शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

आठ वर्षांत अदाणी-अंबानींचाच विकास; भाजपने देश विकायला काढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2023 17:06 IST

Nagpur News भाजपने तर देश विकायला काढला आहे. देशात मागील आठ वर्षांत केवळ पंतप्रधान मोदी यांचे मित्र अदाणी-अंबानी यांचाच विकास झाल्याचा आरोप उत्तर प्रदेश विधिमंडळ काँग्रेस नेत्या आराधना मिश्रा यांनी बुधवारी येथे केला.

नागपूर : जगातील तिसरी अर्थव्यवस्था असा टेंभा मिरविणाऱ्या भाजपने या देशाची धुळधाण केली आहे. देशाच्या विकासाचा पाया माजी पंतप्रधान दिवंगत पं. जवाहरलाल नेहरूंनीच रचला आहे. भाजपने तर देश विकायला काढला आहे. देशात मागील आठ वर्षांत केवळ पंतप्रधान मोदी यांचे मित्र अदाणी-अंबानी यांचाच विकास झाल्याचा आरोप उत्तर प्रदेश विधिमंडळ काँग्रेस नेत्या आराधना मिश्रा यांनी बुधवारी येथे केला. काँग्रेसच्या 'हाथ से हाथ जोडो' अभियानासाठी त्या नागपुरात आल्या असता पत्रपरिषदेत बोलत होत्या.

२०१४ मध्ये १० टक्के श्रीमंतांकडे ६४ टक्के संपत्ती होती. आता ५० टक्के संपत्ती ५ टक्के धनधांडग्यांकडे आहे. बंदरे, विमानतळ, रेल्वे, वीज उत्पादन केंद्र, कोळसा खाणी मित्रांना खैरात म्हणून वाटल्या. बंदरांमध्ये अरबो रुपयांचे जप्त होणारे ड्रग्जचे व्यवहार कोणाचे, असा सवालही त्यांनी यावेळी केला. दरवर्षी दोन कोटींचे रोजगार कुठे आहेत. दहा लाख सरकारी नोकऱ्या रिक्त असताना नोटाबंदी व कोरोनामुळे नोकऱ्या हिसकावल्या. महागाई, रोजगार आज अत्युच्च शिखरावर आहे. यासारखे मुख्य मुद्दे भरकटविण्यासाठीच भाजप वेगवेगळे मुद्दे पुढे करते, असा आरोपही त्यांनी केला.

- कार्यकर्ते घरोघरी जातील

भारत जोडो यात्रेचा एक भाग म्हणून आज, २६ जानेवारीपासून देशभरात काँग्रेसचे 'हाथ से हाथ जोडो' अभियान सुरू होत आहे. राज्य, जिल्हा व ब्लॉक स्तरावर एकाचवेळी हे अभियान सुरू होत आहे. नकारात्मक राजकारणाला प्रेम, एकतेचे प्रत्युत्तर म्हणून भारत जोडो यात्रा होती. यात तरुण, महिला, वृद्ध व मुलेही सहभागी झाली. काँग्रेसशी संबंधित नसणारे दिल्लीतील २७ हजार नागरिक यात्रेत होते. आता कार्यकर्त्यांची वेळ आहे. घरोघरी जाऊन देशातील ज्वलंत प्रश्न, काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींनी तीन वर्षांत केलेले काम व आगामी दोन वर्षांतील प्रस्तावित कामे मांडून नागरिकांचे जिवाभावाचे प्रश्न या अभियानातून सोडविण्यावर भर दिला जाणार असल्याचे मिश्रा यांनी सांगितले.

टॅग्स :congressकाँग्रेस