शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

आरोग्य विभाग; मानधनाअभावी डॉक्टरांचे राजीनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 11:27 IST

मानधनाअभावी राज्यातील ५० टक्क्यांपेक्षा जास्त डॉक्टरांनी राजीनामे दिले आहेत. यात एमबीबीएस डॉक्टरांची संख्या सर्वाधिक आहे.

ठळक मुद्देसहा महिन्यांचे वेतन थकीत ५० टक्के डॉक्टरांनी सोडले काम

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील ग्रामीण जनतेला वेळेत उपचार मिळावे यासाठी जिथे गरज आहे तिथे थेट कंत्राटी पद्धतीवर वैद्यकीय अधिकारी नेमण्याचे आरोग्य सेवा संचालनालयाचे निर्देश आहेत. दरम्यानच्या काळात अनेक ठिकाणी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली. परंतु संचालनालयाने यांच्या मानधनाला गंभीरतेने घेतलेच नाही. परिणामी, तीन-चार महिन्यातच ५० टक्क्यांपेक्षा जास्त डॉक्टरांनी राजीनामे दिले आहेत. यात एमबीबीएस डॉक्टरांची संख्या सर्वाधिक होती. सध्या जे कार्यरत आहेत, त्यातील बहुसंख्य बीएएमएस डॉक्टर आहेत. त्यांनाही गेल्या सहा ते सात महिन्यापासून मानधनाची प्रतीक्षा आहे.ग्रामीण भागात काम करण्यासाठी डॉक्टर तयार होत नसल्याने, सरकारच्या आरोग्य योजना ग्रामीण भागापर्यंत पोहचत नाहीत. ग्रामीण जनतेला आरोग्याचे चांगले उपचार मिळू शकत नाहीत.महाराष्ट्रातही ग्रामीण भागात डॉक्टरांचा प्रश्न मोठा गंभीर आहे. दुर्गम, आदिवासी भागातील लोकांना आरोग्याच्या योग्य सुविधा मिळत नसल्याचे चित्र आहे. डॉक्टरांची कमतरता भरून काढण्यासाठी विशेषत: ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची संख्या जास्त आहे, प्रसूतीची संख्या मोठी आहे, अल्प डॉक्टर आहेत किंवा डॉक्टर नाही अशा ठिकाणी कंत्राटी तत्त्वावर वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आरोग्य सेवा संचानालयाने निर्देश दिले. यामुळे राज्यातील सर्वच ठिकाणी गरजेनुसार आरोग्य अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. सूत्रानुसार दीड हजारावर हा आकडा गेला. हव्या त्या ठिकाणी काम मिळत असल्याने एमबीबीएसचे बहुसंख्य डॉक्टर रुजू झाले. यांच्या नियुक्तीने ग्रामीण भागातील चित्र बदलले. परंतु संचालनालयाने यांच्या मानधनाचे नियोजनच केले नाही. किती कंत्राटी वैद्यकीय अधिकारी आहेत आणि त्यांना किती निधी लागेल याची मागणी गेल्या अर्थसंकल्पात केलीच नाही. त्यानंतर पुरवणी मागणीसाठी प्रयत्न करण्यात आले. परंतु पावसाळी अधिवेशनात उशिरा मागणी करण्यात आली. यामुळे मानधनाचा प्रश्न चिघळला. तीन-चार महिने होऊनही मानधन न मिळाल्याने डॉक्टरांचे राजीनामे सत्र सुरू झाले. सूत्रानुसार राज्यात ५० टक्क्यांवर डॉक्टरांनी राजीनामे दिले. त्यानंतरही स्थिती बदलली नाही. त्यांच्या जागी बीएएमएस डॉक्टरांना घेणे सुरू असलेतरी गेल्या सहा-सात महिन्यांपासून मानधनाची प्रतीक्षा कायम आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा ढासळत चालली असताना अद्यापही मानधनाचा प्रश्न सुटलेला नाही.

दिवाळीतही मिळाले नाही मानधनथकीत मानधनाची ओरड वाढल्याने संचालनालयाने राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या जिल्हा स्तरावर उपलब्ध असलेल्या निधीतून दोन महिन्याचे मानधन अदा करण्याला मान्यता दिली. परंतु हे पत्र २५ ऑक्टोबर रोजी सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मिळाले. याच दिवसांपासून ते २९ ऑक्टोबरपर्यंत सुट्या आल्याने कंत्राटी आरोग्य अधिकाऱ्यांची दिवाळीही काळी गेली.

थकीत मानधनासाठी पुरवणी मागणीगेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात कंत्राटी आरोग्य अधिकाऱ्यांच्या मानधनाच्या निधीसाठी तरतूदच झाली नाही. पुरविणी मागणीतही उशीर झाला. यामुळे मानधनाचा प्रश्न निर्माण झाला. गेल्या महिन्यात राष्ट्रीय आरोग्य अभियनातून दोन महिन्याचे थकीत मानधन देण्याचा सूचना देण्यात आल्या. आता मार्चपर्यंत किती निधीची गरज आहे, त्याचा पुरवणी मागणी तयार करून त्याचा प्रस्तावही पाठविला आहे. याचा पाठपुरावाही केला जाणार आहे. यामुळे मानधनाचा प्रश्न लवकरच सुटेल.-डॉ. साधना तायडे, संचालक, आरोग्य सेवा

टॅग्स :Healthआरोग्य