शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

शासनाच्या दडपशाही धोरणांमुळेच रुपयाचे अवमूल्यन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 01:12 IST

शासनाच्या दडपशाही धोरणांमुळे देशातील अतिश्रीमंत कुटुंबीय देश सोडून जाताहेत. एका सर्वेक्षणानुसार देशातील ७५ हजार अतिश्रीमंत असलेल्या कुटुंबांनी हा देश सोडला आहे. जाताना त्यांनी तब्बल पाच लाख कोटी रुपयाची आपली संपत्तीही घेऊन गेले आहेत. त्यामुळेच अचानक डॉलरची किंमत वाढून रुपयाचे अवमूल्यन होत आहे अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी शनिवारी येथे पत्रपरिषदेत केली. आज देशाची अर्थव्यवस्था अतिशय बिकट अवस्थेत असून अर्थव्यवस्थेला व देशाला वाचवायचे असेल तर भाजप सरकार पुन्हा सत्तेत येता कामा नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

ठळक मुद्दे७५ हजार अतिश्रीमंत कुटुंब गेलेत देश सोडून : प्रकाश आंबेडकर यांची टीका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासनाच्या दडपशाही धोरणांमुळे देशातील अतिश्रीमंत कुटुंबीय देश सोडून जाताहेत. एका सर्वेक्षणानुसार देशातील ७५ हजार अतिश्रीमंत असलेल्या कुटुंबांनी हा देश सोडला आहे. जाताना त्यांनी तब्बल पाच लाख कोटी रुपयाची आपली संपत्तीही घेऊन गेले आहेत. त्यामुळेच अचानक डॉलरची किंमत वाढून रुपयाचे अवमूल्यन होत आहे अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी शनिवारी येथे पत्रपरिषदेत केली. आज देशाची अर्थव्यवस्था अतिशय बिकट अवस्थेत असून अर्थव्यवस्थेला व देशाला वाचवायचे असेल तर भाजप सरकार पुन्हा सत्तेत येता कामा नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.‘वर्ल्ड वेल्थ’ या जगप्रसिद्ध संस्थेचा अहवालाचा संदर्भ देत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, दहा कोटी रुपयाची उलाढाल असलेले लोक अतिश्रीमंत म्हणून गणले जातात. देशात अशा अतिश्रीमंत लोकांची संख्या जवळपास ३ लाख ३० हजार ४०० आहे. यापैकी २०१५ मध्ये ४ हजार, २०१६ मध्ये ६ हजार आणि २०१७ मध्ये ७ हजार अतिश्रीमंत कुटुंब देशातून निघून गेले आहेत. यात नीरव मोदीसारख्या बँक लुटणाऱ्यांचा संबंध नाही, ते वेगळे आहेत, असेही त्यांनी सांगितले.या परिस्थितीमुळे नजीकच्या काळात डॉलरचे भाव आणखी वाढतील आणि देशात महागाई वाढेल. आपण पुन्हा १९९० च्या अवस्थेत आलो आहोत. तेव्हा सावजनिक संस्था मजबूत होत्या. त्यामुळे वर्ल्ड बँकेने लादलेल्या अटीपासून आपण ती परिस्थिती निभावू शकलो. परंतु आतो आता ज्या अटी लादल्या जातील, त्या आपण सहन करू शकणार की नाही, अशी वेळ येईल, असा इशाराही त्यांनी वर्तविला. तसेच देशात सध्या गृहयुद्धासारखी परिस्थिती असून ती आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये प्रत्यक्षात खरी ठरू शकते असा धोकाही त्यांनी व्यक्त केला.पत्रपरिषदेला प्रदेश महासचिव सागर डबरासे, राजू लोखंडे, गुणवंत देवपारे, डॉ. संदीप नंदेश्वर आदी उपस्थित होते.कामगार कायदे बदलण्यासाठी ‘शहरी नक्षलवाद’ मोहीमनक्षलवादी असणे आणि त्यांच्याप्रती सहानुभूती ठेवणे वेगवेगळी बाब आहे. मुळात कामगार कायदे बदलवण्यासाठी राबवण्यात येत असलेली मोहीम म्हणजे शहरी नक्षलवाद होय. सत्तेवर असलेले कुणाचेही सरकार असो ते भांडवलदारांना खूष ठेवण्यासाठी आणि त्यांच्या माध्यमातून मिळणाऱ्या ‘अनअकाऊंट फंड’साठी पोलीस हे मिळून ही मोहीम राबवत आहेत, अशी टीकाही प्रकाश आंबेडकर यांनी केली.‘दलित’ शब्दावर यापूर्वीही वाददलित हा शब्द वापरायचा की नाही, यावर १९८० मध्ये सुद्धा वाद निर्माण झाला होता. तेव्हा नामदेव ढसाळ, अर्जुन डांगळे यांच्यासारखे साहित्यिक एका बाजूने तर दुसऱ्या बाजूने इतर सर्व साहित्यिक होते. तेव्हा ज्यांना हा शब्द वापरायचा आहे, त्यांनी वापरावा, ज्यांना वापरायचा नाही, त्यांनी वापरू नये, असे ठरले. हा निर्णय सर्वांनी मान्य केला. तो आजवर सर्वजण पाळत आले होते. न्यायालयाने सुद्धा हीच भूमिका घेतली आहे. शब्द वापरणे किंवा न वपरणे कंपलसरी नाही. अनेक ठिकाणी ओळख म्हणून तो शब्द वापरावाच लागतो. तेव्हा यावर पुन्हा वाद नको, अशी आमची भूमिका असल्याचेही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.ओवेसीसोबत मिळून लढणार, काँग्रेससोबतही आघाडीचे संकेतएमआयएमचे खा. ओवेसी यांचे पत्र मिळाले आहे. ते आमच्यासोबत यायला तयार आहेत. त्यांच्यासोबत आम्ही मिळून लढणार आहोत. २०१९ मध्ये भाजपाला हरवायचे असेल तर काँग्रेसला सर्वांना सोबत घ्यावे लागेल, असे सांगत काँग्रेससोबतही आघाडी होईल, अशी शक्यताही प्रकाश आंबेडकर यांनी वर्तविली.

 

 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरnagpurनागपूर