शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

कोणी कितीही प्रयत्न केले, तरी माझे नाव मिटवता येणार नाही... फडणवीसांचा ठाकरे सरकारला टोमणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2022 14:21 IST

ही संकल्पना २० वर्षांपासून माझ्या डोक्यात होती, मात्र या गोष्टीचा आनंद आहे की जे लोक या रस्त्याचा विरोध करत होते ते आता या महामार्गाचे उद्घाटन करत आहेत, असाही टोमणा फडणवीसांनी ठाकरे सरकारला मारला.

ठळक मुद्दे समृद्धी महामार्गावरून श्रेयवादाचे राजकारण

नागपूर : समृद्धी महामार्ग सुरू झाला पाहिजे, त्यासाठी मला आनंद आहे. पण, त्याची कामं अद्याप पूर्ण झालेली नाहीत. घाईघाईने उदघाटन केलं तर रस्ता सुरू होऊ शकतो, पण त्या रस्त्याला महत्व आहे. त्यामुळं कामं पूर्ण करावी नंतर उद्घाटन करावं, मात्र कधीही उद्घाटन झालं तरी त्याच स्वागतच करू, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून मे महिन्यात त्याचे उद्घाटन करण्याचे प्रस्तावित आहे. विदर्भाच्या विकासाच्या दृष्टीने समृद्धी महामार्गाचे महत्व वाढले आहे. तर, दुसरीकडे या रस्त्याच्या श्रेयाचा वाद निर्माण झाला आहे. यावर व्यक्त होताना फडणवीस यांनी ठाकरे सरकारला टोला हाणला. कोणी कितीही प्रयत्न केला तरी माझं नाव समृद्धी महामार्गवरून कोणी मिटवू शकत नाही, हे माझं श्रेय नाही, जनतेने मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली, त्यामुळं हे काम करू शकलो, असे फडणवीस म्हणाले.

ही संकल्पना २० वर्षांपासून माझ्या डोक्यात होती, मात्र या गोष्टीचा आनंद आहे की जे लोक या रस्त्याचा विरोध करत होते ते आता या महामार्गाचे उद्घाटन करत आहेत, असाही टोमणा फडणवीसांनी मारला.

दरम्यान, नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाचे काम प्रगती पथावर आहे. साधारणपणे मे महिन्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याच्या हालचाली सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्धा जिल्ह्यातील आर्वी टोल प्लाझा येथे समृद्धी महामार्ग तसेच पुलगावजवळ वन्यप्राण्यांच्या आवागमनासाठी बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाची पाहणी केली होती. तर, आता या महामार्गाच्या श्रेयावरून वाद निर्माण होऊ लागले असून फडणवीसांनी याच पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्गDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे