शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

‘डिजिटल डिव्हाईस’ मुलांच्या वागणुकीत बाधा : डॉ. छाया प्रसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 20:18 IST

सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन जर तुम्ही टीव्हीसमोर बसत असाल तर त्याच्या मेंदूला नुकसान पोहचते. त्याचा विकास खुंटतो. त्याचे कौशल्य मागे पडते. अलीकडे घराघरात वाढलेले ‘डिजिटल डिव्हाईस’ हे मुलांच्या वागणुकीत बाधा निर्माण करीत आहे, अशी माहिती ‘डेव्हल्पमेंट अ‍ॅण्ड बिहेव्हियरल पेडियाट्रिशयन’ तज्ज्ञ डॉ. छाया प्रसाद यांनी दिली.

ठळक मुद्दे१० टक्के मुलांचा खुंटतो विकास५५ वी भारतीय बालरोग परिषद ‘पेडिकॉन-२०१८’

आॅनलाईन लोकमतनागपूर : १८ महिन्यांचे बाळ होईपर्यंत घरातील टीव्ही, मोबाईल, संगणक सर्व बंद असायला हवे. १८ ते ३ वर्षांच्या बाळाला दिवसातून केवळ १५ ते २० मिनिटे त्याच्या स्तरावरील व त्याला आवडेल असे ‘कॉर्टून शो’ किंवा चित्र किंवा गाणी दाखविता येईल. परंतु सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन जर तुम्ही टीव्हीसमोर बसत असाल तर त्याच्या मेंदूला नुकसान पोहचते. त्याचा विकास खुंटतो. त्याचे कौशल्य मागे पडते. अलीकडे घराघरात वाढलेले ‘डिजिटल डिव्हाईस’ हे मुलांच्या वागणुकीत बाधा निर्माण करीत आहे, अशी माहिती ‘डेव्हल्पमेंट अ‍ॅण्ड बिहेव्हियरल पेडियाट्रिशयन’ तज्ज्ञ डॉ. छाया प्रसाद यांनी दिली.चंदीगड येथील डॉ. प्रसाद या भारतीय बालरोग परिषद नागपूर शाखेच्या यजमान पदाखाली आयोजित ५५व्या भारतीय बालरोग परिषद ‘पेडिकॉन-२०१८’मध्ये सहभागी झाल्या आहेत. शुक्रवारी त्या पत्रकारांशी बोलत होत्या.डॉ. प्रसाद म्हणाल्या, पूर्वी एकत्रित कुटुंब पद्धतीत घरात दोनपेक्षा जास्त माणसे राहायची. ती लहान बाळांशी खेळायची, त्यांच्याशी बोलायची. यामुळे लहान मुलांची शारीरिक व मानसिक वाढ चांगल्या पद्धतीने व्हायची. परंतु आता विभक्त कुटुंब पद्धती असल्याने त्यातही आई-वडील दोन्ही नोकरी करीत असल्याने बाळाला पाळणाघरात किंवा एखाद्या बाईकडे सोपविले जाते. परिणामी, बाळाशी संवाद कमी होतो. त्याच्या ‘डेव्हल्पमेंट’वर प्रभाव पडतो. साधारण १० टक्के मुलांचा विकास यामुळे खुंटतो.दोन-चार महिन्यांचे बाळ हसत नसेल तर गंभीरतेने घ्याडॉ. प्रसाद म्हणाल्या, बाळाची योग्य वाढ होत आहे किंवा नाही हे ओळखण्यासाठी काही लक्षणे आहेत. जसे, दोन-चार महिन्यांचे बाळ आईला पाहून हसत नसेल, त्याला आपली मान सांभाळता येत नसेल, आठ महिन्यांचा होईपर्यंत तो बसत नसेल, १०-११ महिन्यापर्यंत रांगता येत नसेल, एक वर्षापर्यंत आई-बाबा, मम्मी-पप्पा, किंवा दादा-दादी असे शब्द उच्चारता येत नसतील आणि १६ महिन्यापर्यंत तो चालू शकत नसेल तर या सर्व बाबी गंभीर आहेत. आई-वडिलांनी वेळीच ही लक्षणे ओळखून डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.रांगणे हे मेंदूच्या वाढीसाठी महत्त्वाचेसाधारण १० ते ११ महिन्यांची मुले रांगायला पाहतात किंवा रांगतात. परंतु अनेक आई-वडील बाळाला लागेल किंवा फरशी घाण आहे किंवा इतर कारणाने त्याला रांगू देत नाही. परंतु मानसिक विकासासाठी बाळाला रांगू देणे फार महत्त्वाचे आहे. कारण, तो रांगताना एक हात आणि पाय समोर तर दुसरा हात आणि पाय मागे घेतो, मेंदूसाठी ही क्रिया महत्त्वाची ठरते.मुलांना मोकळे खेळू द्यामुलांच्या वाढीसाठी त्याचे मनमोकळे खेळणे महत्त्वाचे आहे. कारण खेळताना त्याची पाच इंद्रिय सक्रिय होतात. जी त्याच्या वाढीसाठी महत्त्वाची ठरतात. यामुळे रोज एक तास मुलांनी खेळायला हवे. याशिवाय पालकांनी ‘ओव्हर प्रोटेक्ट’ नसायला हवे, असा सल्लाही डॉ. प्रसाद यांनी दिला.मेंदू विकासासाठी साडीच्या पाळण्याची होते मदतसाडीच्या पाळण्यात लहान मुलांना दुपारच्यावेळी झोपवले किंवा ठेवले तर त्याच्या मेंदूचा विकास होतो, हे एका संशोधनातून सामोर आले आहे. या सोबतच तान्ह्या बाळासोबत त्याच्या नजरेला नजर भिडवून संवाद साधल्यास, त्याला झोपविताना गाणी म्हटल्यास मुलाची मानसिक वाढ चांगली होते, असेही डॉ. प्रसाद यांनी सांगितले.

 

टॅग्स :doctorडॉक्टरnagpurनागपूर