शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

नांद येथे डायरियाची लागण

By admin | Updated: May 29, 2014 03:25 IST

भिवापूर तालुक्यातील नांद येथे डायरियाची लागण झाली असून, १५ रुग्ण आढळून आले आहेत.

नांद : भिवापूर तालुक्यातील नांद येथे डायरियाची लागण झाली असून, १५ रुग्ण आढळून आले आहेत. या सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याने त्यांना सुटी देण्यात आल्याची माहिती नांद प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. बी. राजपूत यांनी सांगितले. हा सर्व प्रकार दूषित पाण्यामुळे घडला असून, याला डॉ. राजपूत यांनी दुजोरा दिला आहे.

नांद या गावाची लोकसंख्या १0 हजाराच्या आसपास आहे. या संपूर्ण गावाला नळ योजनेमार्फत पाणीपुरवठा केला जातो. यासाठी चार बोअरवेल्सचा वापर केला जातो. यातील दोन बोअरवेल्सला स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात असलेल्या ट्रान्सफॉर्मरवरून वीजपुरवठा केला जातो. सदर ट्रान्सफॉर्मर काही दिवसांपूर्वी जळाले. ते वेळीच बदलविण्यात न आल्याने यातील दोन बोअरवेल्सवरून गावाला होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे. कारण, या ट्रान्सफॉर्मरवरून या दोन्ही बोअरवेल्सला वीजपुरवठा केला जातो. बंद असलेल्या दोन्ही बोअरवेल्स या महादेवघाट व सकसार येथे आहेत. परिणामी, संपूर्ण गावाला उर्वरित दोन बोअरवेल्सवरून पाणीपुरवठा केला जातो.

सदर गाव नांद व धरमपेठ अशा दोन भागात विभागले आहे. या संपूर्ण गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याच्या दोन टाक्याही बांधण्यात आल्या आहेत. यातील पाच लाख लिटर क्षमतेच्या टाकीतून नांद व ५0 हजार लिटर क्षमतेच्या टाकीतून धरमपेठ या वस्तीला पाणीपुरवठा केला जातो. गावात एकूण आठ सार्वजनिक विहिरी असून, त्यातील पाण्याचा कधीच वापर केला जात नसल्याने या सर्व विहिरींमधील पाणी पिण्यास अयोग्य आहे.

गावाला पाणीपुरवठा होत असलेल्या दोन बोअरवेल्सपैकी एका बोअरवेल्सचे पाणी पिवळसर आहे. शिवाय, आठवडाभरापासून पिण्याच्या पाण्यात स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने ब्लिचिंग पावडरही टाकले नाही. ग्रामपंचायत कार्यालयाला प्रत्यक्ष भेट दिली असता, कार्यालयात ब्लिचिंग पावडरचा साठा असल्याचे आढळून आले. या संदर्भात स्थानिक सरपंच कविता भैसारे यांनी सांगितले की, ग्रामपंचायतमध्ये तीन चपराशी कार्यरत आहे. यातील मुख्य चपराशावर पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. हा चपराशी चार दिवसांपासून लग्नानिमित्त सुटीवर गेला आहे. उर्वरित दोन चपराशांनी हलगर्जीपणा केल्याने पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकण्यात आले नाही, असेही कविता भैसारे यांनी सांगितले. मात्र, यात दोषी असणार्‍यांवर काय कारवाई केली जाईल, हे त्यांनी स्पष्ट केले नाही.

या दोन्ही बोअरवेल्समधून पुरेसे पाणी मिळत नसल्याने स्थानिक महिलांना गावापासून अर्धा कि.मी. अंतरावर असलेल्या राजहंसबाबा मठातील विहिरीवरून रोज पाणी आणावे लागते. गावात बहुतांश नागरिकांकडे घरगुती नळ कनेक्शन असून, त्यांनी पाण्यासाठी खड्डे खोदले आहे. यातील काही खड्डे नालीलगत असून, त्यात पाणी साठून राहते. पाणीपुरवठा बंद झाल्यानंतर याच खड्डय़ातील पाणी नळाच्या पाईपमध्ये शिरते. यात नालीतील सांडपाणीही मिसळलेले असते. (वार्ताहर)