शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

लांगूल चालनाची नीती काँग्रेसनं भारतात आणली, देवेंद्र फडणवीसांचा घाणाघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2022 16:42 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाला एक दिशा मिळत आहे, त्यामुळे मोदींच्या प्रति खूप मोठ्या प्रमाणात लोकं आकृष्ट होत असून त्यामुळे त्यांची ही मळमळ बाहेर येत असल्याचे फडणवीस म्हणाले.

नागपूर : भारतात पूर्ण शांतता आहे. गेली अनेक वर्ष जी लांगूल चालनीची नीती काँग्रेस पक्षाने भारतात आणली त्यामुळे समाजात दुफळी निर्माण झाली, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

पुढे बोलताना, ही दुफळी दूर करून आपण सगळे एका भारतमातेचे पूत्र आहोत अशाप्रकारची भावना देशात तयार करण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली. तसेच, देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी नेतृत्व देत आहेत. त्यामुळे मोदींच्या प्रति खूप मोठ्या प्रमाणात लोकं आकृष्ट होत असून त्यांची ही मळमळ बाहेर येत आहे, असे म्हणत फडणवीसांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.

...तर ओबीसी आरक्षण गेलं नसतं

कोर्टाने दाखल केलेल्या आरोपपत्रांमध्ये नवाब मलिक यांचा 'डी गँग'शी संबंध असल्याचे म्हटले आहे, या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, ही अतिशय गंभीर बाब आहे. पण या सरकारचं बघा, इम्पेरिकल डेटा तयार करण्याकरता कुठलीच धडपड करत नाही. ओबीसी आरक्षणासाठी कुठलीच धडपड करत नाही. मात्र, त्याचवेळी जेलमध्ये असलेले आणि डी गँगशी संबंध असलेले नवाब मलिक हे मंत्रीमंडळात राहायला पाहिजे याकरता या सरकारची धडपड आपण पाहतोय. यापेक्षा अर्धी धडपड जर ओबीसी आरक्षणाचा इम्पेरिकल डेटा जमा करण्याकरता या सरकारने केली असती तर ओबीसी आरक्षण गेलं नसतं, अशी टीका त्यांनी केली.

डी गँगशी नवाब मलिकांचे असलेले संबंध या आरोपपत्राच्या माध्यमातून समोर येत आहेत. मात्र त्यानंतरही सरकार त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात आहे. अजूनही ते मंत्रीमंडळात असून मुख्यमंत्र्यांना 'डी गँग'शी संबंधित मंत्र्यांबरोबर काम करायचे असल्याचे दिसून येत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. 

टॅग्स :PoliticsराजकारणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाcongressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीnawab malikनवाब मलिकOBC Reservationओबीसी आरक्षण