शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

दवभिजल्या संध्याकाळी बहरली ‘उत्तररात्र’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 23:30 IST

अमृताच्या अंकुरण्याविषयी सांगत ती कुठल्याशा स्वप्नफुलाशी येऊन थांबते. वाटते...ती पोहोचलीय समेवर. पण, कुठले काय...तो केवळ भास असतो हलत्या सावल्यांचा. ती आणखी पुढे सांगत सुटते युगायुगांच्या अक्षर यात्रेची गाथा. रॉय किणीकरांच्या शब्दांची हीच गाथा डॉ. शाम माधव धोंड व त्यांच्या सहकाऱ्यांनी शुक्रवारच्या दवभिजल्या संध्याकाळी ऐकवली अन् १२९ कडव्यांचा हा अविट तराना पुढचे १ तास २० मिनिट नुसता झंकारात राहिला श्रोत्यांच्या मनामनात.

ठळक मुद्दे१२९ कडव्यांच्या अविट तराना : इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडीजचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : उत्तररात्र...ही खरं तर जीवनाच्या क्षणभंगुर स्वरूपाचे वास्तव सांगणारी कविता. पण, तिचा प्रारंभ प्रचंड आशादायी. प्रणयाच्या उन्मत हिंदोळ्यावर झुलणारा. अमृताच्या अंकुरण्याविषयी सांगत ती कुठल्याशा स्वप्नफुलाशी येऊन थांबते. वाटते...ती पोहोचलीय समेवर. पण, कुठले काय...तो केवळ भास असतो हलत्या सावल्यांचा. ती आणखी पुढे सांगत सुटते युगायुगांच्या अक्षर यात्रेची गाथा. रॉय किणीकरांच्या शब्दांची हीच गाथा डॉ. शाम माधव धोंड व त्यांच्या सहकाऱ्यांनी शुक्रवारच्या दवभिजल्या संध्याकाळी ऐकवली अन् १२९ कडव्यांचा हा अविट तराना पुढचे १ तास २० मिनिट नुसता झंकारात राहिला श्रोत्यांच्या मनामनात. इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडीजतर्फे हॉटेल सेंंटर पॉर्इंट येथे आयोजित व सृजन निर्मित या काव्यवाचनाचा प्रारंभ डॉ. वैशाली उपाध्ये यांच्या गोड आवाजात झाला. ‘हा देह तुझा पण देहातील तू कोण, हा देह तुझा पण देहाविण तू कोण...?’ या प्रश्नाने पहिल्याच मिनिटाला अंतर्मुख केले. ‘राहिले तिथे ते तसेच अपुरे चित्र, राहिले तिथे ते तसेच अपुरे पत्र, घटिपात्र बुडाले, कलंडला नि:श्वास, पाखरू उडाले, पडला उलटा फास...’ असे पे्रम आणि विरहाचे हे चित्र मांडत ही कविता पुढे सरकते अन् थेट सतत जाणवणारा मृत्यू, अनिश्चितता, हतबलता, नियतीचे वर्चस्व यांचे भयाण वास्तव सांगायला लागते. विचारातील विविधता, अनिश्चितता आणि अर्थाचे हेलकावे वाचकाला स्वस्थता लाभू देत नाहीत. विचारचक्र गरगरत राहते. शेवटाकडे जाताना ही कविता सांगते...‘पण लिहावयाचे लिहून झाले नाही,पण सांगायचे सांगून झाले नाही,संपली कथा जी कुणी ऐकली नाही,संपली रात्र, वेदना संपली नाही...’ ही कविता जिथे संपते तिथे श्रोत्यांची अवस्था वावटळीत अडकल्यासारखी होते. लाख प्रयत्नाअंतीही अर्थाच्या गाभ्यापर्यंत पोचत नाहीत. पण, परतताना या कवितेने आपल्या पदरात काहीतरी टाकलेय खरं याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर असते. याचे श्रेय अर्थातच डॉ. शाम माधव धोंड यांना आणि त्यांच्या कल्पनेला वास्तवाचे पंख प्रदान करणाऱ्या डॉ. वैशाली उपाध्ये, अरविंद उपाध्ये आणि शैलेश दाणी यांनाही.

टॅग्स :nagpurनागपूरcultureसांस्कृतिक