शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

‘डिजिटल डिव्हाईस’ मुलांच्या वागणुकीत बाधा : डॉ. छाया प्रसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 20:18 IST

सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन जर तुम्ही टीव्हीसमोर बसत असाल तर त्याच्या मेंदूला नुकसान पोहचते. त्याचा विकास खुंटतो. त्याचे कौशल्य मागे पडते. अलीकडे घराघरात वाढलेले ‘डिजिटल डिव्हाईस’ हे मुलांच्या वागणुकीत बाधा निर्माण करीत आहे, अशी माहिती ‘डेव्हल्पमेंट अ‍ॅण्ड बिहेव्हियरल पेडियाट्रिशयन’ तज्ज्ञ डॉ. छाया प्रसाद यांनी दिली.

ठळक मुद्दे१० टक्के मुलांचा खुंटतो विकास५५ वी भारतीय बालरोग परिषद ‘पेडिकॉन-२०१८’

आॅनलाईन लोकमतनागपूर : १८ महिन्यांचे बाळ होईपर्यंत घरातील टीव्ही, मोबाईल, संगणक सर्व बंद असायला हवे. १८ ते ३ वर्षांच्या बाळाला दिवसातून केवळ १५ ते २० मिनिटे त्याच्या स्तरावरील व त्याला आवडेल असे ‘कॉर्टून शो’ किंवा चित्र किंवा गाणी दाखविता येईल. परंतु सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन जर तुम्ही टीव्हीसमोर बसत असाल तर त्याच्या मेंदूला नुकसान पोहचते. त्याचा विकास खुंटतो. त्याचे कौशल्य मागे पडते. अलीकडे घराघरात वाढलेले ‘डिजिटल डिव्हाईस’ हे मुलांच्या वागणुकीत बाधा निर्माण करीत आहे, अशी माहिती ‘डेव्हल्पमेंट अ‍ॅण्ड बिहेव्हियरल पेडियाट्रिशयन’ तज्ज्ञ डॉ. छाया प्रसाद यांनी दिली.चंदीगड येथील डॉ. प्रसाद या भारतीय बालरोग परिषद नागपूर शाखेच्या यजमान पदाखाली आयोजित ५५व्या भारतीय बालरोग परिषद ‘पेडिकॉन-२०१८’मध्ये सहभागी झाल्या आहेत. शुक्रवारी त्या पत्रकारांशी बोलत होत्या.डॉ. प्रसाद म्हणाल्या, पूर्वी एकत्रित कुटुंब पद्धतीत घरात दोनपेक्षा जास्त माणसे राहायची. ती लहान बाळांशी खेळायची, त्यांच्याशी बोलायची. यामुळे लहान मुलांची शारीरिक व मानसिक वाढ चांगल्या पद्धतीने व्हायची. परंतु आता विभक्त कुटुंब पद्धती असल्याने त्यातही आई-वडील दोन्ही नोकरी करीत असल्याने बाळाला पाळणाघरात किंवा एखाद्या बाईकडे सोपविले जाते. परिणामी, बाळाशी संवाद कमी होतो. त्याच्या ‘डेव्हल्पमेंट’वर प्रभाव पडतो. साधारण १० टक्के मुलांचा विकास यामुळे खुंटतो.दोन-चार महिन्यांचे बाळ हसत नसेल तर गंभीरतेने घ्याडॉ. प्रसाद म्हणाल्या, बाळाची योग्य वाढ होत आहे किंवा नाही हे ओळखण्यासाठी काही लक्षणे आहेत. जसे, दोन-चार महिन्यांचे बाळ आईला पाहून हसत नसेल, त्याला आपली मान सांभाळता येत नसेल, आठ महिन्यांचा होईपर्यंत तो बसत नसेल, १०-११ महिन्यापर्यंत रांगता येत नसेल, एक वर्षापर्यंत आई-बाबा, मम्मी-पप्पा, किंवा दादा-दादी असे शब्द उच्चारता येत नसतील आणि १६ महिन्यापर्यंत तो चालू शकत नसेल तर या सर्व बाबी गंभीर आहेत. आई-वडिलांनी वेळीच ही लक्षणे ओळखून डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.रांगणे हे मेंदूच्या वाढीसाठी महत्त्वाचेसाधारण १० ते ११ महिन्यांची मुले रांगायला पाहतात किंवा रांगतात. परंतु अनेक आई-वडील बाळाला लागेल किंवा फरशी घाण आहे किंवा इतर कारणाने त्याला रांगू देत नाही. परंतु मानसिक विकासासाठी बाळाला रांगू देणे फार महत्त्वाचे आहे. कारण, तो रांगताना एक हात आणि पाय समोर तर दुसरा हात आणि पाय मागे घेतो, मेंदूसाठी ही क्रिया महत्त्वाची ठरते.मुलांना मोकळे खेळू द्यामुलांच्या वाढीसाठी त्याचे मनमोकळे खेळणे महत्त्वाचे आहे. कारण खेळताना त्याची पाच इंद्रिय सक्रिय होतात. जी त्याच्या वाढीसाठी महत्त्वाची ठरतात. यामुळे रोज एक तास मुलांनी खेळायला हवे. याशिवाय पालकांनी ‘ओव्हर प्रोटेक्ट’ नसायला हवे, असा सल्लाही डॉ. प्रसाद यांनी दिला.मेंदू विकासासाठी साडीच्या पाळण्याची होते मदतसाडीच्या पाळण्यात लहान मुलांना दुपारच्यावेळी झोपवले किंवा ठेवले तर त्याच्या मेंदूचा विकास होतो, हे एका संशोधनातून सामोर आले आहे. या सोबतच तान्ह्या बाळासोबत त्याच्या नजरेला नजर भिडवून संवाद साधल्यास, त्याला झोपविताना गाणी म्हटल्यास मुलाची मानसिक वाढ चांगली होते, असेही डॉ. प्रसाद यांनी सांगितले.

 

टॅग्स :doctorडॉक्टरnagpurनागपूर