शहरं
Join us  
Trending Stories
1
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
2
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
3
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
4
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
5
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
6
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
7
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
8
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
9
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
10
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
11
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
12
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
13
‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय
14
अग्रलेख: हिंदीचे ओझे कशाला? राजकारण करण्याच्या सवयीने घात झाला
15
प्रियकर खर्चापोटी एक लाख रुपये देणार; अखेर २५ आठवड्यांच्या गर्भपातास हायकोर्टाने दिली परवानगी 
16
Axiom Mission 4: भारताचा शुभांशू शुक्ला आज झेपावणार अंतराळात
17
Operation Sindhu: इराण, इस्रायलमधून आणखी १,१०० भारतीय मायदेशात, विमान कंपन्यांची मध्य-पूर्वेतील उड्डाणे थांबली
18
आरोग्यसेवेचे मोल शून्य; राज्यातील ३२ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा २ महिन्यांचा पगार थकला
19
एसीबीच्या अहवालामुळे  सिडको प्रशासन हादरले, कार्मिक विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
20
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी

‘डिजिटल डिव्हाईस’ मुलांच्या वागणुकीत बाधा : डॉ. छाया प्रसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 20:18 IST

सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन जर तुम्ही टीव्हीसमोर बसत असाल तर त्याच्या मेंदूला नुकसान पोहचते. त्याचा विकास खुंटतो. त्याचे कौशल्य मागे पडते. अलीकडे घराघरात वाढलेले ‘डिजिटल डिव्हाईस’ हे मुलांच्या वागणुकीत बाधा निर्माण करीत आहे, अशी माहिती ‘डेव्हल्पमेंट अ‍ॅण्ड बिहेव्हियरल पेडियाट्रिशयन’ तज्ज्ञ डॉ. छाया प्रसाद यांनी दिली.

ठळक मुद्दे१० टक्के मुलांचा खुंटतो विकास५५ वी भारतीय बालरोग परिषद ‘पेडिकॉन-२०१८’

आॅनलाईन लोकमतनागपूर : १८ महिन्यांचे बाळ होईपर्यंत घरातील टीव्ही, मोबाईल, संगणक सर्व बंद असायला हवे. १८ ते ३ वर्षांच्या बाळाला दिवसातून केवळ १५ ते २० मिनिटे त्याच्या स्तरावरील व त्याला आवडेल असे ‘कॉर्टून शो’ किंवा चित्र किंवा गाणी दाखविता येईल. परंतु सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन जर तुम्ही टीव्हीसमोर बसत असाल तर त्याच्या मेंदूला नुकसान पोहचते. त्याचा विकास खुंटतो. त्याचे कौशल्य मागे पडते. अलीकडे घराघरात वाढलेले ‘डिजिटल डिव्हाईस’ हे मुलांच्या वागणुकीत बाधा निर्माण करीत आहे, अशी माहिती ‘डेव्हल्पमेंट अ‍ॅण्ड बिहेव्हियरल पेडियाट्रिशयन’ तज्ज्ञ डॉ. छाया प्रसाद यांनी दिली.चंदीगड येथील डॉ. प्रसाद या भारतीय बालरोग परिषद नागपूर शाखेच्या यजमान पदाखाली आयोजित ५५व्या भारतीय बालरोग परिषद ‘पेडिकॉन-२०१८’मध्ये सहभागी झाल्या आहेत. शुक्रवारी त्या पत्रकारांशी बोलत होत्या.डॉ. प्रसाद म्हणाल्या, पूर्वी एकत्रित कुटुंब पद्धतीत घरात दोनपेक्षा जास्त माणसे राहायची. ती लहान बाळांशी खेळायची, त्यांच्याशी बोलायची. यामुळे लहान मुलांची शारीरिक व मानसिक वाढ चांगल्या पद्धतीने व्हायची. परंतु आता विभक्त कुटुंब पद्धती असल्याने त्यातही आई-वडील दोन्ही नोकरी करीत असल्याने बाळाला पाळणाघरात किंवा एखाद्या बाईकडे सोपविले जाते. परिणामी, बाळाशी संवाद कमी होतो. त्याच्या ‘डेव्हल्पमेंट’वर प्रभाव पडतो. साधारण १० टक्के मुलांचा विकास यामुळे खुंटतो.दोन-चार महिन्यांचे बाळ हसत नसेल तर गंभीरतेने घ्याडॉ. प्रसाद म्हणाल्या, बाळाची योग्य वाढ होत आहे किंवा नाही हे ओळखण्यासाठी काही लक्षणे आहेत. जसे, दोन-चार महिन्यांचे बाळ आईला पाहून हसत नसेल, त्याला आपली मान सांभाळता येत नसेल, आठ महिन्यांचा होईपर्यंत तो बसत नसेल, १०-११ महिन्यापर्यंत रांगता येत नसेल, एक वर्षापर्यंत आई-बाबा, मम्मी-पप्पा, किंवा दादा-दादी असे शब्द उच्चारता येत नसतील आणि १६ महिन्यापर्यंत तो चालू शकत नसेल तर या सर्व बाबी गंभीर आहेत. आई-वडिलांनी वेळीच ही लक्षणे ओळखून डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.रांगणे हे मेंदूच्या वाढीसाठी महत्त्वाचेसाधारण १० ते ११ महिन्यांची मुले रांगायला पाहतात किंवा रांगतात. परंतु अनेक आई-वडील बाळाला लागेल किंवा फरशी घाण आहे किंवा इतर कारणाने त्याला रांगू देत नाही. परंतु मानसिक विकासासाठी बाळाला रांगू देणे फार महत्त्वाचे आहे. कारण, तो रांगताना एक हात आणि पाय समोर तर दुसरा हात आणि पाय मागे घेतो, मेंदूसाठी ही क्रिया महत्त्वाची ठरते.मुलांना मोकळे खेळू द्यामुलांच्या वाढीसाठी त्याचे मनमोकळे खेळणे महत्त्वाचे आहे. कारण खेळताना त्याची पाच इंद्रिय सक्रिय होतात. जी त्याच्या वाढीसाठी महत्त्वाची ठरतात. यामुळे रोज एक तास मुलांनी खेळायला हवे. याशिवाय पालकांनी ‘ओव्हर प्रोटेक्ट’ नसायला हवे, असा सल्लाही डॉ. प्रसाद यांनी दिला.मेंदू विकासासाठी साडीच्या पाळण्याची होते मदतसाडीच्या पाळण्यात लहान मुलांना दुपारच्यावेळी झोपवले किंवा ठेवले तर त्याच्या मेंदूचा विकास होतो, हे एका संशोधनातून सामोर आले आहे. या सोबतच तान्ह्या बाळासोबत त्याच्या नजरेला नजर भिडवून संवाद साधल्यास, त्याला झोपविताना गाणी म्हटल्यास मुलाची मानसिक वाढ चांगली होते, असेही डॉ. प्रसाद यांनी सांगितले.

 

टॅग्स :doctorडॉक्टरnagpurनागपूर