शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
5
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
7
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
8
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
9
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
10
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
11
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
12
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
13
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
14
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
15
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
16
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
17
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
18
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
19
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
20
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

शाैचालये असूनही उघड्यावर जाणे सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:13 IST

राम वाघमारे लाेकमत न्यूज नेटवर्क नांद : उघड्यावरील घाणीचा नायनाट करण्यासाठी शासनाने नागरिकांना घराेघरी शाैचालयांचे बांधकाम करण्यासाठी अनुदान दिले. ...

राम वाघमारे

लाेकमत न्यूज नेटवर्क

नांद : उघड्यावरील घाणीचा नायनाट करण्यासाठी शासनाने नागरिकांना घराेघरी शाैचालयांचे बांधकाम करण्यासाठी अनुदान दिले. अनेकांनी अनुदाानाचा लाभ घेत शाैचालये बांधली तर काहींनी नुसताच देखावा केला. घरी शाैचालये असूनही उघड्यावर शाैचास जाणे सुरू असल्याचे चित्र भिवापूर तालुक्यातील काही गावांमध्ये आजही बघावयास मिळते. त्यामुळे हागगणदारीमुक्त गाव अभियानाचा पुरता फज्जा उडाला आहे.

उघड्यावर शाैचास जाणाऱ्यांमध्ये भिवापूर तालुक्यातील नांद, सायगाव, भगवानपूर, खाेलदाेडा, खरकाडा, वणी, लाेणारा, आलेसूर, पांजरेपार, चिखलापार, पिरावा, पाेळगाव, धामणगाव ही गावे आघाडीवर असून, या गावांमध्ये प्रवेश करणाऱ्या राेडलगत घाणीचे दर्शन हाेते. विशेष म्हणजे, यासह इतर गावांमधील नागरिकांना शासनाने शाैचालय बांधण्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून अनुदान दिले आहे. स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत नागरिकांनी शाैचालयांचा नियमित वापर करावा, यासाठी जनजागृतीही केली आहे.

उघड्यावर शाैचास जाणे बंद व्हावे, म्हणून मध्यंतरी जिल्हा परिषद प्रशानाच्यावतीने ‘गुड माॅर्निंग’ पथकाची निर्मिती करण्यात आली हाेती. त्यानंतर संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही माेहीम जाेपर्यंत सुरू हाेती, ताेपर्यंत काहींनी शाैचालयांचा नियमित वापर केला. माेहीम थांबताच नागरिकांचे उघड्यावर शाैचास जाणे सुरू झाले. त्यामुळे प्रशासनाने इतर कामे साेडून हीच माहीम वर्षभर राबवावी काय, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

...

साहित्य ठेवण्यासाठी वापर

काही गावांमधील खासगी शाैचालयांची पाहणी केली असता, नागरिक त्या शाैचालयांचा वापर घरातील निरुपयाेगी साहित्य व शेतीपयाेगी अवजारे ठेवण्यासाठी करीत असल्याचे आढळून आले. ग्रामीण भागात सार्वजनिक शाैचालये नाहीत. ज्या गावांमध्ये ती आहेत, त्यांची अवस्था साफसफाईअभावी दयनीय झाली आहे. ही बाब स्थानिक प्रशासनाला माहीत आहे. मात्र, कुणीही कारवाई करण्याच्या भरीस पडत नाही.

....

निर्मल ग्राम नावालाच

हागणदारीमुक्त गाव अभियसानाला २०१३ पासून वेग आला आला. त्यातच शासनाने निर्मल ग्राम अभियान राबवून यात चांगली कामगिरी बजावणाऱ्या ग्रामपंचायतींना राेख बक्षिसेही व अतिरिक्त विकास निधीही दिला. प्रशासनाची पाठ फिरताच ग्रामीण भागातील कचरा व घाणीची समस्या ‘जैसे थे’च झाली. त्यामुळे शासनाचे निर्मल ग्राम अभियान नावालाच राहिले आहे.