शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या दडपशाही धोरणांमुळेच रुपयाचे अवमूल्यन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 01:12 IST

शासनाच्या दडपशाही धोरणांमुळे देशातील अतिश्रीमंत कुटुंबीय देश सोडून जाताहेत. एका सर्वेक्षणानुसार देशातील ७५ हजार अतिश्रीमंत असलेल्या कुटुंबांनी हा देश सोडला आहे. जाताना त्यांनी तब्बल पाच लाख कोटी रुपयाची आपली संपत्तीही घेऊन गेले आहेत. त्यामुळेच अचानक डॉलरची किंमत वाढून रुपयाचे अवमूल्यन होत आहे अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी शनिवारी येथे पत्रपरिषदेत केली. आज देशाची अर्थव्यवस्था अतिशय बिकट अवस्थेत असून अर्थव्यवस्थेला व देशाला वाचवायचे असेल तर भाजप सरकार पुन्हा सत्तेत येता कामा नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

ठळक मुद्दे७५ हजार अतिश्रीमंत कुटुंब गेलेत देश सोडून : प्रकाश आंबेडकर यांची टीका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासनाच्या दडपशाही धोरणांमुळे देशातील अतिश्रीमंत कुटुंबीय देश सोडून जाताहेत. एका सर्वेक्षणानुसार देशातील ७५ हजार अतिश्रीमंत असलेल्या कुटुंबांनी हा देश सोडला आहे. जाताना त्यांनी तब्बल पाच लाख कोटी रुपयाची आपली संपत्तीही घेऊन गेले आहेत. त्यामुळेच अचानक डॉलरची किंमत वाढून रुपयाचे अवमूल्यन होत आहे अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी शनिवारी येथे पत्रपरिषदेत केली. आज देशाची अर्थव्यवस्था अतिशय बिकट अवस्थेत असून अर्थव्यवस्थेला व देशाला वाचवायचे असेल तर भाजप सरकार पुन्हा सत्तेत येता कामा नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.‘वर्ल्ड वेल्थ’ या जगप्रसिद्ध संस्थेचा अहवालाचा संदर्भ देत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, दहा कोटी रुपयाची उलाढाल असलेले लोक अतिश्रीमंत म्हणून गणले जातात. देशात अशा अतिश्रीमंत लोकांची संख्या जवळपास ३ लाख ३० हजार ४०० आहे. यापैकी २०१५ मध्ये ४ हजार, २०१६ मध्ये ६ हजार आणि २०१७ मध्ये ७ हजार अतिश्रीमंत कुटुंब देशातून निघून गेले आहेत. यात नीरव मोदीसारख्या बँक लुटणाऱ्यांचा संबंध नाही, ते वेगळे आहेत, असेही त्यांनी सांगितले.या परिस्थितीमुळे नजीकच्या काळात डॉलरचे भाव आणखी वाढतील आणि देशात महागाई वाढेल. आपण पुन्हा १९९० च्या अवस्थेत आलो आहोत. तेव्हा सावजनिक संस्था मजबूत होत्या. त्यामुळे वर्ल्ड बँकेने लादलेल्या अटीपासून आपण ती परिस्थिती निभावू शकलो. परंतु आतो आता ज्या अटी लादल्या जातील, त्या आपण सहन करू शकणार की नाही, अशी वेळ येईल, असा इशाराही त्यांनी वर्तविला. तसेच देशात सध्या गृहयुद्धासारखी परिस्थिती असून ती आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये प्रत्यक्षात खरी ठरू शकते असा धोकाही त्यांनी व्यक्त केला.पत्रपरिषदेला प्रदेश महासचिव सागर डबरासे, राजू लोखंडे, गुणवंत देवपारे, डॉ. संदीप नंदेश्वर आदी उपस्थित होते.कामगार कायदे बदलण्यासाठी ‘शहरी नक्षलवाद’ मोहीमनक्षलवादी असणे आणि त्यांच्याप्रती सहानुभूती ठेवणे वेगवेगळी बाब आहे. मुळात कामगार कायदे बदलवण्यासाठी राबवण्यात येत असलेली मोहीम म्हणजे शहरी नक्षलवाद होय. सत्तेवर असलेले कुणाचेही सरकार असो ते भांडवलदारांना खूष ठेवण्यासाठी आणि त्यांच्या माध्यमातून मिळणाऱ्या ‘अनअकाऊंट फंड’साठी पोलीस हे मिळून ही मोहीम राबवत आहेत, अशी टीकाही प्रकाश आंबेडकर यांनी केली.‘दलित’ शब्दावर यापूर्वीही वाददलित हा शब्द वापरायचा की नाही, यावर १९८० मध्ये सुद्धा वाद निर्माण झाला होता. तेव्हा नामदेव ढसाळ, अर्जुन डांगळे यांच्यासारखे साहित्यिक एका बाजूने तर दुसऱ्या बाजूने इतर सर्व साहित्यिक होते. तेव्हा ज्यांना हा शब्द वापरायचा आहे, त्यांनी वापरावा, ज्यांना वापरायचा नाही, त्यांनी वापरू नये, असे ठरले. हा निर्णय सर्वांनी मान्य केला. तो आजवर सर्वजण पाळत आले होते. न्यायालयाने सुद्धा हीच भूमिका घेतली आहे. शब्द वापरणे किंवा न वपरणे कंपलसरी नाही. अनेक ठिकाणी ओळख म्हणून तो शब्द वापरावाच लागतो. तेव्हा यावर पुन्हा वाद नको, अशी आमची भूमिका असल्याचेही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.ओवेसीसोबत मिळून लढणार, काँग्रेससोबतही आघाडीचे संकेतएमआयएमचे खा. ओवेसी यांचे पत्र मिळाले आहे. ते आमच्यासोबत यायला तयार आहेत. त्यांच्यासोबत आम्ही मिळून लढणार आहोत. २०१९ मध्ये भाजपाला हरवायचे असेल तर काँग्रेसला सर्वांना सोबत घ्यावे लागेल, असे सांगत काँग्रेससोबतही आघाडी होईल, अशी शक्यताही प्रकाश आंबेडकर यांनी वर्तविली.

 

 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरnagpurनागपूर