शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
3
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
4
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
5
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
6
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
7
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
8
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
9
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
10
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
11
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
12
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
13
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
14
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
15
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
16
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
17
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
18
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
19
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
20
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

दिगंबर जैन समाजाचे पर्युषण पर्व २३ पासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 01:12 IST

शहरासह देशभरात कोरोना संक्रमितांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. त्यामुळे हा चिंतेचा विषय झाला आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन यंदाचे पर्युषण पर्व घरातूनच पाळण्याचे आवाहन जैन साधूंनी केले आहे.

ठळक मुद्देघरूनच पर्व पाळा : जैन संतांनी केले आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरासह देशभरात कोरोना संक्रमितांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. त्यामुळे हा चिंतेचा विषय झाला आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन यंदाचे पर्युषण पर्व घरातूनच पाळण्याचे आवाहन जैन साधूंनी केले आहे. दिगंबर जैन समाजाचे पर्युषण पर्व रविवार २३ ऑगस्टपासून सुरू होत असून १ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.पर्युषण पर्वाला आत्मशुद्धीचे पर्व, त्यागाचे पर्व आणि सर्व पर्वांचा राजा म्हटले जाते. पर्युषण पर्वाला दशलक्षणदेखील म्हटले जाते. या पर्वामध्ये व्रत, पूजन, तप, संयम, साधना केली जाते. लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंतचे सर्व श्रावक-श्राविका उपवास ठेवतात. या पर्वाची सर्वांनाच मोठी उत्सुकता असते. पर्युषण पर्वाचे दहा दिवस वेगवेगळ्या धर्माच्या नावाने ओळखले जातात. पर्युषण पर्वाचा पहिला दिवस उत्तम क्षमा धर्म असतो. त्यानंतर दुसरा दिवस मार्दव धर्म, तिसरा दिवस उत्तम आर्जव धर्म, चौथा दिवस उत्तम सत्य धर्म, पाचवा दिवस उत्तम शौच धर्म, सहावा दिवस उत्तम संयम धर्म, सातवा दिवस उत्तम तप धर्म, आठवा दिवस उत्तम त्याग धर्म, नववा दिवस उत्तम आकिंचन्य धर्म आणि दहावा दिवस उत्तम ब्रह्मचर्य धर्म असतो. जैन मान्यतेमधील हा सर्वात मोठा सण आहे. या काळात जैन मंदिरांमध्ये सकाळपासूनच आवागमन असते. अभिषेक, पूजन, विधान आदींचे दिवसभर मंदिरात आयोजन होत असते. श्रावक-श्राविका दूरवरून मंदिरांमध्ये येतात. अनेक महानुभाव तर अभिषेक पाहिल्यावर किंवा पूजन केल्यावरच पाणी किंवा अन्य वस्तूंचे ग्रहण करतात. पर्युषण पर्वाच्या अखेरच्या दिवशी जैनधर्मीय बांधव एकमेकांची क्षमायाचना करतात.जैन संत वात्सल्यवारिधी आचार्यश्री वर्धमानसागरजी, संतशिरोमणी आचार्यश्री विद्यासागरजी, आचार्यश्री पुष्पदंतसागरजी, सारस्वताचार्य देवनंदीजी, आचार्यश्री गुप्तिनंदीजी, आचार्यश्री पुलकसागरजी यांनी यावर्षी पर्युषण पर्व घरातच पाळावे, असे आवाहन केले आहे. सर्व प्रकारचे व्रत, पूजन घरातच करावे. मंदिरात कोणत्याही कार्यक्रमांचे, क्षमावाणीचे आयोजन करू नये. एकमेकांना मोबाईल, टेलिफोनसारख्या संपर्क साधनांच्या माध्यमातून क्षमायाचना करावी. अनावश्यक घराबाहेर पडू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

टॅग्स :Jain Templeजैन मंदीरnagpurनागपूर