शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

पोलिस अधिकाऱ्यांचा हिरमोड, बदली निर्णयास मुदतवाढ : अनेकांच्या नावावर मतभिन्नता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 12:43 IST

बदलीची आस लावून तसेच ५ सप्टेंबरकडे नजर लावून बसलेल्या राज्यभरातील शेकडो पोलिस अधिकाऱ्यांचा पुन्हा एकदा हिरमोड झाला आहे.

नरेश डोंगरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बदलीची आस लावून तसेच ५ सप्टेंबरकडे नजर लावून बसलेल्या राज्यभरातील शेकडो पोलिस अधिकाऱ्यांचा पुन्हा एकदा हिरमोड झाला आहे. अधीक्षक, उपायुक्त दर्जाच्या अनेक पोलिस अधिकाऱ्यांच्या सेवास्थळ आणि नावावर एकमत न झाल्यामुळे राज्य सरकारने निर्णय घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून पुन्हा एकदा मुदतवाढ घेतली आहे.

पोलिस अधीक्षकांपासून अतिरिक्त पोलीस महासंचालकांपर्यंतच्या बदल्या राज्य सरकारने २ आणि ३ सप्टेंबरला केल्या. आता उर्वरित पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक आणि वरिष्ठ निरीक्षक दर्जाच्या पोलीस दलातील बदलीसाठी पात्र असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्याचा निर्णय घ्यायचा होता. त्यासाठी ५ सप्टेंबर पर्यंतची मुदत होती. २ आणि ३ सप्टेंबरला करण्यात आलेल्या बदल्यांमध्ये अनेक अधिकाऱ्यांना पदोन्नतीही देण्यात आली आहे. 'आता आपली बारी' आहे, अशी भावना झालेले अनेक पोलीस अधिकारी बदलीची आस लावून बसले आहेत. अनेकांनी लॉबिंगही केले आहे. शुक्रवारी बदलीची यादी जाहीर होईल आणि त्या यादीत आपले नाव असेल, असा त्यातील अनेकांना अंदाज वजा विश्वास होता. मात्र बदलीची यादी घोषित होण्याऐवजी गृह विभागाच्या उपसचिवांचे पत्र आज जारी झाले. हे पत्र बदलीची आस लावून असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांचा हिरमोड करणारे ठरले. कारण यापूवीर्ची ५ सप्टेंबर पर्यंतच्या बदलीच्या निर्णयाची मुदत आता ३० सप्टेंबर पर्यंत वाढविण्यात आल्याचे पत्रात नमूद आहे. त्यामुळे आणखी काही दिवस पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जाणार नाही, असे स्पष्ट झाले आहे. या संबंधाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे विचारणा करण्यासाठी लोकमत'ने वारंवार संपर्क साधला मात्र त्यांच्याशी बोलणे होऊ शकले नाही.क्रॉस कनेक्शन झालेया संबंधाने काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता अनेक जिल्हा स्थळी आपल्या मजीर्तील पोलीस अधीक्षक हवा असा आग्रह त्या त्या भागातील नेतेमंडळींनी धरला. परिणामी क्रॉस कनेक्शन झाले आणि अनेक जिल्हा स्थळी पोलीस अधिकाऱ्याच्या नावावर एकमत झाले नाही. त्यामुळे मतभेद टाळण्यासाठी पुरेसा विचार विमर्श करून निर्णय घेण्याकरिता ३० सप्टेंबर पर्यंतची मुदत वाढवून घेण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी 'ऑफ द रेकॉर्ड' सांगितले आहे.या प्रकारामुळे वेगवेगळ्या ठिकाणाहून ऐच्छिक ठिकाणी बदली करून घेण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या अनेक अधिकाऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले गेले आहे.तूर्त तयारी मोडावी लागणारविशेष म्हणजे, राज्यातील ठिकठिकाणांच्या पोलीस निरीक्षकांपासून तो अधीक्षक दर्जा पर्यंतच्या अनेक अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या गाव, शहरात आपला सेवाकाळ पूर्ण केला आहे. त्यामुळे ५ सप्टेंबर पर्यंत आपली बदली होईल आणि आपण आपल्या गावाकडे जाऊ, असे त्यांना वाटत होते. त्यासाठी त्यांनी सर्व तयारीसुद्धा करून ठेवली होती. मात्र आजच्या पत्रामुळे या सर्वांना काही दिवसांनसाठी तयारी मोडून आहे त्याच ठिकाणी कर्तव्य बजावणे अपरिहार्य झाले आहे.

टॅग्स :Policeपोलिस