शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
2
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
3
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
4
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
5
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
6
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
7
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
8
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
9
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
10
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
11
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
12
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
13
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
14
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
15
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
16
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
17
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
18
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
19
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
20
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!

नागपुरातील फूल मार्केटमध्ये घाणीचे साम्राज्य, विक्रेते व उत्पादकांचे आरोग्य संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 21:44 IST

विदर्भातील पुष्प उत्पादक शेतकऱ्यांच्या सीताबर्डी भागातील महात्मा फुले पुष्प बाजारात घाणीचे साम्राज्य असल्याने विक्रेते आणि शेतकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मनपाचे दुर्लक्ष असल्याने कचराघर तुडुंब भरले आहे. कोरोना संसर्गाच्या काळात ही बाब जीवघेणी असून मनपाने लक्ष द्यावे, अशी मागणी ठोक पुष्प विक्रेत्यांनी लोकमतशी बोलताना केली.

ठळक मुद्देमनपाची कचरा उचलण्यात दिरंगाई : कचराघर तुडुंब भरले

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : विदर्भातील पुष्प उत्पादक शेतकऱ्यांच्या सीताबर्डी भागातील महात्मा फुले पुष्प बाजारात घाणीचे साम्राज्य असल्याने विक्रेते आणि शेतकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मनपाचे दुर्लक्ष असल्याने कचराघर तुडुंब भरले आहे. कोरोना संसर्गाच्या काळात ही बाब जीवघेणी असून मनपाने लक्ष द्यावे, अशी मागणी ठोक पुष्प विक्रेत्यांनी लोकमतशी बोलताना केली.लॉकडाऊनच्या काळात नेताजी मार्केटमधील फुल बाजार बंद होता. अनलॉकमध्ये सुरू झाल्यानंतर पुष्प उत्पादक शेतकरी फूल विक्रीसाठी आणत आहेत. सध्या सर्व फुलांची आवक वाढली, पण मंदिर, लग्नसमारंभ, वाढदिवस आणि विविध कार्यक्रम बंद असल्याने फुलांची विक्री कमी आहे. फुलांची विक्री न झाल्यानंतर उत्पादक माल तिथेच ठेवून निघूून जातात. अशा स्थितीत न विकलेली फुले कचराघरात फेकावी लागतात. ही नित्याचीच बाब झाली आहे. याशिवाय लगतचे दुकानदार आणि वस्तीतील लोक या ठिकाणी कचरा टाकतात. दरदिवशी कचरा मोठ्या प्रमाणात गोळा होतो. मनपाने कचरा दररोज उचलावा, अशी पुष्प विक्रेत्यांची मागणी आहे. पण त्याकडे मनपा कानाडोळा करीत असल्याचा आरोप महात्मा फुले पुष्प असोसिएशनचे अध्यक्ष जयंत रणनवरे यांनी केला.या बाजारात गोळा होणारा कचरा आणि सिमेंट रस्त्याच्या अर्धवट कामामुळे व्यापाºयांची डोकेदुखी वाढली आहे. या भागात दुर्गंधी पसरली आहे. पावसाळ्यात येथे तयार झालेल्या खड्ड्यात पाणी साचते. कचऱ्यामुळे डास व विषारी जीवजंतूचा प्रकोप वाढला आहे. ते आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. खड्ड्याच्या दुरुस्तीसाठी कुणीही पुढाकार घेत नाही. घाणीच्या वातावरणात व्यवसाय करणे कठीण झाले आहे. येथे गोळा होणारा कचरा दररोज उचलावा आणि आरोग्यावर होणाºया विपरीत परिणामापासून मनपाने सुटका करावी, अशी मागणी रणनवरे यांनी केली आहे.बाजार शताब्दीनगरात हलवावानेताजी मार्केटमधील पुष्प बाजार शताब्दीनगरातील तीन एकरात हलवावा. मनपाने पुष्प बाजारासाठी ही जागा निश्चित केली आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. पण गाडी कुठे अडली हे कळायला मार्ग नाही. या संदर्भात २ एप्रिलला मनपा आयुक्तांना निवेदन दिले आहे. शताब्दी बाजाराचा विकास विक्रेते करण्यास तयार आहे. पाच जिल्ह्याच्या मुख्य बाजारात सध्या ६४ अधिकृत विक्रेते कार्यरत आहे. शताब्दी नगरात बाजार नव्याने सुरू केल्यास नवीन विक्रेते पुन्हा जुळतील, शिवाय बाजाराचा व्यवसाय वाढेल, असे रणनवरे यांनी स्पष्ट केले.शासनाने मदत करावीलॉकडाऊनमुळे शेकडो पुष्प उत्पादकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. प्रत्येक उत्पादकाला लाखो रुपयांची फुले शेतातून फेकावी लागली. आताही विक्री नगण्यच आहे. त्यामुळे दररोज आर्थिक नुकसान होत आहे. शासनाने उत्पादकांना आर्थिक मदत करावी, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना दिले आहे. त्यावर अजूनही निर्णय झालेला नाही, असे रणनवरे यांनी सांगितले.

टॅग्स :Marketबाजारnagpurनागपूर