शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरला पुन्हा पाच कोळसा खाणींचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2021 10:49 IST

Nagpur News नागपूरच्या आसपास तीन औष्णिक वीजनिर्मिती केंद्रे आणि अनेक काेळसा खाणी असल्याने जिल्ह्यात प्रदूषणाचा स्तर दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत पुन्हा काेळसा खाणींना मंजुरी दिल्याने नागपूरकरांच्या त्रासात भर पडणार आहे.

ठळक मुद्देपर्यावरणवाद्यांचा विराेधप्रदूषण, तापमानात पडेल भर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जिल्ह्यात पाच नवीन काेळसा खाणींना केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. नागपूरच्या आसपास तीन औष्णिक वीजनिर्मिती केंद्रे आणि अनेक काेळसा खाणी असल्याने जिल्ह्यात प्रदूषणाचा स्तर दिवसेंदिवस वाढत असून, दरवर्षी वाढणारे तापमान असह्य करीत आहे. अशा परिस्थितीत पुन्हा काेळसा खाणींना मंजुरी दिल्याने नागपूरकरांच्या त्रासात भर पडणार आहे. विदर्भाच्या पर्यावरणावर घातक परिणाम करणाऱ्या या निर्णयावर पर्यावरणवादी संघटनांनी तीव्र आक्षेप नाेंदविला आहे.

केंद्र शासनाने काेळसा विक्रीच्या उद्देशाने काेळसा खाणींची लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. या खाणी खाजगी क्षेत्रांना वितरित केल्या जाणार आहेत. याअंतर्गत नागपूर जिल्ह्यात दहेगाव/मकरधाेकडा ४, गाेंडखैरी, खापा व विस्तार, दहेगाव-धापेवाडा व टाेंडखैरी खंडाळा, हिंगणा बाजारगाव व कळंबी कळमेश्वर येथे नवीन काेळसा खाणी प्रस्तावित आहेत. तसेच चंद्रपूर जिल्ह्याच्या भिवकुंड येथे खाण प्रस्तावित आहे. गाेंडखैरी काेल ब्लाॅक अदानी पाॅवरला तर भिवकुंड काेल ब्लाॅक सनफ्लॅगला वितरित करण्यात आली आहे.

काेळसा खाणींना मंजुरी देण्याच्या केंद्र सरकारच्या या निर्णयाचा विदर्भ एनव्हायर्नमेंट ॲक्शन ग्रुप (व्हीआयएजी)ने तीव्र विराेध केला आहे. ग्रुपचे संयोजक सुधीर पालीवाल म्हणाले, विदर्भ आधीच खाणी आणि औष्णिक विद्युत केंद्राच्या प्रदूषणाने पीडित आहे. अशात नवीन काेळसा खाणी सुरू केल्यास प्रदूषणाचा स्तर प्रचंड वाढेल आणि नागरिकांना आराेग्य समस्यांचा सामना करावा लागेल. पालिवाल यांच्या मते या नवीन खाणींमधून निघणाऱ्या काेळशाचा उपयाेग स्वाभाविकपणे विद्युत केंद्रातच केला जाणार आहे. विदर्भात आधीच मुबलक प्रमाणात विजेचे उत्पादन केले जाते आणि त्या प्रदूषणाचा त्रासही येथील लाेकांना भाेगावा लागताे आहे. नवीन वीज केंद्रे या प्रदूषणात आणखी भर घालणार आहेत. यावर धक्कादायक म्हणजे एकाही वीज केंद्रावर प्रदूषण राेखण्यासाठी एफजीडी प्लॅन्ट लावण्यात आलेले नाही. त्यामुळे या नव्या खाणी सुरू झाल्या तर विदर्भ हे देशातील सर्वाधिक प्रदूषित क्षेत्र म्हणून ओळखले जाईल, असा धाेका त्यांनी व्यक्त केला.

पर्यावरणाचीही मंजुरी नाही

नवीन काेळसा खाणी नागपूर शहराच्या २५ किलाेमीटरच्या परिघात आहेत. मात्र यांची बाेली लावण्यापूर्वी काेळसा मंत्रालयाने पर्यावरणाबाबत आवश्यक काेणत्याही परवानग्या घेतलेल्या नसल्याचा आराेप व्हीआयएजीने केला आहे. या नवीन काेळसा खाणींमुळे विदर्भातील सुपीक जमीन ओसाड हाेण्याची भीती संस्थेने व्यक्त केली आहे.

हिट आयलँड इफेक्टचा सामना

नागपूर शहर आधीच अर्बन हिट आयलँड इफेक्टच्या प्रभावात आहे. नीरीच्या अहवालानुसार दाेन दशकात सरासरी तापमानात ८० टक्क्यांनी वाढ झाली आहे. २००० ते २०१९ पर्यंत १८ उष्ण लहरींचा सामना करावा लागला तर १६ वेळा सर्फेस टेम्प्रेचर सरासरीपेक्षा वर गेलेले आहे. याचे कारण वाढत्या वाहनसंख्येसह आसपास असलेली वीज निर्मिती केंद्रे आणि अनेक प्रकारच्या खाणी असल्याचे पर्यावरण अभ्यासकांचे मत आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषण