शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

शाैचालये असूनही उघड्यावर जाणे सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:13 IST

राम वाघमारे लाेकमत न्यूज नेटवर्क नांद : उघड्यावरील घाणीचा नायनाट करण्यासाठी शासनाने नागरिकांना घराेघरी शाैचालयांचे बांधकाम करण्यासाठी अनुदान दिले. ...

राम वाघमारे

लाेकमत न्यूज नेटवर्क

नांद : उघड्यावरील घाणीचा नायनाट करण्यासाठी शासनाने नागरिकांना घराेघरी शाैचालयांचे बांधकाम करण्यासाठी अनुदान दिले. अनेकांनी अनुदाानाचा लाभ घेत शाैचालये बांधली तर काहींनी नुसताच देखावा केला. घरी शाैचालये असूनही उघड्यावर शाैचास जाणे सुरू असल्याचे चित्र भिवापूर तालुक्यातील काही गावांमध्ये आजही बघावयास मिळते. त्यामुळे हागगणदारीमुक्त गाव अभियानाचा पुरता फज्जा उडाला आहे.

उघड्यावर शाैचास जाणाऱ्यांमध्ये भिवापूर तालुक्यातील नांद, सायगाव, भगवानपूर, खाेलदाेडा, खरकाडा, वणी, लाेणारा, आलेसूर, पांजरेपार, चिखलापार, पिरावा, पाेळगाव, धामणगाव ही गावे आघाडीवर असून, या गावांमध्ये प्रवेश करणाऱ्या राेडलगत घाणीचे दर्शन हाेते. विशेष म्हणजे, यासह इतर गावांमधील नागरिकांना शासनाने शाैचालय बांधण्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून अनुदान दिले आहे. स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत नागरिकांनी शाैचालयांचा नियमित वापर करावा, यासाठी जनजागृतीही केली आहे.

उघड्यावर शाैचास जाणे बंद व्हावे, म्हणून मध्यंतरी जिल्हा परिषद प्रशानाच्यावतीने ‘गुड माॅर्निंग’ पथकाची निर्मिती करण्यात आली हाेती. त्यानंतर संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही माेहीम जाेपर्यंत सुरू हाेती, ताेपर्यंत काहींनी शाैचालयांचा नियमित वापर केला. माेहीम थांबताच नागरिकांचे उघड्यावर शाैचास जाणे सुरू झाले. त्यामुळे प्रशासनाने इतर कामे साेडून हीच माहीम वर्षभर राबवावी काय, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

...

साहित्य ठेवण्यासाठी वापर

काही गावांमधील खासगी शाैचालयांची पाहणी केली असता, नागरिक त्या शाैचालयांचा वापर घरातील निरुपयाेगी साहित्य व शेतीपयाेगी अवजारे ठेवण्यासाठी करीत असल्याचे आढळून आले. ग्रामीण भागात सार्वजनिक शाैचालये नाहीत. ज्या गावांमध्ये ती आहेत, त्यांची अवस्था साफसफाईअभावी दयनीय झाली आहे. ही बाब स्थानिक प्रशासनाला माहीत आहे. मात्र, कुणीही कारवाई करण्याच्या भरीस पडत नाही.

....

निर्मल ग्राम नावालाच

हागणदारीमुक्त गाव अभियसानाला २०१३ पासून वेग आला आला. त्यातच शासनाने निर्मल ग्राम अभियान राबवून यात चांगली कामगिरी बजावणाऱ्या ग्रामपंचायतींना राेख बक्षिसेही व अतिरिक्त विकास निधीही दिला. प्रशासनाची पाठ फिरताच ग्रामीण भागातील कचरा व घाणीची समस्या ‘जैसे थे’च झाली. त्यामुळे शासनाचे निर्मल ग्राम अभियान नावालाच राहिले आहे.