शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

आठ वर्षांत अदाणी-अंबानींचाच विकास; भाजपने देश विकायला काढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2023 17:06 IST

Nagpur News भाजपने तर देश विकायला काढला आहे. देशात मागील आठ वर्षांत केवळ पंतप्रधान मोदी यांचे मित्र अदाणी-अंबानी यांचाच विकास झाल्याचा आरोप उत्तर प्रदेश विधिमंडळ काँग्रेस नेत्या आराधना मिश्रा यांनी बुधवारी येथे केला.

नागपूर : जगातील तिसरी अर्थव्यवस्था असा टेंभा मिरविणाऱ्या भाजपने या देशाची धुळधाण केली आहे. देशाच्या विकासाचा पाया माजी पंतप्रधान दिवंगत पं. जवाहरलाल नेहरूंनीच रचला आहे. भाजपने तर देश विकायला काढला आहे. देशात मागील आठ वर्षांत केवळ पंतप्रधान मोदी यांचे मित्र अदाणी-अंबानी यांचाच विकास झाल्याचा आरोप उत्तर प्रदेश विधिमंडळ काँग्रेस नेत्या आराधना मिश्रा यांनी बुधवारी येथे केला. काँग्रेसच्या 'हाथ से हाथ जोडो' अभियानासाठी त्या नागपुरात आल्या असता पत्रपरिषदेत बोलत होत्या.

२०१४ मध्ये १० टक्के श्रीमंतांकडे ६४ टक्के संपत्ती होती. आता ५० टक्के संपत्ती ५ टक्के धनधांडग्यांकडे आहे. बंदरे, विमानतळ, रेल्वे, वीज उत्पादन केंद्र, कोळसा खाणी मित्रांना खैरात म्हणून वाटल्या. बंदरांमध्ये अरबो रुपयांचे जप्त होणारे ड्रग्जचे व्यवहार कोणाचे, असा सवालही त्यांनी यावेळी केला. दरवर्षी दोन कोटींचे रोजगार कुठे आहेत. दहा लाख सरकारी नोकऱ्या रिक्त असताना नोटाबंदी व कोरोनामुळे नोकऱ्या हिसकावल्या. महागाई, रोजगार आज अत्युच्च शिखरावर आहे. यासारखे मुख्य मुद्दे भरकटविण्यासाठीच भाजप वेगवेगळे मुद्दे पुढे करते, असा आरोपही त्यांनी केला.

- कार्यकर्ते घरोघरी जातील

भारत जोडो यात्रेचा एक भाग म्हणून आज, २६ जानेवारीपासून देशभरात काँग्रेसचे 'हाथ से हाथ जोडो' अभियान सुरू होत आहे. राज्य, जिल्हा व ब्लॉक स्तरावर एकाचवेळी हे अभियान सुरू होत आहे. नकारात्मक राजकारणाला प्रेम, एकतेचे प्रत्युत्तर म्हणून भारत जोडो यात्रा होती. यात तरुण, महिला, वृद्ध व मुलेही सहभागी झाली. काँग्रेसशी संबंधित नसणारे दिल्लीतील २७ हजार नागरिक यात्रेत होते. आता कार्यकर्त्यांची वेळ आहे. घरोघरी जाऊन देशातील ज्वलंत प्रश्न, काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींनी तीन वर्षांत केलेले काम व आगामी दोन वर्षांतील प्रस्तावित कामे मांडून नागरिकांचे जिवाभावाचे प्रश्न या अभियानातून सोडविण्यावर भर दिला जाणार असल्याचे मिश्रा यांनी सांगितले.

टॅग्स :congressकाँग्रेस