शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
2
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
3
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
4
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
5
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
6
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
7
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
8
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
9
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
10
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
11
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
12
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
13
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
15
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
16
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
17
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
18
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
19
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
20
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

नैराश्य हा वेळीच उपचारांमुळे बरा होणारा आजार : नितीन गुल्हाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 11:15 PM

कुटुंब छोटे होत चालले आहे. कुटुंबाच्या गरजा वाढत आहे. यातून मानसिक संघर्ष निर्माण होत आहे. यामुळे नैराश्य, चिंता व व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढत आहे. यावर वेळीच उपाय केला नाही तर अशी व्यक्ती स्वत:साठी किंवा इतरांसाठी धोकादायक ठरू शकेल किंवा आत्महत्येस प्रवृत्त होऊ शकेल. ‘नैराश्य’ हा वेळीच व योग्य उपचारांमुळे बरा होणारा आजार आहे, अशी माहिती प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन गुल्हाने यांनी येथे दिली.

ठळक मुद्दे मनोरुग्णालयात आत्महत्या प्रतिबंधक दिन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुटुंब छोटे होत चालले आहे. कुटुंबाच्या गरजा वाढत आहे. यातून मानसिक संघर्ष निर्माण होत आहे. यामुळे नैराश्य, चिंता व व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढत आहे. यावर वेळीच उपाय केला नाही तर अशी व्यक्ती स्वत:साठी किंवा इतरांसाठी धोकादायक ठरू शकेल किंवा आत्महत्येस प्रवृत्त होऊ शकेल. ‘नैराश्य’ हा वेळीच व योग्य उपचारांमुळे बरा होणारा आजार आहे, अशी माहिती प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन गुल्हाने यांनी येथे दिली.प्रादेशिक मनोरुग्णालयाच्यावतीने मंगळवारी जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, मानकापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राऊत उपस्थित होते.डॉ. गुल्हाने म्हणाले, सध्या जगातील ३५० दशलक्ष लोक नैराश्यग्रस्त आहेत. जागतिक मानसिक आरोग्य सर्वेक्षणाच्या १७ देशांमधील केल्या गेलेल्या संशोधनात सर्वसाधारणपणे दर २० जणांमध्ये एक जण नैराश्याच्या आजाराने ग्रस्त आढळला आहे. त्यामुळे नैराश्याच्या आजाराबाबत जनजागृती व प्रबोधनपर कार्यक्रम मनोरुग्णालयाने हाती घेतले आहे. याप्रसंगी मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आशिष कुथे यांनी आत्महत्याबाबतची कारणे, समज-गैरसमज याविषयी तर डॉ. शहा यांनी ‘आत्महत्या प्रतिबंधक-प्रेरणा प्रकल्प याबद्दलची माहिती दिली. डॉ. पातूरकर यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ. हिरा वाघमारे यांनी केले, आभार डॉ. सौरभ टोपले यांनी मानले. कार्यक्रमाला टाटा ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, रुग्णालयातील डॉक्टरांसह परिचारिका, कर्मचारी आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :mental hospitalमनोरूग्णालयSuicideआत्महत्या