शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्या नगरीत श्रीराम मंदिरावर आज दिमाखात फडकणार भगवा ध्वज, वास्तूचे काम पूर्ण झाल्याचे प्रतीक; ध्वजावर तेजस्वी सूर्य, ॐ ही प्रतीकेही, अयोध्येत कडक सुरक्षा
2
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? शांतता योजनेचा मसुदा तयार; पण युक्रेनसमोर मोठे दुहेरी संकट!
3
भारताशेजारील देशांमध्ये भूकंपांची मालिका सुरूच, आता या देशात भूकंपाचे धक्के; किती होती तीव्रता?
4
इथिओपियात ज्वालामुखी उद्रेक; राखेचे ढग भारताच्या दिशेने, DGCA चा विमान कंपन्यांना अलर्ट जारी
5
नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा...
6
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
7
चंद्रपूर पुन्हा हादरले; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम शिक्षकास अटक
8
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
9
UAE ला जात होतं इंडिगो विमान, अचानकच 10000 वर्षांनंतर झाले ज्वालामुखीचे स्फोट अन् मग...!
10
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
11
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
12
शिंदेसेनेला पुन्हा एकदा सहकाऱ्याचा धक्का, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारचा भाजपमध्ये प्रवेश
13
७०० कोटींचा खर्च केला, पण वंदे भारत ट्रेनची सेवा नाहीच; प्रवाशांची गैरसोय, नाराजी वाढली?
14
Dharmendra : "ते मला नेहमी म्हणायचे की...", धर्मेंद्रजींच्या निधनानंतर सचिनसह विराटही झाला भावूक
15
आता मुंबईतही बिबट्याची दहशत! दिंडोशी म्हाडाच्या बंगल्यात बिबट्याचा संचार
16
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
17
जुना, वापरलेला फोन खरेदी करताय? थांबा! एका चुकीमुळे होऊ शकते हजारोंचे नुकसान, आताच जाणून घ्या..
18
रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
19
मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... 
20
Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालये ऑनलाईन करण्यावर मतभिन्नता : वकिलांच्या संमिश्र प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 23:31 IST

कोरोना संक्रमणामुळे न्यायालयांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रकरणावर सुनावणी घेतली जात आहे. वकील आपापल्या कार्यालयांमध्ये बसून युक्तिवाद करीत आहेत. प्रकरणे ऑनलाईन दाखल केली जात आहेत.

ठळक मुद्देकुणाचा विरोध तर, कुणी म्हणतात हे भविष्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना संक्रमणामुळे न्यायालयांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रकरणावर सुनावणी घेतली जात आहे. वकील आपापल्या कार्यालयांमध्ये बसून युक्तिवाद करीत आहेत. प्रकरणे ऑनलाईन दाखल केली जात आहेत. वकील व त्यांच्या कर्मचाऱ्यांचे न्यायालयात जाणे-येणे बंद झाले आहे. परंतु, या व्यवस्थेसंदर्भात वकिलांमध्ये मतभिन्नता आहे. यासंदर्भात वकिलांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता, ही व्यवस्था भविष्यातही कायम राहावी असे काही वकिलांनी सांगितले तर, काहींनी लॉकडाऊन संपल्यानंतर न्यायालयांमध्ये नियमित पद्धतीने कामकाज सुरू करण्याची मागणी केली.वरिष्ठ वकील अ‍ॅड. आनंद जयस्वाल म्हणाले, कोरोना संक्रमण लक्षात घेता सध्या न्यायालयांमध्ये ऑनलाईन पद्धतीने काम करणे भाग आहे, पण ही व्यवस्था भविष्यातही कायम ठेवण्यास काहीच हरकत नाही. या व्यवस्थेत वकिलांना कुठूनही युक्तिवाद करणे शक्य होते. त्याकरिता त्यांना न्यायालयात जाण्याची गरज नाही. परंतु, ही व्यवस्था आणखी सक्षम कशी करता येईल ते बघावे लागेल. न्यायालये ऑनलाईन करणे वकिलांच्या सुविधेचे आहे. त्याकरिता त्यांना नवीन तंत्रज्ञान हाताळणे शिकावे लागेल एवढाच त्रास आहे असे त्यांनी सांगितले.अ‍ॅड. फिरदोस मिर्झा यांनी ऑनलाईन न्यायालयांचे समर्थन केले. ही व्यवस्था पुढेदेखील व्यापक पद्धतीने लागू केली गेली पाहिजे. त्याला थोडा वेळ लागेल, पण हे न्यायालयांचे भविष्य आहे. या व्यवस्थेमुळे पेपरवर्क कमी होईल असे त्यांनी सांगितले.अ‍ॅड. शशिभूषण वहाणे यांनी ऑनलाईन व्यवस्था वकिलांच्या फायद्याची असल्याचे मत व्यक्त केले. या व्यवस्थेमध्ये वकिलांना कोणत्याही ठिकाणाहून प्रकरणे दाखल करता येतात. शहरात हजर नसताना युक्तिवाद करता येतो. त्यामुळे लॉकडाऊन संपल्यानंतरदेखील ऑनलाईन प्रक्रिया सुरू राहायला हवी असे त्यांनी सांगितले.अ‍ॅड. राजेंद्र डागा यांनी लॉकडाऊन संपल्यानंतर न्यायालयांमध्ये नियमित पद्धतीने काम सुरू होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. अनेक प्रकरणांमध्ये हजारो पानांच्या फाईल्स असतात. अशा प्रकरणांचे ऑनलाईन फायलिंग व युक्तिवाद करणे कठीण आहे. याशिवाय आॅनलाईनमध्ये विविध तांत्रिक अडचणी येतात. सामान्य नागरिकांना न्यायालयाची प्रक्रिया पाहता येत नाही असे त्यांनी सांगितले. ऑनलाईन प्रक्रिया लागू करायची झाल्यास प्रकरणांची विभागणी करावी. ऑनलाईन सुनावणी अशक्य असलेली प्रकरणे पारंपरिक पद्धतीने ऐकावीत, असेही ते म्हणाले.अ‍ॅड. पुरुषोत्तम पाटील यांनी कोरोना संक्रमण संपल्यानंतर न्यायालयांमध्ये नियमित पद्धतीने कामकाज करणे सोयीचे होईल असे सांगितले. न्यायालयांमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून जेवढी प्रभावीपणे बाजू मांडणे शक्य होते, तेवढी ऑनलाईनमध्ये होत नाही. अनेकदा न्यायालयांना वेळेवर काही दस्तऐवज दाखवावे लागतात.ऑनलाईनमध्ये ते शक्य होत नाही. करिता, ऑनलाईन पद्धतीचा उपयोग अपवादात्मक परिस्थितीतच केला गेला पाहिजे असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Courtन्यायालयonlineऑनलाइन