शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

सत्तेत असताना झोपले होते का? जि.प.च्या ७७ कोटीच्या निधीवरून राजकारण तापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 20:18 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अडकून पडलेला ७७ कोटी रुपयांच्या निधीवरून आता राजकारण तापले आहे. विरोधकांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. विरोधकांच्या मागणीला उत्तर देताना जि.प.च्या सत्ताधाऱ्यांनी ७ वर्षे सत्तेत असताना झोपले होते का? असा प्रतिप्रश्न करीत विरोधकांनाच टार्गेट केले आहे.

ठळक मुद्देसत्ताधाऱ्यांचा विरोधकांवर आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अडकून पडलेला ७७ कोटी रुपयांच्या निधीवरून आता राजकारण तापले आहे. विरोधकांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. विरोधकांच्या मागणीला उत्तर देताना जि.प.च्या सत्ताधाऱ्यांनी ७ वर्षे सत्तेत असताना झोपले होते का? असा प्रतिप्रश्न करीत विरोधकांनाच टार्गेट केले आहे.शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेने अखर्चित असलेला ८० कोटी रुपयांचा निधी सरकारच्या कोषात जमा केला आहे. परंतु २०१३-१४ पासून ठेवीच्या स्वरूपात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ७७ कोटी रुपयांचा निधी अडकला आहे. अखर्चित निधीचा लेखाजोखा मांडताना जिल्हा परिषदेने ७७ कोटीच्या निधीचा त्यात समावेश केला नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेने बँकेत अडकलेल्या ७७ कोटीचा हिशेब द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अनिल निधान यांनी केली होती.पूर्वी जिल्हा परिषदेचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत खाते होते. शासनाकडून येणारा निधी हा बँकेत जमा केला जायचा. परंतु बँक अवसायनात आल्याने ७७ कोटीचा निधी बँकेत अडकला आहे. शासनाने बँकेकडून जिल्हा परिषदेला निधी परत मिळण्यासाठी मदत करावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. यासंदर्भात वित्त सभापती भारती पाटील म्हणाल्या की, वित्त विभागाचा बँकेशी पत्रव्यवहार सुरू आहे. आम्ही हा निधी कसा परत आणता येईल, यासाठी पूर्ण प्रयत्न करू.आरोप करणाऱ्यांची सत्ता जिल्हा परिषदेत ७ वर्षे होती. या दरम्यान त्यांनी निधी परत आणण्यासाठी काय केले, याचे स्पष्टीकरण द्यावे आणि नंतरच आरोप करावा.तापेश्वर वैद्य, कृषी सभापती, जि.प.सत्ता असताना गप्प का होतेजिल्हा परिषदेत भाजपची सत्ता असताना काय दिवे लावले, हे सरकारी कोषात जमा झालेल्या अखर्चित निधीवरून लक्षात येते. जनतेच्या हक्काचा ८० कोटीचा निधी परत पाठविण्याची वेळ जि.प.वर आली आहे. ७७ कोटीचासुद्धा निधी यांच्याच कार्यकाळातील आहे. तेव्हा राज्यात आणि केंद्रातही त्यांची सत्ता होती. ७ वर्षे सत्ताधारी गप्प होते. तेव्हा १ रुपयाही निधी परत आणला नाही.मनोहर कुंभारे, उपाध्यक्ष, जि.प.

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरPoliticsराजकारण