शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

शासनाच्या दडपशाही धोरणांमुळेच रुपयाचे अवमूल्यन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 01:12 IST

शासनाच्या दडपशाही धोरणांमुळे देशातील अतिश्रीमंत कुटुंबीय देश सोडून जाताहेत. एका सर्वेक्षणानुसार देशातील ७५ हजार अतिश्रीमंत असलेल्या कुटुंबांनी हा देश सोडला आहे. जाताना त्यांनी तब्बल पाच लाख कोटी रुपयाची आपली संपत्तीही घेऊन गेले आहेत. त्यामुळेच अचानक डॉलरची किंमत वाढून रुपयाचे अवमूल्यन होत आहे अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी शनिवारी येथे पत्रपरिषदेत केली. आज देशाची अर्थव्यवस्था अतिशय बिकट अवस्थेत असून अर्थव्यवस्थेला व देशाला वाचवायचे असेल तर भाजप सरकार पुन्हा सत्तेत येता कामा नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

ठळक मुद्दे७५ हजार अतिश्रीमंत कुटुंब गेलेत देश सोडून : प्रकाश आंबेडकर यांची टीका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासनाच्या दडपशाही धोरणांमुळे देशातील अतिश्रीमंत कुटुंबीय देश सोडून जाताहेत. एका सर्वेक्षणानुसार देशातील ७५ हजार अतिश्रीमंत असलेल्या कुटुंबांनी हा देश सोडला आहे. जाताना त्यांनी तब्बल पाच लाख कोटी रुपयाची आपली संपत्तीही घेऊन गेले आहेत. त्यामुळेच अचानक डॉलरची किंमत वाढून रुपयाचे अवमूल्यन होत आहे अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी शनिवारी येथे पत्रपरिषदेत केली. आज देशाची अर्थव्यवस्था अतिशय बिकट अवस्थेत असून अर्थव्यवस्थेला व देशाला वाचवायचे असेल तर भाजप सरकार पुन्हा सत्तेत येता कामा नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.‘वर्ल्ड वेल्थ’ या जगप्रसिद्ध संस्थेचा अहवालाचा संदर्भ देत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, दहा कोटी रुपयाची उलाढाल असलेले लोक अतिश्रीमंत म्हणून गणले जातात. देशात अशा अतिश्रीमंत लोकांची संख्या जवळपास ३ लाख ३० हजार ४०० आहे. यापैकी २०१५ मध्ये ४ हजार, २०१६ मध्ये ६ हजार आणि २०१७ मध्ये ७ हजार अतिश्रीमंत कुटुंब देशातून निघून गेले आहेत. यात नीरव मोदीसारख्या बँक लुटणाऱ्यांचा संबंध नाही, ते वेगळे आहेत, असेही त्यांनी सांगितले.या परिस्थितीमुळे नजीकच्या काळात डॉलरचे भाव आणखी वाढतील आणि देशात महागाई वाढेल. आपण पुन्हा १९९० च्या अवस्थेत आलो आहोत. तेव्हा सावजनिक संस्था मजबूत होत्या. त्यामुळे वर्ल्ड बँकेने लादलेल्या अटीपासून आपण ती परिस्थिती निभावू शकलो. परंतु आतो आता ज्या अटी लादल्या जातील, त्या आपण सहन करू शकणार की नाही, अशी वेळ येईल, असा इशाराही त्यांनी वर्तविला. तसेच देशात सध्या गृहयुद्धासारखी परिस्थिती असून ती आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये प्रत्यक्षात खरी ठरू शकते असा धोकाही त्यांनी व्यक्त केला.पत्रपरिषदेला प्रदेश महासचिव सागर डबरासे, राजू लोखंडे, गुणवंत देवपारे, डॉ. संदीप नंदेश्वर आदी उपस्थित होते.कामगार कायदे बदलण्यासाठी ‘शहरी नक्षलवाद’ मोहीमनक्षलवादी असणे आणि त्यांच्याप्रती सहानुभूती ठेवणे वेगवेगळी बाब आहे. मुळात कामगार कायदे बदलवण्यासाठी राबवण्यात येत असलेली मोहीम म्हणजे शहरी नक्षलवाद होय. सत्तेवर असलेले कुणाचेही सरकार असो ते भांडवलदारांना खूष ठेवण्यासाठी आणि त्यांच्या माध्यमातून मिळणाऱ्या ‘अनअकाऊंट फंड’साठी पोलीस हे मिळून ही मोहीम राबवत आहेत, अशी टीकाही प्रकाश आंबेडकर यांनी केली.‘दलित’ शब्दावर यापूर्वीही वाददलित हा शब्द वापरायचा की नाही, यावर १९८० मध्ये सुद्धा वाद निर्माण झाला होता. तेव्हा नामदेव ढसाळ, अर्जुन डांगळे यांच्यासारखे साहित्यिक एका बाजूने तर दुसऱ्या बाजूने इतर सर्व साहित्यिक होते. तेव्हा ज्यांना हा शब्द वापरायचा आहे, त्यांनी वापरावा, ज्यांना वापरायचा नाही, त्यांनी वापरू नये, असे ठरले. हा निर्णय सर्वांनी मान्य केला. तो आजवर सर्वजण पाळत आले होते. न्यायालयाने सुद्धा हीच भूमिका घेतली आहे. शब्द वापरणे किंवा न वपरणे कंपलसरी नाही. अनेक ठिकाणी ओळख म्हणून तो शब्द वापरावाच लागतो. तेव्हा यावर पुन्हा वाद नको, अशी आमची भूमिका असल्याचेही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.ओवेसीसोबत मिळून लढणार, काँग्रेससोबतही आघाडीचे संकेतएमआयएमचे खा. ओवेसी यांचे पत्र मिळाले आहे. ते आमच्यासोबत यायला तयार आहेत. त्यांच्यासोबत आम्ही मिळून लढणार आहोत. २०१९ मध्ये भाजपाला हरवायचे असेल तर काँग्रेसला सर्वांना सोबत घ्यावे लागेल, असे सांगत काँग्रेससोबतही आघाडी होईल, अशी शक्यताही प्रकाश आंबेडकर यांनी वर्तविली.

 

 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरnagpurनागपूर