शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
2
"प्रभू श्रीराम सगळ्यांचे... मी दलित म्हणून मला बोलवलं नाही"; अयोध्या खासदाराचा नाराजीचा सूर
3
व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट 
4
Ahilyanagar: मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून बेदम मारहाण!
5
Apple नंतर ही कम्प्युटर बनवणारी 'ही' दिग्गज कंपनी ६००० कर्मचाऱ्यांची कपात करणार, का घेतला हा मोठा निर्णय?
6
१० वर्षांत १ कोटींचा टप्पा गाठायचा आहे? SIP द्वारे कोणत्या फंडात आणि किती गुंतवणूक करणे फायदेशीर!
7
महालक्ष्मी व्रतकथा: महालक्ष्मी व्रत कथेशिवाय पूजा अपूर्ण; पती-पत्नीने मिळून वाचल्यास मिळते अधिक फळ!
8
घटस्फोट, कौटुंबिक हिंसाचार प्रकरणानंतर सेलिना जेटलीची पहिली पोस्ट; म्हणाली, "माझी मुलं..."
9
मुंबईत थरकाप उडवणारी घटना! अंडी फेकली आणि पाच जणांनी मित्रालाच पेट्रोल टाकून पेटवलं; घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल
10
पगार ५० हजार...तर तुम्हाला किती मिळेल ग्रॅच्युइटी?; जाणून घ्या, नवीन नियम अन् सोपा फॉर्म्युला
11
मार्गशीर्षातला पहिला गुरुवार, महालक्ष्मी व्रताची तयारी झाली का? वाचा साहित्य आणि पूजाविधी
12
गरिबांसाठीच्या योजनांवर १ लाख कोटी रुपयांचा खर्च; लोककल्याणाचा उदात्त हेतू, पण सरकारी तिजोरीवर वाढता ताण
13
Stock Market: ३ दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २४५ अंकांनी वधारला; गुंतवणूकदारांमध्ये उत्साह
14
टीम इंडियाची लाजिरवाणी कामगिरी! स्टार क्रिकेटर म्हणाला, 'ही' आमच्यासाठी विन-विन सिच्युएशन ठरेल!
15
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
16
पेन्शन, टॅक्स पासून एलपीजी पर्यंत; १ डिसेंबरपासून बदलणार हे महत्त्वाचे नियम, तुमच्यावर थेट होणार परिणाम
17
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
18
देशाच्या माजी राष्ट्रपतींनाच सुनावली २७ वर्षांची शिक्षा, कुठे घडला प्रकार? काय आहे गुन्हा?
19
धर्मेंद्र यांचा 'हा' सिनेमा आता कधीच चाहत्यांच्या भेटीला येणार नाही; दिग्दर्शकाचा मोठा निर्णय
20
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
Daily Top 2Weekly Top 5

७०० जिल्ह्यांत  ‘विकसित कृषी संकल्प अभियान’; शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या भेटीला

By गणेश हुड | Updated: May 18, 2025 19:33 IST

Nagpur News: "विकसित भारत घडवायचा असेल, तर शेतकऱ्यांचा विकास अत्यावश्यक आहे," असे प्रतिपादन केंद्रीय कृषी व ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी रविवारी नागपूर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात केले.

- गणेश हूड नागपूर - "विकसित भारत घडवायचा असेल, तर शेतकऱ्यांचा विकास अत्यावश्यक आहे," असे प्रतिपादन केंद्रीय कृषी व ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी रविवारी नागपूर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात केले. सुरेश भट सभागृहात ‘विकसित कृषी संकल्प अभियान’चा शुभारंभ करताना त्यांनी “एक राष्ट्र, एक कृषी, एक संघ” या संकल्पनेची घोषणा केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

शिवराज सिंह चौहान म्हणाले  या अभियानाअंतर्गत २९ मे ते १२ जून दरम्यान देशभरातील ७०० हून अधिक जिल्ह्यांमध्ये कृषी विज्ञान केंद्रे व संशोधन संस्थांचे शास्त्रज्ञ थेट शेतकऱ्यांच्या भेटीला जाणार आहेत. ते शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करतील आणि आधुनिक शेतीविषयी जागरूकता निर्माण करतील.

जेव्हा जगातील तथाकथित देशांमध्ये अजून सूर्योदयही झाला नव्हता, तेव्हा आपल्या देशात वेदांची रचना झाली होती. एक गौरवशाली, समृद्ध व शक्तिशाली भारत घडवण्याचे काम सुरू आहे. आपल्याला आपल्या सैन्यावर अभिमान आहे. कृषी ही भारतीय अर्थव्यवस्थेची कणा आहे आणि शेतकरी त्याचा आत्मा आहे. माझ्यासाठी शेतकऱ्यांची सेवा हीच ईश्वराची पूजा आहे .कृषी क्षेत्रात जे संशोधन होत आहे ते थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. यासाठी अभियान राबविले जात आहे.

भट सभागृहात 'विकसित कृषी संकल्प अभियान' अंतर्गत विविध कृषी उत्पादनांवर आधारित प्रदर्शनीचे शिवराज सिंह चौहान  आणि देवेंद्र फडणवीस यांनी उत्पादनांचे निरीक्षण केले आणि माहिती घेतली.  यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,  कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, राज्य मंत्री आशीष जायसवाल, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार आशीष देशमुख, चरणसिंग ठाकूर, आसीएआरचे महासंचाक डॉ. एम.एल. जाट ,आयसीएआरचे उप महासंचालक राजबीर सिंह, कृषी विभागाचे प्रधान सचिवपदी विकासचंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त सूरज मांढरे यांच्यासह कृ्षी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी