शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

डीजींनी टोचले अधिकाऱ्यांचे कान

By admin | Updated: July 3, 2014 00:47 IST

फालतू कामात लक्ष घालू नका. गुन्हेगारांवर जरब बसवा, असे खडे बोल सुनावत पोलीस महासंचालक संजीव दयाल यांनी आज अनेक पोलीस अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. नागपुरातील गुन्हेगारी

फालतू कामात लक्ष घालू नका : गुन्हेगारांवर जरब बसवा नागपूर : फालतू कामात लक्ष घालू नका. गुन्हेगारांवर जरब बसवा, असे खडे बोल सुनावत पोलीस महासंचालक संजीव दयाल यांनी आज अनेक पोलीस अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. नागपुरातील गुन्हेगारी उफाळल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक दयाल यांनी आज जिमखान्यात पोलीस अधिकाऱ्यांची प्रदीर्घ बैठक घेतली. बैठकीला पोलीस आयुक्त के. के. पाठक, सहआयुक्त संजय सक्सेना, अतिरिक्त आयुक्त दीपक पांडे यांच्यासह सर्व झोनचे उपायुक्त, सहायक आयुक्त, आणि ठाणेदार हजर होते. सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत चाललेल्या या प्रदीर्घ बैठकीत त्यांनी नागपुरात उसळी मारलेल्या गुन्हेगारीचा सविस्तर आढावा घेतला. अवघ्या २४ तासात ६ खून झाले. त्यातील खुनाच्या तीन घटना टोळीयुद्धातून घडल्या. टोळीयुद्धाचा भडका उडाल्याने सर्वत्र दहशत निर्माण झाली आहे. याशिवाय, बलात्कार, घरफोडी, जबरी चोऱ्या, लुटमार, प्राणघातक हल्ले, खंडणी वसुली, अपहरण असे गंभीर गुन्हे सारखे सुरूच आहेत. त्यामुळे नागपूरकर जनता अस्वस्थ आहे. लोकमतने नागपुरातील उफाळलेल्या गुन्हेगारीचे वृत्त २४ जूनच्या अंकात सविस्तर आणि ठळकपणे प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल गृहमंत्रालय आणि पोलीस महासंचालनालयानेही गंभीरपणे घेतली. लोकमतच्या वृत्ताची चर्चा आठवडाभरापासून गृहमंत्रालय आणि पोलीस महासंचालनालयात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, चार दिवसांपूर्वी पोलीस महासंचालकांचा नागपूर दौरा ठरला. येथे ते अधिकाऱ्यांची ‘खबरबात‘ घेणार हे अपेक्षित होते. तसेच झाले. शहरात फोफावलेली गुन्हेगारी, त्याची कारणे, गंभीर गुन्ह्यांचा रखडलेला तपास, मोकाट गुंड, गुंडांच्या टोळ्या, त्यांच्या हालचाली, कार्यपद्धती अन् त्या- त्या भागाच्या पोलीस ठाण्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची भूमिका याबाबतचा पोलीस महासंचालक दयाल यांनी आजच्या बैठीकीत सविस्तर आढावा घेतला. खून, हाणामाऱ्या, खंडणी वसुली, चेनस्नॅचिंग, घरफोड्या, टोळीयुद्ध, मोकाट गुंड तसेच भूमाफियांचे विषय चर्चेला घेत दयाल यांनी अनेक ठाणेदारांना धारेवर धरले. हॉटेल, पानटपऱ्या बंद केल्याने गुन्हेगारी नियंत्रणात येणार नाही. फालतू कामात लक्ष घालण्याऐवजी गुन्हेगारांवर वचक निर्माण करा, असे सुनावतानाच महिन्याभरात हे सर्व झाले पाहिजे, असा अल्टिमेटमही महासंचालकांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचे समजते. नंदनवन, लकडगंज, गिट्टीखदान, अंबाझरी, प्रतापनगर आणि सीताबर्डीतील अधिकाऱ्यांसोबत पोलीस महासंचालकांनी ‘खास चर्चा‘ केली. गिट्टीखदानच्या ठाणेदारांनी चांगले ‘प्रेझेंटेशन‘ दिले. पहिल्या सत्रातील बैठक खरडपट्टीचीच होती.दुसऱ्या सत्राच्या बैठकीत पोलीस उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त, सहआयुक्त आणि पोलीस आयुक्तांना डीजींनी संबोधित केले. गुन्हेगारी नियंत्रणासाठी काय उपाययोजना करणार आहात, हे जाणून घेतानाच स्थानिक पोलिसांना मुख्यत्वे कोणत्या अडचणी येत आहे, त्यासुद्धा त्यांनी जाणून घेतल्या. (प्रतिनिधी)