शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

उपराजधानीत बाजारपेठांचा विकास व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 20:42 IST

इतवारी नागपूर मध्य भारतातील महत्त्वाची बाजारपेठ आहे. नववर्षात उपराजधानीतील सर्वच बाजारपेठांचा आधुनिक स्तरावर विकास होण्याची गरज आहे.

ठळक मुद्देइतवारी, गांधीबाग, मस्कासाथ बाजारपेठा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर राज्याची उपराजधानी असली तरी भविष्यातील ‘रायझिंग कॅपिटल’ची पुरेपूर क्षमता त्यात आहे. नागपूरचे भौगोलिक स्थान हे एक वेगळे बलस्थान विविध अंगांनी मध्य भारतातील सर्वच राज्यांसाठी ते उपयोगाचे आहे. इतवारी नागपूर मध्य भारतातील महत्त्वाची बाजारपेठ आहे. नववर्षात उपराजधानीतील सर्वच बाजारपेठांचा आधुनिक स्तरावर विकास होण्याची गरज आहे.बाजारपेठांमध्ये पार्किंगची आवश्यकताइतवारी, गांधीबाग, मस्कासाथ, सराफा या विदर्भातील सर्वात जुन्या बाजारपेठा आहेत. पूर्वीच्या लोकसंख्येच्या तुलनेत या बाजारपेठा ग्राहकांसाठी सोयीच्या होत्या. नागपूरचा विकास होतानाच त्या त्या वस्त्यांमध्ये बाजारपेठांचा विकास झाला. याशिवाय वाहनांच्या कोंडीमुळे पार्किंगचा प्रश्न निर्माण झाला. आता इतवारी व मस्कासाथ बाजारात चारचाकी तर सोडाच साधी दुचाकी सहजरीत्या रस्त्यावरून चालविणे जोखमीचे काम आहे. वाहतूक वाढली, बाजाराचा विकास झाला पण रस्ते तसेच आहेत. सरकारने नवीन जागेवर एकत्रितरीत्या सर्वच बाजारपेठांचा विकास करण्याची गरज आहे. त्यामुळे ग्राहकांनाही खरेदीसाठी सोयीची जागा उपलब्ध होईल.इतवारी किराणा बाजारपेठेसाठी शासनाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात ९ एकर जागा दिली आहे. पण शासनाने ही जागा किराणा असोसिएशनच्या ताब्यात अजूनही दिलेली नाही. इतवारीतून किराणा व्यावसायिक या ठिकाणी स्थलांतरित झाल्यास तयार होणाऱ्या एकत्रित बाजारपेठांमुळे व्यावसायिकांचा विकास होईल आणि ग्राहकांनाही सोयीचे ठरेल. याकरिता शासनाला पुढाकार घेण्याची गरज आहे.

  • इतवारी किराणा बाजारपेठ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात न्यावी.
  • शासनाने मंजूर केलेल्या जागेचा ताबा व्यावसायिकांना द्यावा.
  • इतवारी आणि मस्कासाथ रस्त्याचे रुंदीकरण व्हावे.
  • मस्कासाथ आणि इतवारी भागातील अतिक्रमण हटवावे.
  • गारमेंट हब तयार करून कापड व्यापाऱ्यांना एकत्रित आणावे.
  • प्रत्येक दुकान कॉम्प्लेक्सच्या आत व त्याचे पार्किंग व्यवस्थित असावे.
  • पुढील दहा वर्षांच्या ग्राहकसंख्येनुसार नियोजन व्हावे.

शिवप्रताप सिंह, सचिव, इतवारी किराणा असोसिएशन.

  • सराफा बाजार एकाच ठिकाणी तयार करून संघटित करावा.
  • पूर्वीच्या तुलनेत रस्ते रुंद करण्याची गरज.
  • वाहनांसाठी मनपाने पार्किंगची व्यवस्था करावी.
  • नवीन शोरुम, दुकानाचे बांधकाम नकाशानुसारच बांधावे.
  • सराफा बाजार आधुनिक स्तरावर असावा.
  • बाजारपेठा वाट्टेल तशा वाढू नयेत, त्यांच्या जागा निश्चित असाव्यात.

पुरुषोत्तम कावळे, उपाध्यक्ष, सोना-चांदी ओळ कमिटी.ग्राहक सर्वेक्षणातून हवे बाजारपेठांचे नियोजन‘जेथे रस्ता, तेथे दुकान’ ही वैदर्भीयांची मानसिकताच झाली असल्याने इतवारी, गांधीबाग, सक्करदरा, गोकुळपेठ, सीताबर्डी, धरमपेठ, जरीपटका अशा विविध भागात बाजारपेठा निर्माण झाल्या, परंतु त्या आज अनियंत्रित व अविकसित आहेत. पुढील १० ते १५ वर्षांत ग्राहकसंख्या किती व कशी वाढेल, याचा अंदाज घेऊन बाजारपेठांची जागा निश्चित व्हावी. या जागा सर्व सोईसुविधांनी सज्ज असाव्यात. स्थानिक प्रशासन अर्थात मनपाने आजवर बाजारपेठांचा विचारच न केल्याने त्या अनियंत्रित झाल्या आणि पार्किंगची समस्या निर्माण झाली. खरेदीला येणाऱ्या ग्राहकाला चिंतामुक्त राहून खरेदीचा आनंद मिळावा, यासाठी मोठ्या नियोजनाची गरज आहे. नागपूरला खऱ्या अर्थाने विकसित करायचे असल्यास शहरातील महत्त्वाच्या बाजारपेठांचे नियोजन आतापासूनच सुयोग्य पद्धतीने करावे लागेल. याची सुरुवात सन २०२० च्या सुरुवातीपासूनच व्हावी, अशी अपेक्षा आहे.

 

टॅग्स :Marketबाजारnagpurनागपूर