शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

भटक्या विमुक्तांच्या प्रश्नावर मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत विशेष बैठक घेणार - दिलीप कांबळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 20:02 IST

राज्यातील मागास व भटक्या विमुक्त समाजाच्या हितासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून या विषयावर लवकरच मुंबईत एक विशेष बैठक मुख्यमंत्र्यांसोबत घेण्यात येईल. या समाजाच्या उन्नतीचा विचार करतांनाच त्यांना जात प्रमाणपत्रांची उपलब्धता करून देण्याकरिता विशेष मोहिम राबविण्याचे आश्वासन’ आज सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आज संघर्ष वाहिनीच्या कार्यकर्त्यांना दिले.

नागपूर : ‘राज्यातील मागास व भटक्या विमुक्त समाजाच्या हितासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून या विषयावर लवकरच मुंबईत एक विशेष बैठक मुख्यमंत्र्यांसोबत घेण्यात येईल. या समाजाच्या उन्नतीचा विचार करतांनाच त्यांना जात प्रमाणपत्रांची उपलब्धता करून देण्याकरिता विशेष मोहिम राबविण्याचे आश्वासन’ आज सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आज संघर्ष वाहिनीच्या कार्यकर्त्यांना दिले. शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या आ. डॉ. नीलम गो-हे यांनी याबाबत पुढाकार घेऊन या बैठकीचे आयोजन केले होते. 

यावेळी बोलतांना आ. डॉ. गो-हे यांनी याबाबत शासनाकडून संघर्ष वाहिनीला देण्यात आलेल्या "निवेदन सापडत नसल्याच्या" उत्तराबाबत विचारणा केली. तसेच या प्रकारांचा गांभीर्यपूर्वक विचार शासनाने करावा अशी सूचना केली.  या कार्यकर्त्यांच्या मागणीवर बोलताना मंत्रीमहोदय म्हणाले की, "भटक्या विमुक्त व मागासवर्गीय अशा सर्व समाजाचे प्रश्न अत्यंत महत्वाचे असून ते सोडविण्याकरिता शासन प्रयत्नशील आहे. या समाजाच्या विकासाकरिता आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल. त्यांना आवश्यक असणा-या जात प्रमाणपत्रे देण्याविषयी विशेष मोहीम हातात घेऊ. त्या त्या गावातील महसूल अधिकारी, पोलिस पाटील, सरपंच यांच्या दाखल्यालाच ग्रुहित धरून ही प्रमाणपत्र देण्याबाबत सूचना देण्यात येतील. विधानपरिषद प्रतोद आ. डॉ. गो-हे यांच्या समवेत याबाबत मा. मुख्यमंत्र्यांकडे याविषयी एक विशेष बैठक संबंधित खात्यांच्या मंत्र्यांसोबत मुंबईत घेण्यात येईल."

यावेळी हरियाणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा , आंध्र प्रदेश व ओरिसा अशा सहा राज्यात मत्स्यव्यवसायाकरिता व त्याच्या लाभार्थ्यांसाठीच्या कल्याणकारी योजना आणि आर्थिक तरतुदीचा सन २०१६ – १७ चा तुलनात्मक अभ्यास असलेला  एक अहवाल या वेळी संघर्ष वाहिनीच्या वतीने मंत्री महोदयांना देण्यात आला. या अहवालावर सविस्तर अभ्यास करून याबाबत शासनाच्या सूचना व अभिप्राय सादर करण्याची सूचना आ. डॉ. गोऱ्हे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिली.

या बैठकींसाठी कृषी व पदुम विभागाचे उपसचिव रविंद्र गुरव, महसूल व वन विभागाचे अनिल शेटे व संघर्ष वाहिनीचे दीनानाथ वाघमारे, प्रभाकर मांढरे, डॉ. रामकृष्ण शिंदे, राजेंद्र बडीये आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Dilip Kambleदिलीप कांबळे