शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थकाला 'बांगलादेशी' सोडून घेऊन गेले, आसाम पोलिसांवर हल्ला; १० जणांना अटक
3
बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
4
'ती' गेल्याचं ऐकलं अन प्रियकरानेही प्राण सोडले! हॉस्पिटलमधून पळाला अन् काही तासांतच…
5
२०२६ मध्ये चांदीची चमक होणार का कमी? एका झटक्यात ₹२४,४७४ ची घसरण, काय आहेत हे संकेत?
6
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
7
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
8
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
9
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
10
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
11
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
12
नात्याला काळिमा! नराधम पित्याचा १३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; पोलीस आईनेच पतीला धाडले गजाआड
13
कर्ज, किडनी आणि गांजा : शेतकरी या मार्गाने का निघाले?
14
इस्त्रायलच्या सुंदर तरुणी सैनिक का बनतात? 
15
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
16
विनाशकारी विकासाला नकार! अरवलीचे संरक्षण म्हणजे विकासाला विरोध नव्हे...
17
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
18
राज्यातील वाढते रस्ते अपघात रोखा; नितीन गडकरींचे CM ना पत्र, तातडीने उपाययोजना करायची सूचना
19
केंद्र सरकारने साखरेचा विक्री दर वाढवावा; शरद पवार घेणार केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट 
20
आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने...
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटलला ग्रहण

By admin | Updated: May 25, 2017 01:36 IST

राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा म्हणून शासनाने नागपूर जिल्ह्याची घोषणा केली होती.

४४९ ग्रा.पं.चे आॅनलाईन कामकाज ठप्प : थकीत बिलाचा भरणा करणार कोण?मंगेश व्यवहारे । लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा म्हणून शासनाने नागपूर जिल्ह्याची घोषणा केली होती. जिल्ह्यातील ७६९ ग्रामपंचायती वायफायने कनेक्ट करण्यात आल्या होत्या. या तंत्रज्ञानामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वत: जिल्ह्यातील डोंगरगाव, बेलदा व ब्राह्मणी येथील शेतकरी, महिला बचत गट व विद्यार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला होता. परंतु आजच्या घडीला जिल्ह्यातील ४४९ ग्रा.पं.चे वायफाय कनेक्शन बंद पडले आहे. वर्षभराच्या आतच डिजिटल जिल्ह्याचा बोजवारा उडाला आहे. राष्ट्रीय आॅप्टिकल फायबर नेटवर्क प्रकल्पांतर्गत २०१४ मध्ये नागपूरची प्रायोगिक तत्त्वावर निवड करण्यात आली होती. शहरासह १३ तालुक्यांमध्ये एकूण १६०० किमी आॅप्टिकल फायबर केबल टाकून ग्रामपंचायतींना कनेक्ट करण्यात आले होते. ३० कोटींच्या प्रकल्पामुळे ग्रामपंचायतसह प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळेसह अन्य संस्था व नागरिकांना अखंडित, दर्जेदार आणि वेगवान इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. पंचायत संस्थांचा कारभार अधिक सक्षम व गतिमान होण्यासाठी ग्रामपंचायतींना वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. ग्रामपंचायत स्तरावर संग्राम कक्षाच्या माध्यमातून २७ प्रकारचे दाखले दिले जातात. ब्रॉडबँड कनेक्टिव्हीटीमुळे ही समस्या दूर झाली होती. लोकांना तात्काळ दाखले मिळत होते. परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही यंत्रणा फार काळ टिकू शकली नाही. आजच्या घडीला जिल्ह्यातील ४४९ ग्रा.पं. चे वायफाय बंद पडले आहे. बीएसएनएलच्या माध्यमातून सेवा पुरविण्यात आली होती. परंतु या यंत्रणेचे बिल थकीत असल्याने यंत्रणा ठप्प पडली आहे. जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाकडे असलेल्या आकडेवारीनुसार १४ एप्रिलपर्यंत ३०५ ग्रा.पं. मध्ये ही सेवा सुरू होती. या ग्रा.पं.वरसुद्धा बिल थकीत होते. त्यामुळे आज यातीलही अनेक ग्रा.पं. ची वायफाय सेवा बंद पडली आहे. प्रशासनाचे दुर्लक्षशासनाच्या अनेक महत्त्वाकांक्षी योजनांची माहिती, जीआर गावकऱ्यांना आॅनलाईन मिळत होते. शासनाचा हा उपक्रम अतिशय प्रभावी होता. परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शासनाने केलेला करोडो रुपयांचा खर्च वाया गेला आहे. त्यामुळे शासनाच्या डिजिटल धोरणात खंड पडला आहे. - संदीप सरोदे, सभापती, पं.स. काटोलशासनाने थकीत बिल भरावेशासनाने करोडो रुपये खर्चून सामान्य जनतेला लाभ झाला नाही. मुळात ग्रा.पं.च्या उत्पन्नाचे स्रोत अत्यल्प असल्याने शासनानेच वायफाय यंत्रणेचे भुगतान करावे.- शरद डोणेकर, उपाध्यक्ष, जि.प.