शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

नागपूरला पुन्हा पाच कोळसा खाणींचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2021 10:49 IST

Nagpur News नागपूरच्या आसपास तीन औष्णिक वीजनिर्मिती केंद्रे आणि अनेक काेळसा खाणी असल्याने जिल्ह्यात प्रदूषणाचा स्तर दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत पुन्हा काेळसा खाणींना मंजुरी दिल्याने नागपूरकरांच्या त्रासात भर पडणार आहे.

ठळक मुद्देपर्यावरणवाद्यांचा विराेधप्रदूषण, तापमानात पडेल भर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जिल्ह्यात पाच नवीन काेळसा खाणींना केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. नागपूरच्या आसपास तीन औष्णिक वीजनिर्मिती केंद्रे आणि अनेक काेळसा खाणी असल्याने जिल्ह्यात प्रदूषणाचा स्तर दिवसेंदिवस वाढत असून, दरवर्षी वाढणारे तापमान असह्य करीत आहे. अशा परिस्थितीत पुन्हा काेळसा खाणींना मंजुरी दिल्याने नागपूरकरांच्या त्रासात भर पडणार आहे. विदर्भाच्या पर्यावरणावर घातक परिणाम करणाऱ्या या निर्णयावर पर्यावरणवादी संघटनांनी तीव्र आक्षेप नाेंदविला आहे.

केंद्र शासनाने काेळसा विक्रीच्या उद्देशाने काेळसा खाणींची लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. या खाणी खाजगी क्षेत्रांना वितरित केल्या जाणार आहेत. याअंतर्गत नागपूर जिल्ह्यात दहेगाव/मकरधाेकडा ४, गाेंडखैरी, खापा व विस्तार, दहेगाव-धापेवाडा व टाेंडखैरी खंडाळा, हिंगणा बाजारगाव व कळंबी कळमेश्वर येथे नवीन काेळसा खाणी प्रस्तावित आहेत. तसेच चंद्रपूर जिल्ह्याच्या भिवकुंड येथे खाण प्रस्तावित आहे. गाेंडखैरी काेल ब्लाॅक अदानी पाॅवरला तर भिवकुंड काेल ब्लाॅक सनफ्लॅगला वितरित करण्यात आली आहे.

काेळसा खाणींना मंजुरी देण्याच्या केंद्र सरकारच्या या निर्णयाचा विदर्भ एनव्हायर्नमेंट ॲक्शन ग्रुप (व्हीआयएजी)ने तीव्र विराेध केला आहे. ग्रुपचे संयोजक सुधीर पालीवाल म्हणाले, विदर्भ आधीच खाणी आणि औष्णिक विद्युत केंद्राच्या प्रदूषणाने पीडित आहे. अशात नवीन काेळसा खाणी सुरू केल्यास प्रदूषणाचा स्तर प्रचंड वाढेल आणि नागरिकांना आराेग्य समस्यांचा सामना करावा लागेल. पालिवाल यांच्या मते या नवीन खाणींमधून निघणाऱ्या काेळशाचा उपयाेग स्वाभाविकपणे विद्युत केंद्रातच केला जाणार आहे. विदर्भात आधीच मुबलक प्रमाणात विजेचे उत्पादन केले जाते आणि त्या प्रदूषणाचा त्रासही येथील लाेकांना भाेगावा लागताे आहे. नवीन वीज केंद्रे या प्रदूषणात आणखी भर घालणार आहेत. यावर धक्कादायक म्हणजे एकाही वीज केंद्रावर प्रदूषण राेखण्यासाठी एफजीडी प्लॅन्ट लावण्यात आलेले नाही. त्यामुळे या नव्या खाणी सुरू झाल्या तर विदर्भ हे देशातील सर्वाधिक प्रदूषित क्षेत्र म्हणून ओळखले जाईल, असा धाेका त्यांनी व्यक्त केला.

पर्यावरणाचीही मंजुरी नाही

नवीन काेळसा खाणी नागपूर शहराच्या २५ किलाेमीटरच्या परिघात आहेत. मात्र यांची बाेली लावण्यापूर्वी काेळसा मंत्रालयाने पर्यावरणाबाबत आवश्यक काेणत्याही परवानग्या घेतलेल्या नसल्याचा आराेप व्हीआयएजीने केला आहे. या नवीन काेळसा खाणींमुळे विदर्भातील सुपीक जमीन ओसाड हाेण्याची भीती संस्थेने व्यक्त केली आहे.

हिट आयलँड इफेक्टचा सामना

नागपूर शहर आधीच अर्बन हिट आयलँड इफेक्टच्या प्रभावात आहे. नीरीच्या अहवालानुसार दाेन दशकात सरासरी तापमानात ८० टक्क्यांनी वाढ झाली आहे. २००० ते २०१९ पर्यंत १८ उष्ण लहरींचा सामना करावा लागला तर १६ वेळा सर्फेस टेम्प्रेचर सरासरीपेक्षा वर गेलेले आहे. याचे कारण वाढत्या वाहनसंख्येसह आसपास असलेली वीज निर्मिती केंद्रे आणि अनेक प्रकारच्या खाणी असल्याचे पर्यावरण अभ्यासकांचे मत आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषण