शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
IPS पूरन कुमार यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, हरियाणाचे DGP आणि SPविरोधात दिली तक्रार   
4
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
5
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
6
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
7
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
8
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
9
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
10
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
11
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
12
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
13
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
14
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
15
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
16
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
17
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
18
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
19
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
20
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”

७०० जिल्ह्यांत  ‘विकसित कृषी संकल्प अभियान’; शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या भेटीला

By गणेश हुड | Updated: May 18, 2025 19:33 IST

Nagpur News: "विकसित भारत घडवायचा असेल, तर शेतकऱ्यांचा विकास अत्यावश्यक आहे," असे प्रतिपादन केंद्रीय कृषी व ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी रविवारी नागपूर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात केले.

- गणेश हूड नागपूर - "विकसित भारत घडवायचा असेल, तर शेतकऱ्यांचा विकास अत्यावश्यक आहे," असे प्रतिपादन केंद्रीय कृषी व ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी रविवारी नागपूर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात केले. सुरेश भट सभागृहात ‘विकसित कृषी संकल्प अभियान’चा शुभारंभ करताना त्यांनी “एक राष्ट्र, एक कृषी, एक संघ” या संकल्पनेची घोषणा केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

शिवराज सिंह चौहान म्हणाले  या अभियानाअंतर्गत २९ मे ते १२ जून दरम्यान देशभरातील ७०० हून अधिक जिल्ह्यांमध्ये कृषी विज्ञान केंद्रे व संशोधन संस्थांचे शास्त्रज्ञ थेट शेतकऱ्यांच्या भेटीला जाणार आहेत. ते शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करतील आणि आधुनिक शेतीविषयी जागरूकता निर्माण करतील.

जेव्हा जगातील तथाकथित देशांमध्ये अजून सूर्योदयही झाला नव्हता, तेव्हा आपल्या देशात वेदांची रचना झाली होती. एक गौरवशाली, समृद्ध व शक्तिशाली भारत घडवण्याचे काम सुरू आहे. आपल्याला आपल्या सैन्यावर अभिमान आहे. कृषी ही भारतीय अर्थव्यवस्थेची कणा आहे आणि शेतकरी त्याचा आत्मा आहे. माझ्यासाठी शेतकऱ्यांची सेवा हीच ईश्वराची पूजा आहे .कृषी क्षेत्रात जे संशोधन होत आहे ते थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. यासाठी अभियान राबविले जात आहे.

भट सभागृहात 'विकसित कृषी संकल्प अभियान' अंतर्गत विविध कृषी उत्पादनांवर आधारित प्रदर्शनीचे शिवराज सिंह चौहान  आणि देवेंद्र फडणवीस यांनी उत्पादनांचे निरीक्षण केले आणि माहिती घेतली.  यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,  कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, राज्य मंत्री आशीष जायसवाल, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार आशीष देशमुख, चरणसिंग ठाकूर, आसीएआरचे महासंचाक डॉ. एम.एल. जाट ,आयसीएआरचे उप महासंचालक राजबीर सिंह, कृषी विभागाचे प्रधान सचिवपदी विकासचंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त सूरज मांढरे यांच्यासह कृ्षी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी