शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

कोणी कितीही प्रयत्न केले, तरी माझे नाव मिटवता येणार नाही... फडणवीसांचा ठाकरे सरकारला टोमणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2022 14:21 IST

ही संकल्पना २० वर्षांपासून माझ्या डोक्यात होती, मात्र या गोष्टीचा आनंद आहे की जे लोक या रस्त्याचा विरोध करत होते ते आता या महामार्गाचे उद्घाटन करत आहेत, असाही टोमणा फडणवीसांनी ठाकरे सरकारला मारला.

ठळक मुद्दे समृद्धी महामार्गावरून श्रेयवादाचे राजकारण

नागपूर : समृद्धी महामार्ग सुरू झाला पाहिजे, त्यासाठी मला आनंद आहे. पण, त्याची कामं अद्याप पूर्ण झालेली नाहीत. घाईघाईने उदघाटन केलं तर रस्ता सुरू होऊ शकतो, पण त्या रस्त्याला महत्व आहे. त्यामुळं कामं पूर्ण करावी नंतर उद्घाटन करावं, मात्र कधीही उद्घाटन झालं तरी त्याच स्वागतच करू, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून मे महिन्यात त्याचे उद्घाटन करण्याचे प्रस्तावित आहे. विदर्भाच्या विकासाच्या दृष्टीने समृद्धी महामार्गाचे महत्व वाढले आहे. तर, दुसरीकडे या रस्त्याच्या श्रेयाचा वाद निर्माण झाला आहे. यावर व्यक्त होताना फडणवीस यांनी ठाकरे सरकारला टोला हाणला. कोणी कितीही प्रयत्न केला तरी माझं नाव समृद्धी महामार्गवरून कोणी मिटवू शकत नाही, हे माझं श्रेय नाही, जनतेने मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली, त्यामुळं हे काम करू शकलो, असे फडणवीस म्हणाले.

ही संकल्पना २० वर्षांपासून माझ्या डोक्यात होती, मात्र या गोष्टीचा आनंद आहे की जे लोक या रस्त्याचा विरोध करत होते ते आता या महामार्गाचे उद्घाटन करत आहेत, असाही टोमणा फडणवीसांनी मारला.

दरम्यान, नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाचे काम प्रगती पथावर आहे. साधारणपणे मे महिन्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याच्या हालचाली सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्धा जिल्ह्यातील आर्वी टोल प्लाझा येथे समृद्धी महामार्ग तसेच पुलगावजवळ वन्यप्राण्यांच्या आवागमनासाठी बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाची पाहणी केली होती. तर, आता या महामार्गाच्या श्रेयावरून वाद निर्माण होऊ लागले असून फडणवीसांनी याच पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्गDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे