शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

धमक्या मिळाल्या तरी लेखनावर निष्ठा असली पाहिजे : अरुणा सबाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 23:49 IST

आज निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे वेगगेवळ्या विषयावर लेखन सोपे राहिले नाही. असे वास्तववादी लेखन केले तर धमक्या यायला लागतात. मात्र लेखकांनी त्याला भीक न घालता धडाडीचे आणि वास्तवादी लेखन केले पाहिजे.

ठळक मुद्देपद्मगंधा प्रतिष्ठानतर्फे साहित्य संमेलनाचे उद्घाटन

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : आज निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे वेगगेवळ्या विषयावर लेखन सोपे राहिले नाही. असे वास्तववादी लेखन केले तर धमक्या यायला लागतात. मात्र लेखकांनी त्याला भीक न घालता धडाडीचे आणि वास्तवादी लेखन केले पाहिजे. किती धमक्या आल्या तरी आपल्या लेखनावर निष्ठा असली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व प्रकाशक अरुणा सबाने यांनी व्यक्त केले.

पद्मगंधा प्रतिष्ठानच्या वतीने राष्ट्रभाषा संकुलाच्या बाबुराव धनवटे सभागृहात आयोजित वार्षिक साहित्य संमेलनाच्या उद््घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार शैलेश पांडे, संस्थेच्या अध्यक्ष शुभांगी भडभडे, विजया ब्राम्हणकर प्रामुख्याने उपस्थित होत्या. अरुणा सबाने पुढे बोलताना म्हणाल्या, प्रत्येकाची लेखनाची शैली, धाटणी व त्याचा पोत वेगळा असतो. अनेकदा त्या लेखनावर होणारी टीका त्यांना सहन होत नाही. मात्र आपण काय लिहितो आणि कशासाठी लिहितो याचे आत्मपरीक्षण लेखकांनीच करण्याची गरज आहे. स्वत:ला विचारणा केली पाहिजे. त्यातून अनेकदा दर्जेदार लेखन निर्मिती होत असते. मुळात लेखन करणे इतके सोपे नाही आणि जे आपण लिहितो आणि त्यावर टीका झाली तर आपण ते सहन करीत नाही. मुळात लेखन हा रियाज आहे. जेवढे लेखन कराल तेवढी आपली लेखणी आणि भाषा समृद्ध होईल. त्यासाठी विविध वाङ्मय लेखन करताना त्याकडे गंभीरपणे बघितले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.कार्यक्रमादरम्यान मालिनी राजाभाऊ बोबडे सामाजिक पुरस्कार कवी बळवंत भोयर व विजया मारोतकर यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन संगीता वाईकर यांनी केले. कार्यक्रमात सतीशकुमार पाटील (कोल्हापूर), निर्मलकुमार सूर्यवंशी (नांदेड), अरुण नाईक (गोवा), जयश्री उपाध्ये (नागपूर), परिणिता कवठेकर, आ.य. पवार (जामखेड), ज्योत्स्ना चांदगुडे (पुणे), श्रुती वडगबाळकर (कोेल्हापूर), डॉ. संभाजी पाटील (लातूर), संगीता अरबुने (वसई), डॉ. गणेश चव्हाण (नागपूर), गणेश भाकरे (सावनेर) डॉ. वर्षा सगदेव (नागपूर), शामल कामत (मुंबई) यांनाही मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. उद््घाटनानंतर ज्येष्ठ कवयित्री कविता शनवारे यांच्या अध्यक्षतेत कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले. यात अनेक कवींनी सहभाग घेत दर्जेदार कविता सादर केल्या.

टॅग्स :literatureसाहित्यnagpurनागपूर