शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
4
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
5
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
6
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
7
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
8
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
9
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
10
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
11
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
12
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
13
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
14
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
15
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
16
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
17
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
18
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
20
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या

पाच वर्षांत ५० हजार युवकांना रोजगार देणार : देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 21:55 IST

मिहान आणि बुटीबोरी एमआयडीसीमध्ये पुढील पाच वर्षांत ५० हजार युवकांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे. त्यात स्थानिक आणि विदर्भातील युवकांना प्राधान्य देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

ठळक मुद्देबिस्किट कारखान्याचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मिहान आणि बुटीबोरी एमआयडीसीमध्ये पुढील पाच वर्षांत ५० हजार युवकांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे. त्यात स्थानिक आणि विदर्भातील युवकांना प्राधान्य देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.देशात बिस्किट आणि बेकरी उत्पादनात आघाडीच्या साज फूड प्रा.लि.च्या बिस्किट आणि बेकरी उत्पादने ब्रिस्क फार्मच्या देशातील बुटीबोरी येथील पाचव्या आणि पश्चिम भारतातील पहिल्या कारखान्याचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी झाले. याप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. समीर मेघे, आयुक्त अनुपकुमार आणि बुटीबोरीच्या सरपंच अनिता ठाकरे उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले, भारतात बिस्किटांची जास्त मागणी आहे. येथील लोक बिस्किट खाणे आणि खाऊ घालणे पसंत करतात. पूर्व भारताप्रमाणेच पश्चिम आणि मध्य भारतात कंपनीचा विकास व विस्तार होईल, अशी अपेक्षा आहे. कंपनी विस्तार करण्यास इच्छुक असेल तर सरकार सर्वतोपरी मदत करेल. स्थानिक एक हजार युवकांना रोजगार देण्यासाठी त्यांनी कंपनीचे आभार मानले.छत्तीसगडपेक्षा एमआयडीसीत वीज स्वस्तमुख्यमंत्री म्हणाले, छत्तीसगडच्या तुलनेत एमआयडीसीमध्ये व्यावसायिक विजेचे दर कमी आहेत. त्याचा कंपनीला फायदा होईल. कंपनी लवकरच विस्तार करेल, अशी अपेक्षा आहे.कंपनीचे चेअरमन के.डी.पॉल यांनी कंपनीच्या विस्तार योजनांची माहिती दिली. स्वागतपर भाषण कंपनीचे महाव्यवस्थापक मयंक चक्रवर्ती यांनी केले. यावेळी कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnagpurनागपूर