शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

दिगंबर जैन समाजाचे पर्युषण पर्व २३ पासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 01:12 IST

शहरासह देशभरात कोरोना संक्रमितांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. त्यामुळे हा चिंतेचा विषय झाला आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन यंदाचे पर्युषण पर्व घरातूनच पाळण्याचे आवाहन जैन साधूंनी केले आहे.

ठळक मुद्देघरूनच पर्व पाळा : जैन संतांनी केले आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरासह देशभरात कोरोना संक्रमितांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. त्यामुळे हा चिंतेचा विषय झाला आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन यंदाचे पर्युषण पर्व घरातूनच पाळण्याचे आवाहन जैन साधूंनी केले आहे. दिगंबर जैन समाजाचे पर्युषण पर्व रविवार २३ ऑगस्टपासून सुरू होत असून १ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.पर्युषण पर्वाला आत्मशुद्धीचे पर्व, त्यागाचे पर्व आणि सर्व पर्वांचा राजा म्हटले जाते. पर्युषण पर्वाला दशलक्षणदेखील म्हटले जाते. या पर्वामध्ये व्रत, पूजन, तप, संयम, साधना केली जाते. लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंतचे सर्व श्रावक-श्राविका उपवास ठेवतात. या पर्वाची सर्वांनाच मोठी उत्सुकता असते. पर्युषण पर्वाचे दहा दिवस वेगवेगळ्या धर्माच्या नावाने ओळखले जातात. पर्युषण पर्वाचा पहिला दिवस उत्तम क्षमा धर्म असतो. त्यानंतर दुसरा दिवस मार्दव धर्म, तिसरा दिवस उत्तम आर्जव धर्म, चौथा दिवस उत्तम सत्य धर्म, पाचवा दिवस उत्तम शौच धर्म, सहावा दिवस उत्तम संयम धर्म, सातवा दिवस उत्तम तप धर्म, आठवा दिवस उत्तम त्याग धर्म, नववा दिवस उत्तम आकिंचन्य धर्म आणि दहावा दिवस उत्तम ब्रह्मचर्य धर्म असतो. जैन मान्यतेमधील हा सर्वात मोठा सण आहे. या काळात जैन मंदिरांमध्ये सकाळपासूनच आवागमन असते. अभिषेक, पूजन, विधान आदींचे दिवसभर मंदिरात आयोजन होत असते. श्रावक-श्राविका दूरवरून मंदिरांमध्ये येतात. अनेक महानुभाव तर अभिषेक पाहिल्यावर किंवा पूजन केल्यावरच पाणी किंवा अन्य वस्तूंचे ग्रहण करतात. पर्युषण पर्वाच्या अखेरच्या दिवशी जैनधर्मीय बांधव एकमेकांची क्षमायाचना करतात.जैन संत वात्सल्यवारिधी आचार्यश्री वर्धमानसागरजी, संतशिरोमणी आचार्यश्री विद्यासागरजी, आचार्यश्री पुष्पदंतसागरजी, सारस्वताचार्य देवनंदीजी, आचार्यश्री गुप्तिनंदीजी, आचार्यश्री पुलकसागरजी यांनी यावर्षी पर्युषण पर्व घरातच पाळावे, असे आवाहन केले आहे. सर्व प्रकारचे व्रत, पूजन घरातच करावे. मंदिरात कोणत्याही कार्यक्रमांचे, क्षमावाणीचे आयोजन करू नये. एकमेकांना मोबाईल, टेलिफोनसारख्या संपर्क साधनांच्या माध्यमातून क्षमायाचना करावी. अनावश्यक घराबाहेर पडू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

टॅग्स :Jain Templeजैन मंदीरnagpurनागपूर