शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
3
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
4
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
5
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
6
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
7
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
8
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
9
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
10
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
11
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
12
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
13
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
14
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
15
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
16
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
17
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
18
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
19
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
20
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?

सन्मानजनक तोडगा तरच काँग्रेससोबत आघाडी :आनंदराज आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 20:31 IST

काँग्रेससोबत चर्चा म्हणजे नेमकी कुणाशी चर्चा ? काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचे म्हणणे त्यांचे हायकमांड ऐकतात का हा मुख्य प्रश्न आहे. आम्ही १२ जागांची मागणी केली आहे. जागांची अदलाबदली होऊ शकते. परंतु सन्मानजनक बोलणी झाली तरच काँग्रेससोबत आघाडी होईल, अन्यथा वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढण्यास तयार आहे, असे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आणि रिपब्लिकन सेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी येथे पत्रपरिषदेत बोलताना स्पष्ट केले.

ठळक मुद्दे सर्व जागा लढण्याची तयारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काँग्रेससोबत चर्चा म्हणजे नेमकी कुणाशी चर्चा ? काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचे म्हणणे त्यांचे हायकमांड ऐकतात का हा मुख्य प्रश्न आहे. आम्ही १२ जागांची मागणी केली आहे. जागांची अदलाबदली होऊ शकते. परंतु सन्मानजनक बोलणी झाली तरच काँग्रेससोबत आघाडी होईल, अन्यथा वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढण्यास तयार आहे, असे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आणि रिपब्लिकन सेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी येथे पत्रपरिषदेत बोलताना स्पष्ट केले.रमाई महोत्सवासाठी ते नागपुरात आले असता रविभवन येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी रमेश जाधव, योगेश चवरे, गिरीष पुलझेले, नरेश वाहाणे उपस्थित होते.आनंदराज आंबेडकर म्हणाले, भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात दलित, पीडित, वंचित एकवटत आहे. शिवाय पुन्हा एकदा आंबेडकरी समाज आंबेडकर कुटुंबाच्या पाठीमागे असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मोठी शक्ती निर्माण झाल्याने राज्यातील राजकारणात आमूलाग्र बदल होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. जेव्हा-जेव्हा समाज एक झाला त्याचे प्रतिनिधित्व संसदेसह विधानसभेत उमटले. येत्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी दोन अंकी आकडा नक्की गाठेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सध्या तर भयावह परिस्थिती असून अल्पसंख्याक व आंबेडकरी समाजावरील अत्याचारात वाढ झाली आहे. हिंदू राष्ट्राच्या संकल्पना मांडल्या जात असतानाच संविधानच बदलण्याची भाषा मोदी सरकारमधील मंत्री करतात. तर शहरी नक्षलवादाच्या नावावर विचारवंतांना गोळ्या घातल्या जात असून कारागृहात सुद्धा डांबले जात आहे. समाजात मोठा असंतोष आहे. आरक्षणाचा नावावर तर चेष्टा सुरू आहे. उद्या विजय माल्ल्या देशात आला तर तो सुद्धा आरक्षणाचा दावा करू शकतो, अशी टीकाही त्यांनी केली.प्रकाश आंबेडकर अकोल्यातूनच लढणारवंचित बहुजन महाआघाडीला प्रत्येक जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. लाखोच्या सभा होत आहेत. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे की, त्यांच्या जिल्ह्यातून अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक लढवावी. सोलापूर येथील कार्यकर्त्यांकडूनही अशी मागणी होत आहे. परंतु, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर हे अकोला येथूनच निवडणूक लढणार आहेत. आपण मात्र पडद्यामागील सूत्रे हलविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरcongressकाँग्रेस