शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

वारंवार सांगूनही ६० टक्के नागपूरकर ओला-सुक्या कचऱ्याच्या विलगीकरणाबाबत उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2022 21:46 IST

आजही ६० टक्के नागपूरकर ओला व सुका कचरा एकत्रच देत आहेत. त्यामुळे तो वेगळा करायला मोठ्या अडचणी जात आहेत.

ठळक मुद्दे वेगवेगळा संकलित करण्यात मोठ्या प्रमाणात अडचणी

नागपूर : १५ डिसेंबरपासून एकत्रित कचरा स्वीकारू नका, ओला आणि सुका कचरा वेगवेगळा संकलित करा, असे निर्देश मनपा प्रशासनाने कचरा संकलन करणाऱ्या कंपन्यांना दिले होते. तसेच नागरिकांनाही घरातील कचरा वेगवेगळा करूनच द्यावा, असे आवाहन केले आहे. या आवाहनानंतरही जेमतेम ४० टक्केच कचऱ्याचे विलगीकरण होत आहे. आजही ६० टक्के नागपूरकर ओला व सुका कचरा एकत्रच देत आहेत. त्यामुळे तो वेगळा करायला मोठ्या अडचणी जात आहेत.

नागपूर शहरातून दररोज १,१०० मेट्रिक टन कचरा संकलित केला जातो. तो भांडेवाडी येथे साठविला जातो. यात ६० टक्के कचरा एकत्रित असतो. १५ ते ३१ डिसेंबरदरम्यान २१,१०० मेट्रिक टन कचरा संकलित करण्यात आला. यातील १२,७०० मेट्रिक टन कचऱ्याचे विलगीकरण झाले नव्हते. म्हणजेच जवळपास ६० टक्के कचरा विलगीकरण न करता भांडेवाडी येथे आणला जात आहे.

शहरातील कचरा संकलनाची जबाबदारी बीव्हीजी व एजी एन्व्हायरो या दोन कंपन्यांकडे आहे. १५ दिवसात एजी एन्व्हायरो कंपनीने लक्ष्मी नगर, धरमपेठ, हनुमान नगर, धंतोली आणि नेहरू नगर झोन मधून १२,६९२ मेट्रिक टन कचरा भांडेवाडी येथे आणला. तर बीव्हीजी कंपनीने गांधीबाग, सतरंजीपुरा, लकडगंज, आशी नगर आणि मंगळवारी झोन मधून १०,४५९ मेट्रिक टन कचरा उचलला. यातील ६,०६७ मेट्रिक टन कचरा मिश्रित होता. दोन्ही कंपन्याकडून १०० टक्के कचरा वेगवेगळा संकलित केला जात नाही.

सभागृहात पुन्हा मुद्दा गाजणार

कचरा संकलन कंपन्यांच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी गठित समितीने चौकशी अहवाल महापौरांना सादर केला आहे. पुढील सभागृहात यावर पुन्हा चर्चा होणार आहे. ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित होत नसल्याचा मुद्दा पुन्हा गाजण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्न