शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

उद्ध्वस्त भविष्याची किंमत ३२० रुपये

By admin | Updated: April 24, 2017 02:09 IST

माणसाची खासकरून महिला-मुलीची अब्रू मानवी जीवापेक्षाही जास्त अमूल्य मानली जाते.

दोघे १०० रुपयात तर दोघे २२० रुपयात गप्प : पापाचे बनले भागीदारनरेश डोंगरे नागपूरमाणसाची खासकरून महिला-मुलीची अब्रू मानवी जीवापेक्षाही जास्त अमूल्य मानली जाते. एखादवेळी शरीराचा एखादा अवयव माणूस दान करू शकतो, बदलवूही शकतो, मात्र महिलेची अब्रू एकदा गेली की पर्यायच संपतो. एखाद्या व्यक्तीला अपघात झाला, त्याच्यावर हल्ला झाला तर त्याला पुढचे अनेक दिवस त्या जखमांच्या वेदना होतात. मात्र, एखाद्या महिला, मुलीची अब्रू लुटली गेली तर ती महिला-मुलगी मरेपर्यंतचा प्रत्येक क्षण न सोसवणाऱ्या वेदना घेऊन जगत असते. त्याचमुळे महिला-मुलीच्या बाबतीत तिच्या जीवापेक्षाही अमूल्य तिची इज्जत मानली जाते. दुर्दैवी तन्वी(काल्पनिक नाव)च्या अब्रूचा सौदा मात्र फक्त ३२० रुपयात झाला. स्वत:ला माणूस म्हणून घेणाऱ्या नराधमांनी ३२० रुपये फेकून तिचे आयुष्य उद्ध्वस्त केले. भयंकर म्हणजे, केवळ ३२० रुपयांसाठी चार नराधमांनी आपल्या मनोमस्तिष्कावर झापडं लावून तिची अब्रू लुटणाऱ्या नराधमांची पाठराखण केली. या ३२० रुपयात कुणाचा वाटा ५० रुपये, कुणाचा १०० तर कुणाचा ११० रुपये आहे. माणुसकीला काळिमा फासणारा हा प्रकार सीताबर्डीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेतून पुढे आला आहे. आॅटोचालक चिंट्याच्या मदतीने तन्वीला १०० रुपयात जेवण घेऊन देण्याचे आमिष दाखवून सामूहिक बलात्काराचा कट रचणारा फिरोज पाच मुलींचा बाप आहे. त्याची सर्वात लहान मुलगी केवळ सहा महिन्यांची आहे.तन्वी त्याच्या मुलीसारखीच आहे. मात्र, दुष्प्रवृत्तीच्या फिरोजने तन्वीचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा कट रचला अन् यासाठी त्याने चिंट्या, मयूर आणि बाबा नामक साथीदारांची मदत घेतली. एकटी, निराधार आणि असहाय मुलगी पाहून हे नराधमही कुकर्मात सहभागी झाले. त्याहीपेक्षा भयंकर आहे, पुढचा टप्पा!फिरोज आणि बाबाने आरोपी प्रलय मेश्राम तसेच सौमिल मेश्रामला फोन केला. ‘शिकार ला रहे है, गद्दीया (गाद्या) लाके रखो. तुम्हारे लिये बीअर भी ला रहा हूं’ असे म्हटले. ते ऐकताच प्रलय आणि सौमिलने गाद्यांची व्यवस्था केली. निर्माणाधीन इमारतीत गेल्यानंतर तेथील चौकीदार साखरे बावाजी (वय ७०) याने ‘मेरा क्या... असा प्रश्न केला. आरोपींनी त्याच्या खिशात ५० ची नोट कोंबली आणि त्याने सदनिकेचे दार उघडून दिले. हे पाहून बाजूच्या इमारतीत चौकीदारी करणारा सुरेश भारसाकळे (वय ६०) आला. त्यानेही भुवया उंचावल्या. नराधमांनी त्याच्याही हातात ५० ची नोट कोंबली. तोही बाजूला झाला. अवघ्या १०० रुपयांसाठी हे दोघे तन्वीच्या आक्रोशाचे मूक साक्षीदार (पापाचे भागीदार) बनले. तर, २२० रुपयांच्या बीअरसाठी प्रलय आणि सौमिलने आपल्या संवेदना विकल्या. चार नराधम तन्वीचे आयुष्य उद्ध्वस्त करीत असताना हे दोघे बीअरचे घोट रिचवत दाराजवळ पडून होते. साखरे, भारसाकळे, प्रलय तसेच सौमिल या चौघांना किंवा त्यांच्यातील एकालाही स्वत:ची लाज वाटली नाही. नराधमांना विरोध करण्याची त्यांची वृत्ती नव्हतीच. मात्र पोलिसांना १ रुपयाचा फोन करण्याचीही तसदी त्यानी घेतली नाही. एका निराधार मुलीच्या इज्जतीचा एक प्रकारे त्यांनी सौदाच केला. हे करताना त्यांना कसलीही आत्मग्लानी झाली नाही. परिणामी लहानपणापासून पोरकेपणा तिरस्कार सहन करणाऱ्या तन्वीच्या वाट्याला आता अंध:कारमय भविष्य आले आहे.सारेच कसे संतापजनक सुरक्षा रक्षक म्हणवून घेणाऱ्या साखरे अन् भारसाकळेला तन्वीच्या वयाच्या नाती असाव्यात. ६०-७० उन्हाळे, पावसाळे बघून चांगले काय, वाईट काय याचा अनुभव घेणाऱ्या या दोघांनी अवघ्या ५० रुपयांसाठी आपल्या पिकल्या केसांना काळे फासावे तसे स्वत:च्या मनालाही काळे फासले. त्यांच्या तुलनेत प्रलय आणि सौमिलचेही वर्तन प्रचंड संतापजनक आहे. हे दोघेही शिकले सवरले आहेत. प्रलय अभियंता असून, मोठ्या पगारावर झारखंडमध्ये नोकरी करतो तर, सौमिल एका सिमेंट कंपनीत कार्यरत आहे. असे असूनही त्यांनी केवळ एका बीअरच्या बाटलीसाठी स्वत:ची बुद्धी नराधमांकडे गहाण टाकली.