शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

दिले जीवनदान मेलेल्या जीवा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 20:45 IST

कोटी रोग्यांना देऊनी दवा, आला डॉक्टर बनूनी नवा, दिले जीवनदान मेलेल्या जीवा... अशा सोप्या शब्दातील गाण्यातून बाबासाहेबांच्या कार्यांची महत्ती गाऊन उपस्थितांच्या थेट हृदयात साद घातली जात होती. दोन्ही डोळ्यांनी अंध असलेले धम्मानंद मोरे ढोलकीच्या तालावर आणि त्यांच्या पत्नी गंगुबाई पेटीच्या स्वरावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवमुक्तीच्या लढ्याची प्रेरणा, त्यांचे तत्त्वज्ञान आणि मानवमुक्तीचे कार्य जनसामान्यांमध्ये रुजवीत होते.

ठळक मुद्देअंध धम्मानंद, गंगुबाई पेरतात गाण्यातून बाबासाहेबांचे विचार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोटी रोग्यांना देऊनी दवा,आला डॉक्टर बनूनी नवा,दिले जीवनदान मेलेल्या जीवा...अशा सोप्या शब्दातील गाण्यातून बाबासाहेबांच्या कार्यांची महत्ती गाऊन उपस्थितांच्या थेट हृदयात साद घातली जात होती. दोन्ही डोळ्यांनी अंध असलेले धम्मानंद मोरे ढोलकीच्या तालावर आणि त्यांच्या पत्नी गंगुबाई पेटीच्या स्वरावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवमुक्तीच्या लढ्याची प्रेरणा, त्यांचे तत्त्वज्ञान आणि मानवमुक्तीचे कार्य जनसामान्यांमध्ये रुजवीत होते.दीनदलितांच्या उद्धाराचा मार्ग खुला करून त्यांना उज्ज्वल भवितव्याची दिशा दाखवणाऱ्या युगनायक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार गावा-गावापर्यंत पोहचिवण्याचे, समाजमनात रु जविण्याचे मोलाचे कार्य आंबेडकरी जलशांच्या माध्यमामधून झाले. बाबासाहेबांचा परिवर्तनवादी विचार हा या आंबेडकरी जलशांचा प्राण आहे. हीच प्रेरणा घेत जालना जिल्ह्यातील मेठा या गावातील ६० वर्षीय शाहिर धम्मानंद मोरे आणि त्यांच्या पत्नी गंगुबाई ६२ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्यानिमित्ताने दीक्षाभूमीवर आले. येथील बोधीवृक्षाखाली बैठक मारली. बुद्ध वंदना घेऊन भीम गीतातून बाबासाहेबांचे विचार पेरायला सुरुवात केली. सूर-तालांच्या आविष्कारात या दोघांचे अंधत्व कुठेच आड येत नव्हते. धम्मानंद मोरे यांची ढोलकीवरील थाप थेट ऐकणाऱ्याच्या हृदयाला साद घालत होती. ‘भल्या भल्यांना माझ्या भीमानं, पहा कसं लाजवलं, भारतीय संविधान माझ्या भीमानं दिल्लीत गाजवलं’ या त्याच्या गाण्यावर तर अनेक जण थिरकलेही.मोरे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, तथागत गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांच्या पुण्याईमुळेच आज गात आहे. आम्हा दोघाना दिसत नसलेतरी ज्येष्ठ कवी वामनदादा कर्डक, विष्णू शिंदे आदींची गाणी तोंड पाठ आहे. दीनदलितांच्या उद्धाराचा मार्ग खुला करून त्यांना उज्ज्वल भवितव्याची दिशा दाखवणाऱ्या युगनायक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पोहचविताना मिळणारे समाधान मनाला श्रीमंत करते. असे म्हणत, मोरे यांनी ढोलकीवर थाप देत लोकशाहीर वामनदादा कर्डक यांच्या ‘उद्धारली कोटी कुळे, भीमा तुज्या जन्मामुळे...’गाण्याला सुरुवात केली आणि त्यातच ते तल्लीन झाले.

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीDhammbhumiधम्मभूमी