शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

शासनाच्या दडपशाही धोरणांमुळेच रुपयाचे अवमूल्यन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 01:12 IST

शासनाच्या दडपशाही धोरणांमुळे देशातील अतिश्रीमंत कुटुंबीय देश सोडून जाताहेत. एका सर्वेक्षणानुसार देशातील ७५ हजार अतिश्रीमंत असलेल्या कुटुंबांनी हा देश सोडला आहे. जाताना त्यांनी तब्बल पाच लाख कोटी रुपयाची आपली संपत्तीही घेऊन गेले आहेत. त्यामुळेच अचानक डॉलरची किंमत वाढून रुपयाचे अवमूल्यन होत आहे अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी शनिवारी येथे पत्रपरिषदेत केली. आज देशाची अर्थव्यवस्था अतिशय बिकट अवस्थेत असून अर्थव्यवस्थेला व देशाला वाचवायचे असेल तर भाजप सरकार पुन्हा सत्तेत येता कामा नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

ठळक मुद्दे७५ हजार अतिश्रीमंत कुटुंब गेलेत देश सोडून : प्रकाश आंबेडकर यांची टीका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासनाच्या दडपशाही धोरणांमुळे देशातील अतिश्रीमंत कुटुंबीय देश सोडून जाताहेत. एका सर्वेक्षणानुसार देशातील ७५ हजार अतिश्रीमंत असलेल्या कुटुंबांनी हा देश सोडला आहे. जाताना त्यांनी तब्बल पाच लाख कोटी रुपयाची आपली संपत्तीही घेऊन गेले आहेत. त्यामुळेच अचानक डॉलरची किंमत वाढून रुपयाचे अवमूल्यन होत आहे अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी शनिवारी येथे पत्रपरिषदेत केली. आज देशाची अर्थव्यवस्था अतिशय बिकट अवस्थेत असून अर्थव्यवस्थेला व देशाला वाचवायचे असेल तर भाजप सरकार पुन्हा सत्तेत येता कामा नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.‘वर्ल्ड वेल्थ’ या जगप्रसिद्ध संस्थेचा अहवालाचा संदर्भ देत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, दहा कोटी रुपयाची उलाढाल असलेले लोक अतिश्रीमंत म्हणून गणले जातात. देशात अशा अतिश्रीमंत लोकांची संख्या जवळपास ३ लाख ३० हजार ४०० आहे. यापैकी २०१५ मध्ये ४ हजार, २०१६ मध्ये ६ हजार आणि २०१७ मध्ये ७ हजार अतिश्रीमंत कुटुंब देशातून निघून गेले आहेत. यात नीरव मोदीसारख्या बँक लुटणाऱ्यांचा संबंध नाही, ते वेगळे आहेत, असेही त्यांनी सांगितले.या परिस्थितीमुळे नजीकच्या काळात डॉलरचे भाव आणखी वाढतील आणि देशात महागाई वाढेल. आपण पुन्हा १९९० च्या अवस्थेत आलो आहोत. तेव्हा सावजनिक संस्था मजबूत होत्या. त्यामुळे वर्ल्ड बँकेने लादलेल्या अटीपासून आपण ती परिस्थिती निभावू शकलो. परंतु आतो आता ज्या अटी लादल्या जातील, त्या आपण सहन करू शकणार की नाही, अशी वेळ येईल, असा इशाराही त्यांनी वर्तविला. तसेच देशात सध्या गृहयुद्धासारखी परिस्थिती असून ती आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये प्रत्यक्षात खरी ठरू शकते असा धोकाही त्यांनी व्यक्त केला.पत्रपरिषदेला प्रदेश महासचिव सागर डबरासे, राजू लोखंडे, गुणवंत देवपारे, डॉ. संदीप नंदेश्वर आदी उपस्थित होते.कामगार कायदे बदलण्यासाठी ‘शहरी नक्षलवाद’ मोहीमनक्षलवादी असणे आणि त्यांच्याप्रती सहानुभूती ठेवणे वेगवेगळी बाब आहे. मुळात कामगार कायदे बदलवण्यासाठी राबवण्यात येत असलेली मोहीम म्हणजे शहरी नक्षलवाद होय. सत्तेवर असलेले कुणाचेही सरकार असो ते भांडवलदारांना खूष ठेवण्यासाठी आणि त्यांच्या माध्यमातून मिळणाऱ्या ‘अनअकाऊंट फंड’साठी पोलीस हे मिळून ही मोहीम राबवत आहेत, अशी टीकाही प्रकाश आंबेडकर यांनी केली.‘दलित’ शब्दावर यापूर्वीही वाददलित हा शब्द वापरायचा की नाही, यावर १९८० मध्ये सुद्धा वाद निर्माण झाला होता. तेव्हा नामदेव ढसाळ, अर्जुन डांगळे यांच्यासारखे साहित्यिक एका बाजूने तर दुसऱ्या बाजूने इतर सर्व साहित्यिक होते. तेव्हा ज्यांना हा शब्द वापरायचा आहे, त्यांनी वापरावा, ज्यांना वापरायचा नाही, त्यांनी वापरू नये, असे ठरले. हा निर्णय सर्वांनी मान्य केला. तो आजवर सर्वजण पाळत आले होते. न्यायालयाने सुद्धा हीच भूमिका घेतली आहे. शब्द वापरणे किंवा न वपरणे कंपलसरी नाही. अनेक ठिकाणी ओळख म्हणून तो शब्द वापरावाच लागतो. तेव्हा यावर पुन्हा वाद नको, अशी आमची भूमिका असल्याचेही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.ओवेसीसोबत मिळून लढणार, काँग्रेससोबतही आघाडीचे संकेतएमआयएमचे खा. ओवेसी यांचे पत्र मिळाले आहे. ते आमच्यासोबत यायला तयार आहेत. त्यांच्यासोबत आम्ही मिळून लढणार आहोत. २०१९ मध्ये भाजपाला हरवायचे असेल तर काँग्रेसला सर्वांना सोबत घ्यावे लागेल, असे सांगत काँग्रेससोबतही आघाडी होईल, अशी शक्यताही प्रकाश आंबेडकर यांनी वर्तविली.

 

 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरnagpurनागपूर