शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

उपविभागीय अधिकाऱ्यांना गावांचे दौरे करण्याचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 21:35 IST

खनिज निधीतून आणि जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सुरु असलेल्या जलसंधारणांच्या कामांमुळे उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे ऑडिट व्हावे तसेच जलसंधारणाची कामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांनी ज्या गावांमध्ये कामे सुरु आहेत, त्या गावांचे दौरे करावेत. जलसंधारणाच्या कामांसाठी व जनजागृतीसाठ़ी तालुकास्तरावर प्रशिक्षण शिबिरे आयोजित करावेत, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी प्रशासनाला दिले.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांनी घेतला जलसंधारण कामांचा आढावा : तालुकास्तरावर घेणार प्रशिक्षण शिबिरे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खनिज निधीतून आणि जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सुरु असलेल्या जलसंधारणांच्या कामांमुळे उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे ऑडिट व्हावे तसेच जलसंधारणाची कामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांनी ज्या गावांमध्ये कामे सुरु आहेत, त्या गावांचे दौरे करावेत. जलसंधारणाच्या कामांसाठी व जनजागृतीसाठ़ी तालुकास्तरावर प्रशिक्षण शिबिरे आयोजित करावेत, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी प्रशासनाला दिले. भविष्यात एकही गाव पाणीटंचाईचे राहणार नाही, या उद्देशाने ही कामे व्हावीत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. निधी आहे फक्त कामे गतीने पूर्ण करा, असेही ते म्हणाले.जलसंधारण, रेन वॉटर हार्वेस्टिग, रिचार्ज शाफ्ट या विषयांच्या कामाची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांनी घेतली. या बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, जि.प.चे कार्यकारी अभियंता, मजिप्राचे अधिकारी उपस्थित होते. पाणी फाऊंडेशनतर्फे नरखेड तालुक्यात होत असलेले काम चांगले झाले आहे. हे काम करण्यासाठी लोक स्वत:हून पुढे आले आहेत. अशीच कामे जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये व्हावी, अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी व्यक्त केली. तसेच खनिज निधी व जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जलसंधारणाच्या होणाऱ्या सर्व कामाचे व्हिडिओ काढण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. नरखेड तालुक्यातील रामठी या गावातील पाण्याची पातळी शोष खड्ड्यामुळे वाढल्याचेही यावेळी सांगण्यात आले. जलसंधारणाची कामे यशस्वी कशी होतील यासाठी पाणी फाऊंडेशनचे राज्यस्तरीय प्रशिक्षक अधिकाऱ्यांना व सरपंच, सचिवांना प्रशिक्षण देतील. यासाठी तालुकानिहाय शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी दिले. या शिबिरांचे यशस्वी आयोजन तहसिलदार आणि बीडीओंनी करावे. या शिबिराचा खर्च रोजगार हमी योजना विभागाने करावा. तसेच रोहयोमार्फत होणाऱ्या कामांतून जलसंधारण साध्य होईल, असा दृष्टिकोन ठेवून ही कामे केली जावीत. ही कामे करताना प्रत्येक तालुक्यात नाल्याचे ग्रीड तयार करा. नाले एकमेकांना जोडले तर पूर येणार नाही व पाणी उपलब्ध राहणार आहे. १३ तालुक्यातील नाले जोडण्यासाठी ग्रीड तयार करण्याच्या सूचनाही पालकमंंत्र्यांनी दिल्या. याच बैठकीत स्थानिक स्तर विभागाच्या अधिकाऱ्यांचे ढेपाळलेले काम पाहता पालकमंत्र्यांनी त्यांच्याकडील काम काढून ते नासुप्रला देण्याचे निर्देश दिले.‘रिचार्ज शाफ्ट’अंतर्गत जुन्या बोअरवेल, पाण्याचे स्रोत पुन्हा जिवंत करता येऊ शकतात. जीएसडीए हे काम करीत आहे. या कामांसाठी अधिक प्रस्ताव पाठवा. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील १० गावांमधील बंद झालेले पाण्याचे स्रोत रिचार्ज करा. जि.प. सिंचन विभागातर्फे तलावांच्या दुरुस्ती व खोलीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. २५ कोटींची ४७ कामे सुरू आहेत. जिल्हा नियोजन समितीकडून आणखी १७ कोटींची मागणी जि. प. सिंचन विभागाने केली आहे, अशी माहिती या बैठकीतून समोर आली.महिला बचत गटामार्फत बांबू लागवड करारोजगार हमी योजना विभागाने महिलांचे बचत गट तयार करून शासकीय जागेवर बांबू लागवड व एका कुटुंबाला २ झाडे ही योजना राबवावी. रोहयोतून महिलांना २०६ रुपये मजुरी मिळेल व झाडे लागवड होईल. जिल्ह्यातील १३ तालुक्यात ही योजना राबवा. यातून महिला बचत गटाला वर्षभर काम मिळणार आहे.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेWaterपाणी