शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

दवभिजल्या संध्याकाळी बहरली ‘उत्तररात्र’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 23:30 IST

अमृताच्या अंकुरण्याविषयी सांगत ती कुठल्याशा स्वप्नफुलाशी येऊन थांबते. वाटते...ती पोहोचलीय समेवर. पण, कुठले काय...तो केवळ भास असतो हलत्या सावल्यांचा. ती आणखी पुढे सांगत सुटते युगायुगांच्या अक्षर यात्रेची गाथा. रॉय किणीकरांच्या शब्दांची हीच गाथा डॉ. शाम माधव धोंड व त्यांच्या सहकाऱ्यांनी शुक्रवारच्या दवभिजल्या संध्याकाळी ऐकवली अन् १२९ कडव्यांचा हा अविट तराना पुढचे १ तास २० मिनिट नुसता झंकारात राहिला श्रोत्यांच्या मनामनात.

ठळक मुद्दे१२९ कडव्यांच्या अविट तराना : इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडीजचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : उत्तररात्र...ही खरं तर जीवनाच्या क्षणभंगुर स्वरूपाचे वास्तव सांगणारी कविता. पण, तिचा प्रारंभ प्रचंड आशादायी. प्रणयाच्या उन्मत हिंदोळ्यावर झुलणारा. अमृताच्या अंकुरण्याविषयी सांगत ती कुठल्याशा स्वप्नफुलाशी येऊन थांबते. वाटते...ती पोहोचलीय समेवर. पण, कुठले काय...तो केवळ भास असतो हलत्या सावल्यांचा. ती आणखी पुढे सांगत सुटते युगायुगांच्या अक्षर यात्रेची गाथा. रॉय किणीकरांच्या शब्दांची हीच गाथा डॉ. शाम माधव धोंड व त्यांच्या सहकाऱ्यांनी शुक्रवारच्या दवभिजल्या संध्याकाळी ऐकवली अन् १२९ कडव्यांचा हा अविट तराना पुढचे १ तास २० मिनिट नुसता झंकारात राहिला श्रोत्यांच्या मनामनात. इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडीजतर्फे हॉटेल सेंंटर पॉर्इंट येथे आयोजित व सृजन निर्मित या काव्यवाचनाचा प्रारंभ डॉ. वैशाली उपाध्ये यांच्या गोड आवाजात झाला. ‘हा देह तुझा पण देहातील तू कोण, हा देह तुझा पण देहाविण तू कोण...?’ या प्रश्नाने पहिल्याच मिनिटाला अंतर्मुख केले. ‘राहिले तिथे ते तसेच अपुरे चित्र, राहिले तिथे ते तसेच अपुरे पत्र, घटिपात्र बुडाले, कलंडला नि:श्वास, पाखरू उडाले, पडला उलटा फास...’ असे पे्रम आणि विरहाचे हे चित्र मांडत ही कविता पुढे सरकते अन् थेट सतत जाणवणारा मृत्यू, अनिश्चितता, हतबलता, नियतीचे वर्चस्व यांचे भयाण वास्तव सांगायला लागते. विचारातील विविधता, अनिश्चितता आणि अर्थाचे हेलकावे वाचकाला स्वस्थता लाभू देत नाहीत. विचारचक्र गरगरत राहते. शेवटाकडे जाताना ही कविता सांगते...‘पण लिहावयाचे लिहून झाले नाही,पण सांगायचे सांगून झाले नाही,संपली कथा जी कुणी ऐकली नाही,संपली रात्र, वेदना संपली नाही...’ ही कविता जिथे संपते तिथे श्रोत्यांची अवस्था वावटळीत अडकल्यासारखी होते. लाख प्रयत्नाअंतीही अर्थाच्या गाभ्यापर्यंत पोचत नाहीत. पण, परतताना या कवितेने आपल्या पदरात काहीतरी टाकलेय खरं याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर असते. याचे श्रेय अर्थातच डॉ. शाम माधव धोंड यांना आणि त्यांच्या कल्पनेला वास्तवाचे पंख प्रदान करणाऱ्या डॉ. वैशाली उपाध्ये, अरविंद उपाध्ये आणि शैलेश दाणी यांनाही.

टॅग्स :nagpurनागपूरcultureसांस्कृतिक