शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पाणस्थळावरील वन्यप्राण्यांची प्रगणना निसर्गानुभव म्हणून आयोजित होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 13:49 IST

दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला जंगलातील पाणस्थळावर वन्यप्राण्यांची प्रगणना केली जाते. पारंपरिक पद्धतीने करण्यात येत असलेल्या या पाणस्थळावरील वन्यप्राण्यांच्या प्रगणनेबाबत अनेक भ्रम आहेत. त्यामुळे यंदाही ही प्रगणना ७ व ८ मे रोजी ‘निसर्गानुभव’ म्हणून केली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला जंगलातील पाणस्थळावर वन्यप्राण्यांची प्रगणना केली जाते. पारंपरिक पद्धतीने करण्यात येत असलेल्या या पाणस्थळावरील वन्यप्राण्यांच्या प्रगणनेबाबत अनेक भ्रम आहेत. त्यामुळे यंदाही ही प्रगणना ७ व ८ मे रोजी ‘निसर्गानुभव’ म्हणून केली जाणार आहे.यासंदर्भात वन विभागाने हा निर्णय घेताना दरवर्षीच्या पद्धतीच्या अंमलबजावणीचे स्वरूप लक्षात घेता शास्त्रीयदृष्ट्या ही तितकीशी उपयोगी नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे शास्त्रीयदृष्ट्या पाणस्थळावरील प्रगणना करण्याचा आग्रह वैज्ञानिक संस्थेकडून करण्यात येत नाही.पाणस्थळावरील प्रगणना करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पूर्वतयारी करावी लागते. मात्र यात वनविभाग व बाहेरील वन्यजीव अभ्यासक तसेच वन्यजीव अभ्यासक संस्थांचा सहभाग लक्षात घेता, ही पारंपरिक पद्धत सुरू ठेवण्याचा आग्रह होत आहे. वन्यजीवांच्या सामूहिक अभ्यासाच्या दृष्टीने ही पद्धत उपयोगाची असल्याने ही सुरू ठेवण्यासंदर्भात या घटकांचा आग्रह आहे. त्यामुळे यावर्षीदेखील बुद्ध पौर्णिमेला ७ व ८ मे रोजी पाणस्थळावरील वन्यप्राण्यांची प्रगणना होणार आहे. मात्र वन्यप्राण्यांचा अंदाज हा निसर्ग अनुभव म्हणून आयोजित करण्याचे वनविभागाने यावेळी निश्चित केले आहे.केंद्रीय पर्यावरण व वन विभागाने घालून दिलेल्या पद्धतीनुसार आॅक्टोबर २०१९ ते मे २०२० या काळात कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात तसेच व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्राबाहेर वाघांची किमान संख्या निश्चित करण्याची प्रक्रिया राबविली जात आहे. वाघांच्या संख्येचा अंदाज घेण्यासाठी राष्ट्रीयस्तरावर निश्चित केलेल्या पद्धतीचा वापर देशभर सुरू आहे. दर चार वर्षांनी होणाऱ्या या अखिल भारतीय व्याघ्र प्रगणनेमध्ये वाघासोबतच त्यांच्या भक्ष्यांचा अंदाजसुद्धा घेतला जातो.दरम्यान, विभागीय वनाधिकारी (वन्यजीव) तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एस. बी. भलावी यांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, यंदा होणारी पाणस्थळावरील प्रगणना सर्व ठिकाणी बंधनकारक राहणार नाही. मात्र संबंधित क्षेत्राच्या व्यवस्थापन आराखड्यात प्रगणना करण्याचे निश्चित केले असल्यास ती करावी, असे म्हटले आहे. अर्थात पाणस्थळावरील वन्यप्राण्यांची प्रगणना हा पूर्णत: निसर्गानुभव राहणार आहे. यामध्ये वन्यजीव अभ्यासक तसेच वन विभागातील अधिकाऱ्यांनादेखील सहभागी होण्याची संधी आहे. यासाठी संबंधित वन विभागाच्या कार्यालयाकडे २५ एप्रिलपर्यंत अर्ज करण्याची संधी आहे.

 

टॅग्स :wildlifeवन्यजीव