शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
4
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
6
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
7
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
8
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
9
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
10
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
11
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
12
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
13
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
14
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
15
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
16
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
17
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
18
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
19
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात
20
वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी

न्यायालयांतील विकासकामांची सुरुवात घरापासून

By admin | Updated: March 23, 2015 02:35 IST

पक्षकारांना वेळेवर व कमी खर्चात न्याय मिळण्यासाठी येणाऱ्या काळात राज्यातील सर्व न्यायालयांमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. ...

नागपूर : पक्षकारांना वेळेवर व कमी खर्चात न्याय मिळण्यासाठी येणाऱ्या काळात राज्यातील सर्व न्यायालयांमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. याची सुरुवात घरापासून म्हणजेच नागपुरातून करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.नागपूर जिल्हा वकील संघटनेच्या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ रविवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात पार पडला. त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई अध्यक्षस्थानी तर, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी, प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवने व बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोवाचे अध्यक्ष अ‍ॅड. आसिफ कुरैशी सन्माननीय अतिथी होते. याशिवाय व्यासपीठावर नवनिर्वाचित अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश जयस्वाल, सचिव अ‍ॅड. नितीन तेलगोटे व मावळते सचिव अ‍ॅड. मनोज साबळे उपस्थित होते. पार्किंग व वकिलांच्या बसण्याची समस्या सोडविण्यासाठी जिल्हा न्यायालयात नवीन ‘एल’ आकाराची इमारत बांधण्याचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. याकरिता ७० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा निधी व इमारतीच्या प्रस्तावाला लवकरच मान्यता देण्यात येईल, असे फडणवीस यांनी सांगितले. याशिवाय जिल्हा न्यायालयाच्या पश्चिमेकडील नाल्यावर बहुमजली पार्किंग इमारत बांधणे, सुयोग इमारत पूर्णपणे जिल्हा न्यायालयाला देणे, सुयोग इमारतीपुढील मोकळ्या परिसरात पुन्हा नवीन विकासकामे करणे इत्यादी मागण्या पूर्ण करण्यासाठी २ ते ३ वर्षांचा वेळ देण्याची विनंती त्यांनी केली. फडणवीस यांच्यामुळे जिल्हा वकील संघटनेच्या मुकुटात मानाचा तुरा रोवला गेल्याचे मत न्या. गवई यांनी व्यक्त केले. न्यायाधीश, वकील व पक्षकारांमधील दरी वाढत आहे. ही दरी कमी करण्यासाठी संघटनेने कार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच, न्यायाधीशांनी वकिलांवर आगपाखड केली नाही व वकील न्यायाधीशांसोबत सन्मानपूर्वक वागल्यास न्यायालयात चांगले वातावरण राहील असेही त्यांनी सांगितले. न्या. धर्माधिकारी यांनी शासनाकडून जे काही मिळेल त्याचा उपयोग संघटनेने सर्वांसाठी करावा, असे आवाहन केले तर, न्या. सोनवने यांनी न्यायाधीशांनाही आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे सांगितले. अन्य मान्यवरांनीही समयोचित विचार व्यक्त केले. अ‍ॅड. राधिका बजाज व अ‍ॅड. उदय डबले यांनी संचालन केले.(प्रतिनिधी)