शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील फूल मार्केटमध्ये घाणीचे साम्राज्य, विक्रेते व उत्पादकांचे आरोग्य संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 21:44 IST

विदर्भातील पुष्प उत्पादक शेतकऱ्यांच्या सीताबर्डी भागातील महात्मा फुले पुष्प बाजारात घाणीचे साम्राज्य असल्याने विक्रेते आणि शेतकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मनपाचे दुर्लक्ष असल्याने कचराघर तुडुंब भरले आहे. कोरोना संसर्गाच्या काळात ही बाब जीवघेणी असून मनपाने लक्ष द्यावे, अशी मागणी ठोक पुष्प विक्रेत्यांनी लोकमतशी बोलताना केली.

ठळक मुद्देमनपाची कचरा उचलण्यात दिरंगाई : कचराघर तुडुंब भरले

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : विदर्भातील पुष्प उत्पादक शेतकऱ्यांच्या सीताबर्डी भागातील महात्मा फुले पुष्प बाजारात घाणीचे साम्राज्य असल्याने विक्रेते आणि शेतकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मनपाचे दुर्लक्ष असल्याने कचराघर तुडुंब भरले आहे. कोरोना संसर्गाच्या काळात ही बाब जीवघेणी असून मनपाने लक्ष द्यावे, अशी मागणी ठोक पुष्प विक्रेत्यांनी लोकमतशी बोलताना केली.लॉकडाऊनच्या काळात नेताजी मार्केटमधील फुल बाजार बंद होता. अनलॉकमध्ये सुरू झाल्यानंतर पुष्प उत्पादक शेतकरी फूल विक्रीसाठी आणत आहेत. सध्या सर्व फुलांची आवक वाढली, पण मंदिर, लग्नसमारंभ, वाढदिवस आणि विविध कार्यक्रम बंद असल्याने फुलांची विक्री कमी आहे. फुलांची विक्री न झाल्यानंतर उत्पादक माल तिथेच ठेवून निघूून जातात. अशा स्थितीत न विकलेली फुले कचराघरात फेकावी लागतात. ही नित्याचीच बाब झाली आहे. याशिवाय लगतचे दुकानदार आणि वस्तीतील लोक या ठिकाणी कचरा टाकतात. दरदिवशी कचरा मोठ्या प्रमाणात गोळा होतो. मनपाने कचरा दररोज उचलावा, अशी पुष्प विक्रेत्यांची मागणी आहे. पण त्याकडे मनपा कानाडोळा करीत असल्याचा आरोप महात्मा फुले पुष्प असोसिएशनचे अध्यक्ष जयंत रणनवरे यांनी केला.या बाजारात गोळा होणारा कचरा आणि सिमेंट रस्त्याच्या अर्धवट कामामुळे व्यापाºयांची डोकेदुखी वाढली आहे. या भागात दुर्गंधी पसरली आहे. पावसाळ्यात येथे तयार झालेल्या खड्ड्यात पाणी साचते. कचऱ्यामुळे डास व विषारी जीवजंतूचा प्रकोप वाढला आहे. ते आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. खड्ड्याच्या दुरुस्तीसाठी कुणीही पुढाकार घेत नाही. घाणीच्या वातावरणात व्यवसाय करणे कठीण झाले आहे. येथे गोळा होणारा कचरा दररोज उचलावा आणि आरोग्यावर होणाºया विपरीत परिणामापासून मनपाने सुटका करावी, अशी मागणी रणनवरे यांनी केली आहे.बाजार शताब्दीनगरात हलवावानेताजी मार्केटमधील पुष्प बाजार शताब्दीनगरातील तीन एकरात हलवावा. मनपाने पुष्प बाजारासाठी ही जागा निश्चित केली आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. पण गाडी कुठे अडली हे कळायला मार्ग नाही. या संदर्भात २ एप्रिलला मनपा आयुक्तांना निवेदन दिले आहे. शताब्दी बाजाराचा विकास विक्रेते करण्यास तयार आहे. पाच जिल्ह्याच्या मुख्य बाजारात सध्या ६४ अधिकृत विक्रेते कार्यरत आहे. शताब्दी नगरात बाजार नव्याने सुरू केल्यास नवीन विक्रेते पुन्हा जुळतील, शिवाय बाजाराचा व्यवसाय वाढेल, असे रणनवरे यांनी स्पष्ट केले.शासनाने मदत करावीलॉकडाऊनमुळे शेकडो पुष्प उत्पादकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. प्रत्येक उत्पादकाला लाखो रुपयांची फुले शेतातून फेकावी लागली. आताही विक्री नगण्यच आहे. त्यामुळे दररोज आर्थिक नुकसान होत आहे. शासनाने उत्पादकांना आर्थिक मदत करावी, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना दिले आहे. त्यावर अजूनही निर्णय झालेला नाही, असे रणनवरे यांनी सांगितले.

टॅग्स :Marketबाजारnagpurनागपूर