शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

देशमुखांची टीका भाजपच्या जिव्हारी

By admin | Updated: March 11, 2015 02:12 IST

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाजप आमदार मौनी असल्याची माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केलेली टीका भाजप नेत्यांच्या जिव्हारी लागली आहे.

नागपूर : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाजप आमदार मौनी असल्याची माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केलेली टीका भाजप नेत्यांच्या जिव्हारी लागली आहे. गेल्या २० वर्षात देशमुखांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी काय केले, कोणते निर्णय घेतले याचा हिशेब आधी द्यावा, अशी मागणी भाजप नेत्यांनी केली असून मंत्रिपद व आमदारकी गमावल्यामुळे आलेल्या नैराश्यातून देशमुख अशी आगपाखड करीत असल्याची टीकाही भाजप नेत्यांनी केली आहे. भाजप- राष्ट्रवादीत जुंपल्यामुळे येत्या काळात जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. भाजपचे शहर अध्यक्ष आ. कृष्णा खोपडे यांनी प्रसिद्धीपत्रक जारी करीत देशमुख यांच्या वक्तव्याचा जोरात समाचार घेतला आहे. भाजप सरकारच्या पहिल्या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच लाख शेतकऱ्यांचे सावकारी कर्ज माफ करण्याची घोषणा केली. २१५ कोटी रुपये वीजबिल माफ केले. उलट राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये घोटाळे केले. शेतकरी हिताचा एकही निर्णय घेतला नाही. विधानसभेतील पराभवाचा देशमुखांना मानसिक धक्का बसला आहे. त्यामुळेच ते असे आरोप करीत सुटले आहेत. राष्ट्रवादीने त्यांची मानसिक तपासणी करावी, खर्च भाजप देईल, अशी बोचरी टीकाही खोपडे यांनी केली आहे. जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनीही देशमुखांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने कमी काळात शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याचा सपाटा लावला. जिल्हा दुष्काळमुक्त व्हावा यासाठी योजना आखली. विदर्भ- मराठवाड्यातील शेतकऱ्यांना विहिरींवर पंप देण्याची योजना, सौरपंपाची योजना आणली. उलट अनिल देशमुख यांनी गेल्या २० वर्षात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कधी जनता दरबार घेतला नाही. देशमुख यांनी केलेल्या ‘भाजपच्या आमदारांच्या चपलांचे हार घालू’ या वक्तव्यामुळे जिल्हा भाजपचे कार्यकर्ते संतापले असून अशी विधाने खपवून घेतली जाणार नाहीत, अशा इशाराही डॉ. पोतदार यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)