शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
6
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
7
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
8
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
9
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
10
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
11
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
12
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
13
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
14
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
15
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
17
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
18
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
19
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
20
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी

उपविभागीय अधिकाऱ्यांना गावांचे दौरे करण्याचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 21:35 IST

खनिज निधीतून आणि जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सुरु असलेल्या जलसंधारणांच्या कामांमुळे उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे ऑडिट व्हावे तसेच जलसंधारणाची कामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांनी ज्या गावांमध्ये कामे सुरु आहेत, त्या गावांचे दौरे करावेत. जलसंधारणाच्या कामांसाठी व जनजागृतीसाठ़ी तालुकास्तरावर प्रशिक्षण शिबिरे आयोजित करावेत, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी प्रशासनाला दिले.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांनी घेतला जलसंधारण कामांचा आढावा : तालुकास्तरावर घेणार प्रशिक्षण शिबिरे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खनिज निधीतून आणि जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सुरु असलेल्या जलसंधारणांच्या कामांमुळे उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे ऑडिट व्हावे तसेच जलसंधारणाची कामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांनी ज्या गावांमध्ये कामे सुरु आहेत, त्या गावांचे दौरे करावेत. जलसंधारणाच्या कामांसाठी व जनजागृतीसाठ़ी तालुकास्तरावर प्रशिक्षण शिबिरे आयोजित करावेत, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी प्रशासनाला दिले. भविष्यात एकही गाव पाणीटंचाईचे राहणार नाही, या उद्देशाने ही कामे व्हावीत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. निधी आहे फक्त कामे गतीने पूर्ण करा, असेही ते म्हणाले.जलसंधारण, रेन वॉटर हार्वेस्टिग, रिचार्ज शाफ्ट या विषयांच्या कामाची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांनी घेतली. या बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, जि.प.चे कार्यकारी अभियंता, मजिप्राचे अधिकारी उपस्थित होते. पाणी फाऊंडेशनतर्फे नरखेड तालुक्यात होत असलेले काम चांगले झाले आहे. हे काम करण्यासाठी लोक स्वत:हून पुढे आले आहेत. अशीच कामे जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये व्हावी, अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी व्यक्त केली. तसेच खनिज निधी व जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जलसंधारणाच्या होणाऱ्या सर्व कामाचे व्हिडिओ काढण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. नरखेड तालुक्यातील रामठी या गावातील पाण्याची पातळी शोष खड्ड्यामुळे वाढल्याचेही यावेळी सांगण्यात आले. जलसंधारणाची कामे यशस्वी कशी होतील यासाठी पाणी फाऊंडेशनचे राज्यस्तरीय प्रशिक्षक अधिकाऱ्यांना व सरपंच, सचिवांना प्रशिक्षण देतील. यासाठी तालुकानिहाय शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी दिले. या शिबिरांचे यशस्वी आयोजन तहसिलदार आणि बीडीओंनी करावे. या शिबिराचा खर्च रोजगार हमी योजना विभागाने करावा. तसेच रोहयोमार्फत होणाऱ्या कामांतून जलसंधारण साध्य होईल, असा दृष्टिकोन ठेवून ही कामे केली जावीत. ही कामे करताना प्रत्येक तालुक्यात नाल्याचे ग्रीड तयार करा. नाले एकमेकांना जोडले तर पूर येणार नाही व पाणी उपलब्ध राहणार आहे. १३ तालुक्यातील नाले जोडण्यासाठी ग्रीड तयार करण्याच्या सूचनाही पालकमंंत्र्यांनी दिल्या. याच बैठकीत स्थानिक स्तर विभागाच्या अधिकाऱ्यांचे ढेपाळलेले काम पाहता पालकमंत्र्यांनी त्यांच्याकडील काम काढून ते नासुप्रला देण्याचे निर्देश दिले.‘रिचार्ज शाफ्ट’अंतर्गत जुन्या बोअरवेल, पाण्याचे स्रोत पुन्हा जिवंत करता येऊ शकतात. जीएसडीए हे काम करीत आहे. या कामांसाठी अधिक प्रस्ताव पाठवा. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील १० गावांमधील बंद झालेले पाण्याचे स्रोत रिचार्ज करा. जि.प. सिंचन विभागातर्फे तलावांच्या दुरुस्ती व खोलीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. २५ कोटींची ४७ कामे सुरू आहेत. जिल्हा नियोजन समितीकडून आणखी १७ कोटींची मागणी जि. प. सिंचन विभागाने केली आहे, अशी माहिती या बैठकीतून समोर आली.महिला बचत गटामार्फत बांबू लागवड करारोजगार हमी योजना विभागाने महिलांचे बचत गट तयार करून शासकीय जागेवर बांबू लागवड व एका कुटुंबाला २ झाडे ही योजना राबवावी. रोहयोतून महिलांना २०६ रुपये मजुरी मिळेल व झाडे लागवड होईल. जिल्ह्यातील १३ तालुक्यात ही योजना राबवा. यातून महिला बचत गटाला वर्षभर काम मिळणार आहे.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेWaterपाणी