शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

श्रीराम अर्बनच्या अध्यक्षांच्या घराला ठेवीदार व खातेदारांचा घेराव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 23:55 IST

कोट्यवधींच्या ठेवी घेऊन फरार झालेले गणेशनगर येथील श्रीराम अर्बन क्रेडिट को-आॅपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष खेमचंद मेहरकुरे यांच्या नंदनवन, शिवनगर येथील घराला जवळपास १५० पेक्षा जास्त ठेवीदार आणि खातेदारांनी गुरुवारी रात्री घेराव घातला आणि निदर्शने केली. पोलिसांनी बळजबरीने आम्हाला हाकलून लावल्याचा आरोप ठेवीदारांनी लोकमतशी बोलताना केला.

ठळक मुद्देकोट्यवधींचा घोटाळा : ठेवीदारांचा आरोप

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : कोट्यवधींच्या ठेवी घेऊन फरार झालेले गणेशनगर येथील श्रीराम अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष खेमचंद मेहरकुरे यांच्या नंदनवन, शिवनगर येथील घराला जवळपास १५० पेक्षा जास्त ठेवीदार आणि खातेदारांनी गुरुवारी रात्री घेराव घातला आणि निदर्शने केली. पोलिसांनी बळजबरीने आम्हाला हाकलून लावल्याचा आरोप ठेवीदारांनी लोकमतशी बोलताना केला.प्राप्त माहितीनुसार, सोसायटीत मजुरापासून श्रीमंतांचे कोट्यवधी रुपये गुंतले आहेत. मेहरकुरे यांनी ठेवीदार आणि खातेदारांच्या पैशातून अवैध जमिनी विकत घेतल्या असून अन्य व्यवसायातही गुंतवणूक केली आहे. त्यांना योग्य परतावा न मिळाल्यामुळे गुंतवणूकदारांचे पैसे फसले आहेत. याची माहिती ठेवीदारांना झाल्यानंतर पैसै काढण्यासाठी अध्यक्षांशी संपर्क साधला. पैसे परत करतो, अशा भूलथापा चार महिन्यांपासून देऊन ते ठेवीदारांची बोळवण करीत आहेत. एक महिन्यांपूर्वी जवळपास ३०० पेक्षा जास्त खातेदार आणि ठेवीदारांनी खेमचंद मेहरकुरे यांच्याविरुद्ध कोतवाली पोलिसात तक्रार नोंदविली. त्यावेळी मेहरकुरे स्वत: ठाण्यात हजर होऊन १ एप्रिलपासून सर्वांना ठेवी परत करणार असल्याचे आश्वासन ठेवीदारांना दिले होते. त्यानंतर ठेवीदाराच्या मोबाईलवर तुम्हाला पैसे देण्यास असमर्थ असल्याचे सांगितले. १ एप्रिलपूर्वीच ते मोबाईल बंद करून फरार झाले आहेत. तेव्हापासून ठेवीदार संतप्त असून त्याच्या पत्नीला जाब विचारात आहेत. ते कुठे गेले, हे माहीत नसल्याचे पत्नीचे उत्तर आहे. पोलीस खेमचंदला ताब्यात घेण्याची कोणतीही कारवाई करीत नाहीत, असा ठेवीदारांचा आरोप आहे.अध्यक्षांच्या जमिनी संचालकांनी घेतल्या ताब्यातअध्यक्षांनी खरेदी केलेल्या जमिनी सोसायटीच्या काही संचालकांनी ताब्यात घेऊन स्वत:च्या नावाने रजिस्ट्री केल्याची माहिती ठेवीदारांनी दिली. त्यामुळे खेमचंदकडे कुठल्या जमिनी शिल्ल्क नाहीत आणि आम्हाला पैसे मिळणार नाहीत, अशी भीती ठेवीदार आणि खातेदारांमध्ये आहे.सोसायटीचे ऑडिट सुरूजवळपास ४० कोटींच्या आर्थिक घोटाळ्यानंतर जिल्हा उपनिबंधक अजय कडू यांनी पुढाकार घेत मागील तीन आर्थिक वर्ष आणि चालू वर्षाचे सोसायटीचे ऑडिट करण्याचे आदेश जिल्हा विशेष अंकेक्षक अनिल पाटील यांना दिले आहे. त्यानुसार पाटील यांनी चार अंकेक्षकाची नियुक्ती केली असून एक महिन्यात अहवाल येणार आहे. त्या आधारे सोसायटीच्या संचालक मंडळावर फौजदारी कारवाई करण्याचे संकेत आहेत. गेल्यावर्षी सोसायटीला एका सीए अंकेक्षकाने ‘अ’ ऑडिट वर्ग दिला होता, हे विशेष.

टॅग्स :agitationआंदोलनInvestmentगुंतवणूक