शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

हिंगणघाट जळीत पीडितेला कृत्रिम नळीद्वारे जेवण : उपचाराचा पाचवा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 20:27 IST

Hinganghat Case : हिंगणघाट जळीत पीडितेला शुक्रवारी कृत्रिम नळीद्वारे जेवण देण्यात आले. प्रकृतीत किंचित सुधारणा होत असली तरी धोक्याबाहेर नसल्याची माहिती, ऑरेंज सिटी हॉस्पिटलचे जळीत तज्ज्ञ व प्लास्टिक सर्जन डॉ. दर्शन रेवनवार व क्रिटीकल केअर तज्ज्ञ डॉ. राजेश अटल यांनी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देअजूनही धोक्याबाहेर नाही

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : हिंगणघाट जळीत पीडितेला शुक्रवारी कृत्रिम नळीद्वारे जेवण देण्यात आले. प्रकृतीत किंचित सुधारणा होत असली तरी धोक्याबाहेर नसल्याची माहिती, ऑरेंज सिटी हॉस्पिटलचे जळीत तज्ज्ञ व प्लास्टिक सर्जन डॉ. दर्शन रेवनवार व क्रिटीकल केअर तज्ज्ञ डॉ. राजेश अटल यांनी पत्रपरिषदेत दिली.डॉ. अटल म्हणाले, आज पीडितेवर शस्त्रक्रिया करण्यात आली. गुरुवारी तिचा रक्तदाब वाढला होता. यामुळे औषधे बदलविण्यात आली. कालच्या तुलनेत आज रक्तदाब सामान्य आहे. परंतु हा रक्तदाब औषधाने कमी झालेला आहे. स्वत:हून नाही. कमी जास्त रक्तदाबामुळे लघवीवर परिणाम होतो. ही संसर्ग होत असल्याची लक्षणे आहे. यामुळे यात आम्ही किती यशस्वी होऊ हे आतातरी सांगणे कठीण आहे. पीडितेचे नव्याने ड्रेसिंग करण्यात आले. शरीरात जंतूसंसर्ग कुठला आहे, याच्या चाचण्या केल्या जातील. सध्यातरी पीडितेला व्हेंटिलेटरची गरज पडली नाही. औषधांना दाद देत आहे. ती शुद्धीवर आहे. परंतु अद्यापही गंभीर आहे. डॉ. रेवनवार म्हणाले, जंतूसंसर्ग होऊ नये म्हणून तिच्या कक्षातील खाटा रिकाम्या ठेवण्यात आल्या आहेत. तिच्या कक्षात केवळ उपचारासाठी डॉक्टर व परिचारिकांनाच जाण्याची परवानगी आहे. निवडक लोकांना काचेतून पाहण्याची व्यवस्था केली आहे. 

केंद्राकडून मदतीची मागणी केली-खा. तडसवर्धा जिल्ह्याचे खा. रामदास तडस यांनी शुक्रवारी नागपुरातील ऑ रेंज सिटी हॉस्पिटलमध्ये जाऊन पीडित तरुणीच्या प्रकृतीची चौकशी केली. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, हिंगणघाटमधील घटना महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहे. लोकसभेत शून्यकाळात सर्व खासदारांनी या घटनेवर आपले विचार मांडले. अशा घटना घडूच नये. कायद्याचा धाक असावा म्हणून कडक नियम तयार करायला हवे. वेळ पडली तर या विषयावर एक दिवसाचे अधिवेशन व्हायला हवे. त्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हायला हवी, अशी मागणीही आहे. या घटनेचे पडसाद जसे महाराष्ट्रात तसे संसदेतही उमटले आहे. पीडितेला केंद्राकडून मदत व्हावी म्हणून भारताचे गृहमंत्री अमित शाह व केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांना विनंती केली आहे. महाराष्ट्र सरकारनेही पीडितेला मदत द्यावी, असेही ते म्हणाले.

टॅग्स :HinganghatहिंगणघाटCrime Newsगुन्हेगारी