शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
3
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
4
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
5
Gold Silver Price 31 July 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
6
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
7
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
8
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
9
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
10
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
11
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
12
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
13
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
14
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
15
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
16
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
17
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
18
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
19
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
20
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन

नागपूर बसस्थानकाचे विश्रामगृह की गलिच्छ उकिरडा?; चालक-वाहक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 11:15 IST

गणेशपेठ बसस्थानकाच्या विश्रांतीगृहात विदर्भासह महाराष्ट्रातून चालक-वाहक मुक्कामी असतात. परंतु डासांच्या उपद्रवामुळे त्यांना झोप लागत नाही. येथे दुर्गंधी पसरल्यामुळे त्यांना नाकाला रुमाल बांधून कसेबसे झोपावे लागते.

ठळक मुद्देअर्धवट झोपेमुळे अपघाताची शक्यता दुर्गंधीचे साम्राज्य, समस्या सोडविणार कोण?

दयानंद पाईकराव।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गणेशपेठ बसस्थानकाच्या विश्रांतीगृहात विदर्भासह महाराष्ट्रातून चालक-वाहक मुक्कामी असतात. परंतु डासांच्या उपद्रवामुळे त्यांना झोप लागत नाही. येथे दुर्गंधी पसरल्यामुळे त्यांना नाकाला रुमाल बांधून कसेबसे झोपावे लागते. प्रसाधनगृहात दरवाजा नाही, बेसिन चोक झाल्यामुळे पाणी साचलेले, अशा एक ना अनेक समस्यांचा सामना त्यांना करावा लागतो. रात्री झोप झालेली नसताना दुसऱ्या दिवशी सकाळीच उठून चालकाला स्टेअरिंगवर बसावे लागते. त्यामुळे विश्रांतीगृहातील समस्या कधी दूर होणार, असा प्रश्न येथील चालक-वाहकांनी उपस्थित केला.नागपुरातील गणेशपेठ बसस्थानकावरील विश्रांतीगृहातील सोईसुविधांचा ‘लोकमत’ने आढावा घेतला असता येथे उपस्थित चालक-वाहकांनी समस्यांचा पाढाच वाचला. येथे गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. विश्रांतीगृहात पूर्वी चालक-वाहकांसाठी पलंग, गाद्या राहत. परंतु अलीकडील काळात एसटी महामंडळाने साधी सतरंजी टाकलेली दिसली नाही. कर्मचारी घरून आणलेली चादर टाकून त्यावर विश्रांती घेतात. विश्रामगृहाला लागूनच बाथरुम, शौचालय आहे. येथे नियमित सफाई होत नसल्यामुळे कमालीची दुर्गंधी पसरलेली दिसली. बाथरुमचे दारही नादुरुस्त असल्यामुळे ते उघडेच ठेवून अंघोळ करावी लागते. दुर्गंधीमुळे रात्रभर कर्मचाऱ्यांना डासांचा त्रास होतो. विश्रांतीगृहाच्या कोपऱ्यात कचरा साठलेला दिसला. बेसिन चोक झाल्यामुळे त्यात पाणी तुडुंब भरलेले होते. वॉटर कुलरजवळही कमालीची घाण पसरल्यामुळे तेथे पाणी पिण्याचे सोडा हात धुण्याचीही इच्छा होत नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. अनेक कर्मचारी ड्युटीवर निघताना आपल्या घरून दोन-तीन पाण्याच्या बॉटल घेऊन येतात. शौचालयात पाण्याचा पाईप फुटल्यामुळे पाणी अंगावर पडते. अशा परिस्थितीत येथे रात्र काढण्याची पाळी चालक-वाहकांवर येत आहे. नाईलाजास्तव रात्रभर येथे थांबून चालक-वाहक दुसऱ्या दिवशी सकाळीच उठून बस घेऊन जातात. त्यामुळे विश्रांतीगृहातील समस्या दूर करून तेथे सोईसुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी चालक-वाहकांनी केली.विश्रांतीगृहात चोरीच्या घटनारात्री मुक्कामी बस घेऊन आल्यानंतर वाहकांजवळ दिवसभरात प्रवाशांकडून आलेली रक्कम राहते. परंतु येथे सुरक्षेची कोणतीच सुविधा नसल्यामुळे अनेकदा येथे चोरीच्या घटना घडत असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली. पूूर्वी एसटीच्या प्रशासनातर्फे येथे आलेल्या चालक-वाहकांची नोंद करण्यासाठी एक कर्मचारी नियुक्त करण्यात येत होता. परंतु तो कर्मचारीही आता दिसत नसल्यामुळे कुणीही येऊन येथे विश्रांती करीत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ