओलांडली. परिणामी, २८ ते ३० ऑगस्ट २०२० या कालावधीत अतिरिक्त पाणी सोडण्यासाठी गोसेखुर्द धरणाचे ३३ दरवाजे उघडण्यात आले. परिणामी, या चार जिल्ह्यांतील २६१ गावांमध्ये पूर येऊन ९६ हजार ९९६ नागरिक प्रभावी झालेत. शेतात, घरांत, दुकानांत व अन्य विविध ठिकाणी पाणी शिरून नागरिकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. धरणाचे पाणी सोडण्यापूर्वी नागरिकांना सावधान करण्यात आले नाही. ही बाब नुकसानीत भर टाकणारी ठरली. याशिवाय प्रशासनाने परिस्थिती प्रभावीपणे हाताळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा, राष्ट्रीय पाणी आयोगाचे निर्देश व राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार कृती केली नाही. तसेच, मदत पुरवठा व पुनर्वसनामध्ये पश्चिम महाराष्ट्र व कोकण विभागाच्या तुलनेत विदर्भासोबत भेदभाव करण्यात आला असे याचिकाकर्त्यांनी याचिकेत नमूद केले आहे.

-----------------

याचिकाकर्त्यांच्या मागण्या

मदत पुरवठा व पुनर्वसनामध्ये विदर्भासोबत करण्यात आलेल्या भेदभावाची आणि पुरामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यात आलेल्या अपयशाची जबाबदारी निश्चित होण्यासाठी न्यायिक चौकशी करण्याचे निर्देश देण्यात यावेत. तसेच, पूर प्रभावित नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार भरपाई अदा करण्यात यावी, अशा मागण्या याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला केल्या आहेत

---------------------

सरकारला मागितले उत्तर

याचिकेवर शुक्रवारी न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर त्यांनी केंद्रीय जल संसाधन व नदी विकास विभागाचे सचिव, राज्य महसूल व वन विभागाचे सचिव, सिंचन विभागाचे सचिव, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया व नागपूर जिल्हाधिकारी यांच्यासह इतर प्रतिवादींना नोटीस बजावून याचिकेवर सहा आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. आनंद देशपांडे व ॲड. कल्याणकुमार यांनी कामकाज पाहिले.