शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
4
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
5
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
6
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
7
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
8
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
9
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
10
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
11
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
12
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
13
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
14
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
15
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
16
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
17
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
18
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
19
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
20
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?

डिजिटलला ग्रहण

By admin | Updated: May 25, 2017 01:36 IST

राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा म्हणून शासनाने नागपूर जिल्ह्याची घोषणा केली होती.

४४९ ग्रा.पं.चे आॅनलाईन कामकाज ठप्प : थकीत बिलाचा भरणा करणार कोण?मंगेश व्यवहारे । लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा म्हणून शासनाने नागपूर जिल्ह्याची घोषणा केली होती. जिल्ह्यातील ७६९ ग्रामपंचायती वायफायने कनेक्ट करण्यात आल्या होत्या. या तंत्रज्ञानामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वत: जिल्ह्यातील डोंगरगाव, बेलदा व ब्राह्मणी येथील शेतकरी, महिला बचत गट व विद्यार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला होता. परंतु आजच्या घडीला जिल्ह्यातील ४४९ ग्रा.पं.चे वायफाय कनेक्शन बंद पडले आहे. वर्षभराच्या आतच डिजिटल जिल्ह्याचा बोजवारा उडाला आहे. राष्ट्रीय आॅप्टिकल फायबर नेटवर्क प्रकल्पांतर्गत २०१४ मध्ये नागपूरची प्रायोगिक तत्त्वावर निवड करण्यात आली होती. शहरासह १३ तालुक्यांमध्ये एकूण १६०० किमी आॅप्टिकल फायबर केबल टाकून ग्रामपंचायतींना कनेक्ट करण्यात आले होते. ३० कोटींच्या प्रकल्पामुळे ग्रामपंचायतसह प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळेसह अन्य संस्था व नागरिकांना अखंडित, दर्जेदार आणि वेगवान इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. पंचायत संस्थांचा कारभार अधिक सक्षम व गतिमान होण्यासाठी ग्रामपंचायतींना वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. ग्रामपंचायत स्तरावर संग्राम कक्षाच्या माध्यमातून २७ प्रकारचे दाखले दिले जातात. ब्रॉडबँड कनेक्टिव्हीटीमुळे ही समस्या दूर झाली होती. लोकांना तात्काळ दाखले मिळत होते. परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही यंत्रणा फार काळ टिकू शकली नाही. आजच्या घडीला जिल्ह्यातील ४४९ ग्रा.पं. चे वायफाय बंद पडले आहे. बीएसएनएलच्या माध्यमातून सेवा पुरविण्यात आली होती. परंतु या यंत्रणेचे बिल थकीत असल्याने यंत्रणा ठप्प पडली आहे. जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाकडे असलेल्या आकडेवारीनुसार १४ एप्रिलपर्यंत ३०५ ग्रा.पं. मध्ये ही सेवा सुरू होती. या ग्रा.पं.वरसुद्धा बिल थकीत होते. त्यामुळे आज यातीलही अनेक ग्रा.पं. ची वायफाय सेवा बंद पडली आहे. प्रशासनाचे दुर्लक्षशासनाच्या अनेक महत्त्वाकांक्षी योजनांची माहिती, जीआर गावकऱ्यांना आॅनलाईन मिळत होते. शासनाचा हा उपक्रम अतिशय प्रभावी होता. परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शासनाने केलेला करोडो रुपयांचा खर्च वाया गेला आहे. त्यामुळे शासनाच्या डिजिटल धोरणात खंड पडला आहे. - संदीप सरोदे, सभापती, पं.स. काटोलशासनाने थकीत बिल भरावेशासनाने करोडो रुपये खर्चून सामान्य जनतेला लाभ झाला नाही. मुळात ग्रा.पं.च्या उत्पन्नाचे स्रोत अत्यल्प असल्याने शासनानेच वायफाय यंत्रणेचे भुगतान करावे.- शरद डोणेकर, उपाध्यक्ष, जि.प.