शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

लांगूल चालनाची नीती काँग्रेसनं भारतात आणली, देवेंद्र फडणवीसांचा घाणाघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2022 16:42 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाला एक दिशा मिळत आहे, त्यामुळे मोदींच्या प्रति खूप मोठ्या प्रमाणात लोकं आकृष्ट होत असून त्यामुळे त्यांची ही मळमळ बाहेर येत असल्याचे फडणवीस म्हणाले.

नागपूर : भारतात पूर्ण शांतता आहे. गेली अनेक वर्ष जी लांगूल चालनीची नीती काँग्रेस पक्षाने भारतात आणली त्यामुळे समाजात दुफळी निर्माण झाली, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

पुढे बोलताना, ही दुफळी दूर करून आपण सगळे एका भारतमातेचे पूत्र आहोत अशाप्रकारची भावना देशात तयार करण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली. तसेच, देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी नेतृत्व देत आहेत. त्यामुळे मोदींच्या प्रति खूप मोठ्या प्रमाणात लोकं आकृष्ट होत असून त्यांची ही मळमळ बाहेर येत आहे, असे म्हणत फडणवीसांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.

...तर ओबीसी आरक्षण गेलं नसतं

कोर्टाने दाखल केलेल्या आरोपपत्रांमध्ये नवाब मलिक यांचा 'डी गँग'शी संबंध असल्याचे म्हटले आहे, या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, ही अतिशय गंभीर बाब आहे. पण या सरकारचं बघा, इम्पेरिकल डेटा तयार करण्याकरता कुठलीच धडपड करत नाही. ओबीसी आरक्षणासाठी कुठलीच धडपड करत नाही. मात्र, त्याचवेळी जेलमध्ये असलेले आणि डी गँगशी संबंध असलेले नवाब मलिक हे मंत्रीमंडळात राहायला पाहिजे याकरता या सरकारची धडपड आपण पाहतोय. यापेक्षा अर्धी धडपड जर ओबीसी आरक्षणाचा इम्पेरिकल डेटा जमा करण्याकरता या सरकारने केली असती तर ओबीसी आरक्षण गेलं नसतं, अशी टीका त्यांनी केली.

डी गँगशी नवाब मलिकांचे असलेले संबंध या आरोपपत्राच्या माध्यमातून समोर येत आहेत. मात्र त्यानंतरही सरकार त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात आहे. अजूनही ते मंत्रीमंडळात असून मुख्यमंत्र्यांना 'डी गँग'शी संबंधित मंत्र्यांबरोबर काम करायचे असल्याचे दिसून येत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. 

टॅग्स :PoliticsराजकारणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाcongressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीnawab malikनवाब मलिकOBC Reservationओबीसी आरक्षण