शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

देशमुख, केदारांचा गड भेदण्यासाठी देवेंद्र फडणवीस मोहिमेवर

By कमलेश वानखेडे | Updated: May 20, 2023 08:10 IST

Nagpur News माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल मतदारसंघाच्या तर माजी मंत्री सुनील केदार यांच्या सावनेर मतदारसंघाच्या मोहिमेवर फडणवीस स्वत: निघाले आहेत.

 

कमलेश वानखेडे

नागपूर : राज्यात भाजपच्या जागा वाढवायच्या असतील तर आधी काँग्रेस - राष्ट्रवादीच्या गडांना सुरुंग लावावा लागेल, याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगलाच अभ्यास आहे. कदाचित म्हणूनच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल मतदारसंघाच्या तर माजी मंत्री सुनील केदार यांच्या सावनेर मतदारसंघाच्या मोहिमेवर फडणवीस स्वत: निघाले आहेत. फडणवीस यांनी शुक्रवारी दोन्ही मतदारसंघात शासकीय आढावा बैठका घेतल्या. एवढेच नव्हे तर दोन्ही ठिकाणी कार्यकर्ता मेळावे घेत स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये परिवर्तनासाठी उर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

सन २०१४ च्या निवडणुकीत नागपूर शहर व जिल्ह्यात तब्बल १२पैकी ११ जागा भाजपने जिंकल्या होत्या. फक्त सावनेरची ही एकमेव जागा काँग्रेसकडे राखण्यात सुनील केदार यांना यश आले होते. २०१९च्या निवडणुकीत भाजपच्या जागा घटल्या. ग्रामीणमध्ये सावनेर, काटोल व उमरेड, तर शहरात उत्तर नागपूर व पश्चिम नागपूर अशा पाच जागा जिंकण्यात काँग्रेस - राष्ट्रवादीला यश आले. आता २०२४ मध्ये भाजपला स्वबळावर सत्तेत यायचे असेल, तर काँग्रेस - राष्ट्रवादीचे बालेकिल्ले उद्ध्वस्त केल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे २०१४ची पुनरावृत्ती करण्यासाठी पालकमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे नागपूर जिल्ह्याच्या मोहिमेवर निघाले आहेत.

काटोल मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे अनिल देशमुख यांना मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांमुळे तुरुंगात जावे लागले. तुरुंगातून बाहेर पडताच देशमुख यांनी आता आपण ताकदीने राज्यभर फिरणार असे सांगत फडणवीस यांच्यावर नेम साधला होता, तर सावनेरचे प्रतिनिधित्व करणारे सुनील केदार हेदेखील फडणवीस यांच्यावर नेम साधण्याची एकही संधी सोडत नाही. गेल्या निवडणुकीत फडणवीस यांनी सावनेर मतदारसंघात जाऊन भाजपसाठी सभा घेतली होती. पण, केदारांनी त्या सभेचे योग्यरीत्या भांडवल केले. देशमुख - केदार यांचे प्रस्थ मोडीत काढल्याशिवाय जिल्ह्यात भाजपची पकड मजबूत होऊ शकत नाही, हे फडणवीस यांना चांगलेच ठावूक आहे. त्यामुळेच फडणवीस यांनी या दोन मतदारसंघांवर विशेष फोकस केला आहे.

काटोल, सावनेरमध्ये भाजपचा चेहरा ठरेना

- काटोल व सावनेर या दोन मतदारसंघात टक्कर देणारा भाजपचा उमेदवार कोण असेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. नेतृत्व व दिशा नसल्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्ते विखुरलेले आहेत. देशमुख - केदारांशी कोण पंगा घेणार, आपल्याला थोडीच विधानसभा लढायची आहे, अशा मानसिकतेत काही कार्यकर्ते आहेत. असेच सुरू राहिले, तर हे दोन्ही मतदारसंघ काबीज करणे भाजपसाठी कठीण आहे. त्यामुळेच या दोन्ही मतदारसंघात पक्ष व नेते ताकदीने सोबत आहेत, या लढ्याचे पालकत्व आपण स्वीकारू, असा संदेश देण्यासाठी पालकमंत्री फडणवीस या मतदारसंघामध्ये दाखल झाले आहेत.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस