शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

डीजींनी टोचले अधिकाऱ्यांचे कान

By admin | Updated: July 3, 2014 00:47 IST

फालतू कामात लक्ष घालू नका. गुन्हेगारांवर जरब बसवा, असे खडे बोल सुनावत पोलीस महासंचालक संजीव दयाल यांनी आज अनेक पोलीस अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. नागपुरातील गुन्हेगारी

फालतू कामात लक्ष घालू नका : गुन्हेगारांवर जरब बसवा नागपूर : फालतू कामात लक्ष घालू नका. गुन्हेगारांवर जरब बसवा, असे खडे बोल सुनावत पोलीस महासंचालक संजीव दयाल यांनी आज अनेक पोलीस अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. नागपुरातील गुन्हेगारी उफाळल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक दयाल यांनी आज जिमखान्यात पोलीस अधिकाऱ्यांची प्रदीर्घ बैठक घेतली. बैठकीला पोलीस आयुक्त के. के. पाठक, सहआयुक्त संजय सक्सेना, अतिरिक्त आयुक्त दीपक पांडे यांच्यासह सर्व झोनचे उपायुक्त, सहायक आयुक्त, आणि ठाणेदार हजर होते. सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत चाललेल्या या प्रदीर्घ बैठकीत त्यांनी नागपुरात उसळी मारलेल्या गुन्हेगारीचा सविस्तर आढावा घेतला. अवघ्या २४ तासात ६ खून झाले. त्यातील खुनाच्या तीन घटना टोळीयुद्धातून घडल्या. टोळीयुद्धाचा भडका उडाल्याने सर्वत्र दहशत निर्माण झाली आहे. याशिवाय, बलात्कार, घरफोडी, जबरी चोऱ्या, लुटमार, प्राणघातक हल्ले, खंडणी वसुली, अपहरण असे गंभीर गुन्हे सारखे सुरूच आहेत. त्यामुळे नागपूरकर जनता अस्वस्थ आहे. लोकमतने नागपुरातील उफाळलेल्या गुन्हेगारीचे वृत्त २४ जूनच्या अंकात सविस्तर आणि ठळकपणे प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल गृहमंत्रालय आणि पोलीस महासंचालनालयानेही गंभीरपणे घेतली. लोकमतच्या वृत्ताची चर्चा आठवडाभरापासून गृहमंत्रालय आणि पोलीस महासंचालनालयात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, चार दिवसांपूर्वी पोलीस महासंचालकांचा नागपूर दौरा ठरला. येथे ते अधिकाऱ्यांची ‘खबरबात‘ घेणार हे अपेक्षित होते. तसेच झाले. शहरात फोफावलेली गुन्हेगारी, त्याची कारणे, गंभीर गुन्ह्यांचा रखडलेला तपास, मोकाट गुंड, गुंडांच्या टोळ्या, त्यांच्या हालचाली, कार्यपद्धती अन् त्या- त्या भागाच्या पोलीस ठाण्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची भूमिका याबाबतचा पोलीस महासंचालक दयाल यांनी आजच्या बैठीकीत सविस्तर आढावा घेतला. खून, हाणामाऱ्या, खंडणी वसुली, चेनस्नॅचिंग, घरफोड्या, टोळीयुद्ध, मोकाट गुंड तसेच भूमाफियांचे विषय चर्चेला घेत दयाल यांनी अनेक ठाणेदारांना धारेवर धरले. हॉटेल, पानटपऱ्या बंद केल्याने गुन्हेगारी नियंत्रणात येणार नाही. फालतू कामात लक्ष घालण्याऐवजी गुन्हेगारांवर वचक निर्माण करा, असे सुनावतानाच महिन्याभरात हे सर्व झाले पाहिजे, असा अल्टिमेटमही महासंचालकांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचे समजते. नंदनवन, लकडगंज, गिट्टीखदान, अंबाझरी, प्रतापनगर आणि सीताबर्डीतील अधिकाऱ्यांसोबत पोलीस महासंचालकांनी ‘खास चर्चा‘ केली. गिट्टीखदानच्या ठाणेदारांनी चांगले ‘प्रेझेंटेशन‘ दिले. पहिल्या सत्रातील बैठक खरडपट्टीचीच होती.दुसऱ्या सत्राच्या बैठकीत पोलीस उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त, सहआयुक्त आणि पोलीस आयुक्तांना डीजींनी संबोधित केले. गुन्हेगारी नियंत्रणासाठी काय उपाययोजना करणार आहात, हे जाणून घेतानाच स्थानिक पोलिसांना मुख्यत्वे कोणत्या अडचणी येत आहे, त्यासुद्धा त्यांनी जाणून घेतल्या. (प्रतिनिधी)